नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपले पितर हे आपल्यासाठी बरीच चांगली कार्य करून ठेवतात ज्यामुळे आपण आज चांगले जीवन जगत असतो. त्यामुळे त्यांचे स्मरण करून त्यांना प्रसन्न करून त्यांचे कार्य पुढेही सुरू ठेवण्यासाठी पितृपक्षाला महत्व आहे.
यामुळे तुमचं जीवन नव्याने सुरू होऊन सर्वकाही यशस्वी होईल. आपल्या कामांना जर पितरांचा आशीर्वाद मिळाला तर आपलं काम आणि त्याचे परिणाम कितीतरी पटीने चांगले होतात.
तुमच्या कामात नेहमी काहीतरी अडचण निर्माण होत असेल.आपल्या घरातील कटकटी असतील, भांडण असेल वाद-विवाद असेल, एकमेकांचे पटत नसेल किंवा पती-पत्नीचे पटत नसेल तर तुम्ही सुद्धा 14 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो,
आज सगळ्यात मोठी ही अमावस्या मानले जाते. आपल्या पितरांसाठी त्यांना मुक्त करण्यासाठी हा साधा उपाय नक्की करा, यामुळे तुमच्या घरातून सर्व काही वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा नष्ट कण्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटासा चमत्कारिक उपाय या दिवशी करायचा आहे,
म्हणजेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. सर्वपित्री अमावास्या म्हणजे सर्वपित्री यांच्या दिवस सर्व पितरांना या दिवशी घास टाकला जातो, या दिवशी त्यांना तर्पण केले जाते.सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबरच्या दिवशी आहे.
तर 14 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी देव पूजा करण्याच्या वेळेस दरम्यान तुम्हाला एक नारळ देव घरात ठेवायचा आहे. तुम्हाला आधीच 13 ऑक्टोबरला एक नारळ घरात आणून ठेवायचा
आणि दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबरच्या दिवशी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी तो नारळ देवघरात ठेवायचा आणि त्याची हळद-कुंकू आणि अक्षता टाकून पूजन करायचे आहे.
यानंतर तुम्हाला सकाळी तिथे नारळ ठेवून झाल्यावर, तुम्हाला संध्याकाळी त्याच दिवशी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर बसून,त्या नारळासमोर बसून “कालभैरव अष्टक” एक वेळेस वाचायचे आहे.
कालभैरवाष्टक हे श्री स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या ग्रंथात दिलेले आहे. पण जर तुमच्याकडे कालभैरवाष्टक ही पोथी नसेल, तर गुगल वर कालभैरवाष्टक मराठी असे सर्च केल्यास,
तर तिथे मराठीमध्ये कालभैरवाष्टक तुम्हाला मिळेल. तर तुम्ही एक वेळेस कालभैरवाष्टक वाचायचे आहेत,मग हे कालभैरवाष्टक वाचून झाल्यावर, तुम्हाला तो नारळ फोडायचा आहे.
सर्वपित्री अमावस्येला सर्व पितर पृथ्वीवर असतात व त्यांना प्रसन्न करून आशीर्वाद घेणे सोपे असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की,तुम्हाला नारळ फोडताना ते पाणी नारळाचं पाणी एखाद्या वाटीत जमा करायच आहे,
यामध्ये थोडं का असेना पण ते पाणी तुम्हाला जमा करायचा आहे.मग यानंतर ते पाणी जर तुम्ही जमा केलं, तर तुम्हाला ते पाणी तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचे आहे. तो प्रसाद नारळाचा प्रसाद घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे.
ॐ देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च नमः स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नम: हा मंत्र 3 वेळेस बोलायचं आहे पण त्याच्या आधी पितरांना वंदन करा आणि विनंती करा. माझ्या वंशातील हे पितर देवतां माझी काही चूक झाल्यास मला माफी द्या.
निदर्शनास आणून द्या तसेच तुमचं आशीर्वाद असल्या शिवाय आपण नक्कीच काही करू शकत नाही.आपला वंश वृध्दींगत होण्यासाठी तसेच आपल घराण्याचा नावलौकिक प्राप्त होण्यासाठी तुमचं आशीर्वाद हवा आहे तरी तो मला मिळवा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.