नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भारतातील वेगवेगळ्या भागात नवरात्री वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. गुजरातमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो . गुजरातमध्ये दांडिया आणि गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. हे रात्रभर सुरू असते.
देवीच्या सन्मानार्थ गरबा, आरतीच्या आधी केला जातो आणि त्यानंतर दांडिया सोहळा होतो. पश्चिम बंगाल राज्यातील बंगाली लोकांच्या मुख्य सणांपैकी दुर्गा पूजा बंगाली कॅलेंडरमध्ये सर्वात अलंकृत म्हणून उदयास आली आहे.शक्ती स्वरुप दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्याचे दिवस म्हणजेच नवरात्रीचा महाउत्सव 15 ऑक्टोबर रोजी सुरु झाला आहे.
अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा नऊ दिवसांचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. हा सण देशाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
यासाठी घटस्थापना केली जाते आणि अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. यावेळी शारदीय नवरात्र 15 ऑक्टोबर रोजी रविवारपासून सुरु झाली आहे आणि 24 ऑक्टोबर रोजी संपेल. शारदीय नवरात्र सुरू आहेत आणि या शारदीय नवरात्रात आठवा दिवस म्हणजेच महाअष्टमी असते.
यालाच दुर्गाष्टमी असेही म्हणतात. पूजेच्या पहिल्या दिवशी अनेक शुभ योगायोग केले जात आहेत. नवरात्रीमध्ये पाच रवीयोगांसह शुभ आणि वैधृत योग तयार होत आहेत. चित्र नक्षत्रात नवरात्र सुरु होत आहे जे आनंद आणि सौभाग्याचे प्रतीक आहे.
ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने नवरात्रीच्या शुभ वेळेत कोणतेही काम सुरु केले तर त्याला नक्कीच यश मिळेल. याशिवाय या काळात घर, मालमत्ता आणि इतर गोष्टी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
नऊ दिवस देवीला वेगवेगळे प्रकारचे नैवेद्य अर्पण करतो, अगदी त्याच प्रकारे या अष्टमी तिथीस आपण हे दोन पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून नक्की दाखवा. देवी भागवत पुराणानुसार तसेच देवी महात्म्यनुसार अष्टमी तिथीस नवरात्रीतील अष्टमीला देवीला हे दोन पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते
आणि आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करून जीवनात सुखसमृद्धी वैभव निर्माण करते. देवीची आरती केल्यानंतर आपण देवीला नैवेद्य अर्पण करावा. त्यातील पहिला पदार्थ आहे बासुंदी , आपण दूध आणि साखर यांचा वापर करून घट्ट अशी बासुंदी नक्की तयार करा
आणि ते देवीला या अष्टमी तिथीस नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी नक्की अर्पण करा. मात्र हे करताना त्यामध्ये चुकूनही तांदळाचा वापर करू नका . दुधाची बासुंदी आपण देवीला अर्पण करा आणि ते अर्पण केल्यानंतर दुसरा पदार्थ आहे की जो नवरात्रीत अर्पण करायचा आहे , तो आहे तांबुल, म्हणजे पानाचा विडा सुपारी केला जातो,
मात्र हे आपण घरच्या घरी बनवा पानाचा विडा आपण घरी तयार करा आणि त्यामध्ये आवश्यक वस्तू हे पदार्थ अत्यंत आवश्यक आहेत त्यामध्ये पानसुपारी चूना विलायची लवंग जायफळ आणि केशर बदाम साखर हे आपण आधी आवर्जून घ्यायचे आहेत. तांबूल बनवताना त्यामध्ये टाकायचे आहेत.
हे पदार्थ नेहमीच अत्यंत लोकप्रिय आहेत आणि अशा प्रकारचा हे नैवेद्य देवीला अर्पण केल तर देवीची कृपा नक्की बरसते. आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !नवरात्रीच्या काळात संपूर्ण ९ दिवस सुपारीवर केशर ठेवा आणि नंतर दुर्गा स्तोत्र किंवा माँ दुर्गेच्या नामावलीचा पाठ करा.
असे केल्याने घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करते आणि यामुळे घरगुती कलह सारख्या समस्या दूर होतात. नवरात्रीच्या शुभ दिवशी घरात तुळशीचे रोप लावा. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा. हे खूप शुभ मानले जाते आणि यामुळे कुटुंबात आनंद टिकून राहतो.
नवरात्रीच्या पहिल्या ५ दिवसात सुपारीच्या पानावर ‘ह्रीम’ लिहून दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करा. नवमीच्या दिवशी ही सर्व सुपारीची पाने गोळा करून सोबत ठेवा. यामुळे आर्थिक संकटातून दिलासा मिळतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.