रक्षाबंधन 2023, राखी बांधताना बोला हा मंत्र, भावाचे रक्षण तर होईलच सोबत अपयश कधीच येणार नाही….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, शास्त्रानुसार भद्रकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात नाही. भाद्र-मुक्त काळात राखी बांधणे नेहमीच शुभ मानले गेले आहे. दुसरीकडे, श्रावण पौर्णिमेला राखी बांधण्यासाठी दुपारची वेळ ही सर्वात शुभ वेळ आहे. मात्र यंदा 30 ऑगस्टपासून रक्षाबंधन सणाची श्रावण पौर्णिमा सुरू होत असून दिवसभर भाद्रची सावली राहणार आहे.

अशाप्रकारे 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनासाठी दिवसभरात कोणताही शुभ मुहूर्त नसेल. 30 ऑगस्ट रोजी भद्रा रात्री 09.02 मिनिटांपर्यंत राहील. अशा स्थितीत 30 ऑगस्टला रात्री 09.02 मिनिटांनी राखी बांधता येईल. या वर्षी रक्षाबंधनाच्या सणावर भाद्रच्या सावलीमुळे 30 आणि 31 ऑगस्ट असे दोन दिवस राखी साजरी केली जाणार आहे.

रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा, यादिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाचा दिवस.

लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण हा दिवस म्हणजे त्यांच्या हक्काचा सुट्टीचा दिवस असतो. बहीण आपल्या भावाला जेव्हा राखी बांधायला येते तेव्हा ती एका ताटात कुंकू, तांदूळ ,नारळ ,राखी, मिठाई ,दिवा व पाण्याने भरलेला कलश असे संपूर्ण सजवते .

भावाचे पूजन करून राखी बांधतांना या सात वस्तू पूजेच्या ताटात असणे अनिवार्य आहे. पूजेच्या ताटात या सात वस्तू ठेवण्याचे विषेश महत्त्व आहे. बहिण-भावाला सर्वात आधी कुंकवाचा टिळा लावते, कुंकू सूर्यग्रहणाशी संबांधीत आहे, कुंकवाचा टिळा लावल्याने भावावर सुर्यदेवांची दृष्टी पडते, बहिण भावासाठी सूर्य देवांकडे प्रार्थना करते, येणाऱ्या वर्षात आपल्या भावाला सर्व प्रकारचे यश व प्रसिद्धी मिळावी

यासाठी प्रार्थना करते. दुसरी वस्तू आहे तांदूळ आणि अक्षता , कोणत्याही पूजेत तांदळाला सर्वात शुभ मानले जाते आणि तांदळा शिवाय कोणतेही पूजन पूर्ण होत नाही. परिणामी भावाला कुंकू लावून त्यावर अक्षता लावते,

हे शुक्र ग्रहाचे संबंधित आहे व अशी प्रार्थना करते की माझ्या भावाच्या जीवनात सर्व प्रकारची शुद्धता व पवित्रता यावी आणि माझे व माझ्या भावाचे संबंध नेहमी स्नेहपूर्ण राहावेत. यानंतर आहे नारळ , नारळाला श्रीफळ म्हटले जाते,

बहीण पूजन झाल्यानंतर भावाला जेव्हा नारळ देते तर त्याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षात माझ्या भावाला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळत राहो व त्याचे जीवन आरामदायक व आनंदी असो.

नंतर आहे राखी किंवा रक्षासूत्र, राखी नेहमी उजव्या हातात मनगटावर बांधली जाते, हे मंगळ ग्रहाचे संबंधित आहे. भावाच्या सुरक्षेसाठी ही बहिणीची प्रार्थना असते.
मिठाई, बहीण राखी बांधून झाली की त्याचे तोंड गोड करते . मिठाई गुरू ग्रहाशी संबंधित आहे

आणि त्याद्वारे ही प्रार्थना केली जाते माझ्या भावावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहावी व आपल्या भावाचे मुले-मुली व वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी राहावेत. भावाच्या घरातील सर्व कार्ये कोणतेही विघ्न न येता निर्विघ्नपणे पार पडावी.

