नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, उद्या 6 जुलै, या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या संकष्टी चतुर्थी आपण भगवान श्री गणेश यांची पुजा अवश्य करा. आपल्या जवळपासच्या गणेश मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन अवश्य घ्या.
आपल्या जीवनातील तमाम प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी विघ्न दूर करण्यासाठी आपण या दिवशी काही छोटे-छोटे उपाय करू शकता.
तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्रोदय झाल्यावर बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असतो. तसेच अनेक प्रकारची फुले आणि पत्री म्हणजे झाडाची पानेसुद्धा अर्पण केली जातात. याशिवाय काही प्रकारची धान्ये सुद्धा अर्पण करण्याची प्रथा आहे.
मात्र हिंदू धर्म शास्त्रानुसार गणपती काही वस्तू काही पदार्थ अत्यंत अप्रिय आहेत, आणि या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्याने पूजेचा संपूर्ण फळ प्राप्त होत नाहीच, मात्र याउलट श्री गणेश क्रोधित होऊन आपल्यावर अनेक प्रकारचे विघ्न आणि संकटे सुद्धा निर्माण करू शकता. त्यामुळे या काही वस्तूचा वापर भगवान श्री गणेशाच्या पूजेत कधीच करू नये.
या वस्तूंचा वापर केल्याने भगवान गणेश बरोबर, माता लक्ष्मी सुद्धा आपली वास्तूवर नाराज होते आणि आपलं घर आपली साथ सोडून निघून जाते आणि अशा घरात गरिबी, दारिद्र्यतेचा वास सातत्याने निर्माण होतात.
त्यामुळे या काही वस्तू पूजेच्या वेळी श्री गणेशांना पण चुकूनही अर्पण करू नये. पहिली वस्तू म्हणजे, तुलसीपत्र होय. कारण तुळशीची पानं तसं भगवान श्री हरीविष्णु तसेच अनेक देवी-देवतांच्या पुजेत तुलसीपत्रे वाहिली जातात,
भगवान श्रीविष्णु यांच्या बाबतीत तर तुळशीपत्र शिवाय त्यांची पुजा अपूर्ण मानली जाते. मात्र शिवपरिवारात म्हणजेच भगवान शिवशंकर, माता पार्वती आणि कार्तिकेय आणि भगवान श्री गणेशाच्या पूजेत मात्र तुलसी पत्रांचा वापर हिंदु धर्मशास्त्राने वर्ज मानला आहे.
कारण तुळशीने भगवान श्री गणेशांना असा शाप दिला होता. अशी हिंदु पुराणात कथा सांगितली जाते.
ज्या वेळी भगवान श्रीगणेश तपस्यामध्ये हे लीन होते, तेव्हा तुळशी नामक स्त्री ही त्यांच्यावर ती मोहित झाली आणि तिने भगवान श्री गणेश विवाह करण्याची इच्छा प्रकट केली.
मात्र श्री गणेशांनी आपण कायम स्वरूपी ब्रह्मचर्याचे पालन करणार आहोत, असं समजून सांगितलं. मात्र तुळशीने क्रोधीत होवून, तुमचा विवाह होईल असा शाप दिला. मग यावर भगवान श्री गणेशांनी सुद्धा तुळशीचा शाप दिला की,
तुझा पती दानव असेल आणि त्यानुसार जालंधर नावाच्या राक्षसाशी विवाह करावा लागला, तर भगवान श्री गणेशांना सुद्धा रिद्धी-सिद्धी यांच्याशी विवाहबद्ध होऊन लागलं. तेव्हापासून तुळशीला गणपती बाप्पाच्या पुजेत अर्पण करीत नाहीत.
तसेच गणपती बाप्पाना दुसरे वस्तू म्हणजे,अक्षद चुकूनही वाहू नये. आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये तसेच प्रत्येक पूजेमध्ये अक्षद म्हणजेच तांदूळ हे वापरावे लागतात आणि ते भगवान श्री गणेशाच्या पूजेत सुद्धा आपण वापरतो.
मात्र अनेकवेळा मनोभावे पूजा करून सुद्धा,आपल्या इच्छित असे फळ प्राप्त होत नाही, याला कारण म्हणजे तांदूळ होय. कारण जे तांदूळ फुटलेली किंवा तुटलेली असतात, असे तांदूळ अशुभ मानले जातात. त्यांना अक्षद म्हणता येत नाही.अक्षद म्हणजे अखंड तांदुळ होय.
कारण तुटलेले तांदूळ अर्पण करणं, हे अपवित्रतेचे लक्षण मानलं जातं त्याने पूजेचा पूर्ण फळ प्राप्त होत नाही.तसेच भगवान गणेश नेहमी त्यांना अक्षता अर्पण करताना,त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा पाणी मिक्स करावे.
त्यामुळे हळद टाकावी आणि असे हळदी मिस्त्री पिवळ्या रंगाचे अक्षदा भगवान श्री गणेश पुजेत वापरावे.
तिसरी वस्तू म्हणजे, दुर्वा होय.आपल्या सगळ्यांना माहीत असेल की, भगवान श्री गणेश यांनी एका राक्षसाला त्याचा वध करण्यासाठी त्याला गिळले होत.मात्र हा राक्षसाने श्री गणेशाच्या पोटात गेल्यानंतर उत्पात मागवल्या सुरुवात केली मग परिणामी श्रीगणेशांना प्रचंड वेदना होऊ लागल्या.
तेव्हा ऋषि कश्यप यांनी दुर्वाच्या 21 काड्या या भगवान श्रीगणेशांना औषधे म्हणून दिल्या होत्या.
त्यामुळे भगवान श्री गणेशाच्या वेदना कमी झाल्या, तेव्हापासूनच दुवा भगवान श्रीगणेशांना अत्यंत प्रिय आहेत. मात्र अनेक लोक भगवान श्री गणेशांना दुर्वा अर्पण करताना, त्याच्या चरणांशी अर्पण करीत असतात.
मात्र दुवा भगवान गणेशानी सेवन केल्या होत्या,त्यामुळे नेहमी दूर्वा ज्या प्रकारे आपण भगवान श्रीगणेशांना नैवेद्य अर्पण करतो, मोदक अर्पण करीत असतो, त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करावे.
दुर्वांचा वरचा हिस्सा तोडायचा असतो, संपूर्ण मुळासकट दुर्वा दुर्वा कधीच अर्पण करू नये, ही गोष्ट अत्यंत चुकीचे आहे. याशिवाय कमीतकमी 21 दुर्वा आपल्याला श्रीगणेशांना वाहिल्या पाहिजेत.
तसेच अनेक लोक भगवान श्री गणेशांना सफेद रंगाची फुले अर्पण करतात किंवा सफेद चंदन अर्पण करीत असतात, कारण भगवान श्री शिव शंकरांची ते पुत्र आहेत आणि म्हणून त्यांना आपण सफेद चंदन अर्पण करीत असतात.
मात्र ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, त्यामुळे भगवान गणेश हे नाराज होऊ शकतात. रोज संध्याकाळी गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष बोलावे. तसेच प्रत्येक बुधवारी दुर्वा अर्पण कराव्यात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.