बहिणीने आपल्या ओवाळणीच्या ताटामध्ये काळ्या मिरीचे दाणे एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून घ्यावे, हे 27 काळी मिरीचे दाणे एकत्र घ्या, आपल्या भावाला प्रसन्नपणे ओवाळा , भाऊ तुमच्या ताटात ओवाळणी टाकेल,

त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण 27 काळी मिरीचे दाणे आपल्या उजव्या हातावर घेऊन घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने आपण हे 27 काळे मिरीचे दाणे भावावरून उतरवा. त्यानंतर विशेष करून ज्या ठिकाणी रस्ता चौक आहे

अशा ठिकाणी ही पुडी टाकावी, जितके हे दाणे चिरडले जातील तितक तुमच्या भाऊ बहिणीच्या नात्यातील दुरावा मिटेल, तसेच भावाच्या जीवनात सुख,समृद्धी, शांती येईल , बाधा मोठया प्रमाणात नष्ट होतील, तुम्हाला जो मानसिक त्रास आहे, बाधा आहे , आर्थिक तंगी आहे,

पैसा येत नाही या सर्व समस्या हळूहळू त्याच्यापासून दूर होऊ लागतील. तेव्हा त्याला त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा आणि बहिणीला सुद्धा त्याचा फायदा प्राप्त होताना दिसून येईल . अत्यंत छोटासा उपाय आहे, ज्याचा परिणाम खूप मोठा आहे.

नंतर आहे दिवा, त्यानंतर बहीण आपल्या भावाला ओवाळते व आपल्या भावासाठी प्रार्थना करते, मी माझ्या भावाच्या जीवनात येणारे सर्व रोग व सर्व प्रकारच्या बाधा आणि त्रास दूर व्हावे.

नंतर येते ती गोष्ट म्हणजे पाण्याने भरलेला कलश, पाण्याने भरलेल्या कलशाने भावाकरता अशी प्रार्थना करते की हे माझ्या भावाच्या जीवनात मानसिक शांतता राहावी, तो टेन्शन फ्री व शांततेत जगावा,

राखी बांधून झाल्यानंतर तुम्ही बहिणीला भेटवस्तू देता, त्यामुळे शुभ ऊर्जा निर्माण होऊन त्याचे शुभ-अशुभ फळ मिळत असते. यासाठी आपल्या बहिणीला कधीही नाराज न करता तिला नेहमी भेटवस्तू देऊन तिचा आशीर्वाद मिळत राहावा.

आपल्या व्यापारात प्रगती करीत राहावे, हे होते रक्षाबंधन चे महत्व, त्यामध्ये बहिणीच्या आशीर्वादामुळे भावाचा येणारा काळ सुखाचा होतो. म्हणूनच उत्सव व आनंदात हा रक्षाबंधनाचा सण साजरा करावा.

रक्षाबंधनाचा सण भाऊ आणि बहिणींमधील अतूट आणि अविनाशी प्रेमाला समर्पित आहे. हा सण अनेक वर्षांपूर्वीपासून साजरा केला जातो. या सणाचा उल्लेख महाभारत, भविष्य पुराण आणि मुघल काळातील इतिहासातही आढळतो.

धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी असा उल्लेख आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनगटावर संरक्षक/पवित्र धागा बांधला जातो तेव्हा त्या व्यक्तीने त्याच क्षणी खालील मंत्राचा जप करावा.

हे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती आणि यश मिळविण्यास मदत करते. बहुतेक लोक आजही त्याचे पालन करतात. रक्षाबंधनाच्या सणात बहीणही भावाच्या मनगटावर धागा (राखी) बांधते.

या मंत्राचा जप करताना भावाच्या मनगटावर राखी बांधल्याने भाऊ-बहिणीचे नाते दृढ होते आणि भावाला दीर्घायुष्य लाभते, असे मानले जाते. येन बधो बळी राजा, दानवेंद्रो महाबलाः । तेन त्वं वचनबद्ध नाम, रक्षे माचल माचल:।

अर्थ- या मंत्राचा अर्थ असा आहे की “परम दयाळू राजा बळीला जो संरक्षण धागा बांधला होता, तोच पवित्र धागा मी तुझ्या मनगटावर बांधतो, जो तुझे सर्वकाळ संकटांपासून रक्षण करेल”.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!