उद्या संकष्टी चतुर्थीला खास आईने करा पूजेचं पाणी, मुले हुशार होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आज संकष्ट चतुर्थी आहे.या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा.

उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. हे एक काम्यव्रत आहे. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही ईच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते.

मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. हट्टी मुलांशी वागायचं कसं? हा पालकांसमोरचा मोठा प्रश्न आहे. पण त्यांचा हा हट्टी स्वभाव कमी करण्यासाठी पालकांनी लगेचच पाऊल उचलणंही गरजेचं आहे.

पण म्हणजे नेमकं काय करायचं, हे मात्र पालकांना सूचत नाही. बालमानसशास्त्रज्ञांनी मुलांच्या वयाच्या मानसिकतेचा विचार करुन पालकांना हट्टी मुलांशी वागण्याच्या सहज सोप्या युक्त्या दिल्या आहेत.मुलं हट्ट करणार आणि आई बाबा तो पुरवणार हा जणू निसर्ग नियमच आहे.

मुलांनी वयाप्रमाणे हट्ट करणं यात अतिशयोक्ती काही नाही. पण मुलांनी टोकाचा हट्ट करणं, पालकांना तो पुरवता न येणं, त्यामुळे पालकांची आरडाओरड आणि मुलांची रडारड असं चित्रं हट्टी मुलं असलेल्या घरात हमखास दिसतं. नुसतं घरातच नाही तर अशी मुलं जेव्हा आई बाबांसोबत बाहेर असतात

तेव्हाही नको त्या गोष्टीसाठी हटून् बसतात, आरडा ओरडा करतात. तेव्हा पालकांची स्थिती केविलवाणी होते.हट्टी मुलांशी वागायचं कसं? हा मोठा प्रश्न आहे. पण त्यांचा हा हट्टी स्वभाव कमी करण्यासाठी पालकांनी लगेचच पाऊल उचलणंही गरजेचं आहे. पण नेमकं काय करायचं हे मात्र पालकांना सूचत नाही.

पण बालमानसशास्त्रज्ञांनी मुलांच्या वयाच्या मानसिकतेचा विचार करुन पालकांना मुलांशी वागण्याच्या सोप्या सोप्या युक्त्या दिल्या आहेत.

मुलं हट्टी, रागीट, एकलकोंडी कोणत्याही स्वभावाची असो त्यांना योग्य मार्गावर आणायचा मार्ग एकच पालकांनी आपल्या वागण्यात काही महत्त्वपूर्ण बदल ते कसे?

मुलं टोकाची हट्टी असतील तर त्यांचा हट्टपणा कमी करण्यासाठी आई बाबा त्यांच्यावर ओरडतात, त्यांना मोठ्या आवाजात रागवतात. पालकांना वाटतं आपण आवाज मोठा केला की मुलं दबतील. पण होतं उलटंच. हट्टी मुलं पेटून उठतात.

त्यामुळे पालकांनी मुलांना जे समजून सांगायचं ते बाजूलाच राहातं आणि पालक-मुलांमधे नवीनच भांडण सुरु होतं. हे टाळण्यासाठी मुलं हट्ट करत असतील तेव्हा पालकांनी शांततेचं धोरण स्वीकारावं. त्यांच्याशी प्रेमाच्या सूरात बोलावं.

त्यांना समजुतीनं घेऊन काय बरोबर काय चूक यातला फरक शांततेनं समजून सांगावा.हट्टी मुलांचा वाद घालण्याचाही स्वभाव असतो. अशा वेळेस पालकांनीही या वादात उडी घेतली तर मुलांना नेहेमी वाद घालण्याची सवय लागते.

यासाठी मुलं हट्ट जरी करत असली तरी आधी पालकांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायला हवं. आपले आई वडील आपलं शांतपणे ऐकून घेत आहेत असं बघितल्यावर मुलांचा चढलेला आवाज खाली येतो.

मुलंही आई बाबा जेव्हा बोलतात तेव्हा वाद न घालता ऐकून घेण्याचा प्रयत्न करता. हे वारंवार व्हायला लागलं की काही काळानं मुलांचा हट्ट कमी व्हायला लागतो.

मुलं हट्टी असा शिक्का त्यांच्यावर लावून दिला की मुलांनी काही बोललं तर ते ऐकूनच घ्यायचं नाही अशी पालकांची अवस्था होते. त्यामुळे मुलांच्या मनातलं पालकांना समजत नाही. कधी कधी हट्टीपणा हा पालकांचं लक्ष वेधून घेण्याचा मुलांचा मार्ग असतो.

ते हट्ट करत असतात पण त्यांना सांगायचं वेगळंच असतं. आपल्या मनातलं नीट कसं व्यक्त करावं या गोंधळात ते असतात. त्यातून हट्टीपणा करत असतात. अशा वेळी मुलांना जवळ घेऊन त्यांचं शांतपणे ऐकून घेऊन त्यांना काय म्हणायचं आहे हे समजून घ्यावं.

मुलांशी समजुतीच्या भूमिकेतून बोलल्यास त्यांना काही त्रास होतोय का? त्यांना नेमकं काय व्यक्त करायचंय हे शोधणं ,समजून घेणं पालकांना सोपं जाईल.

प्रत्येक गोष्टीत हट्ट करणार्‍या मुलांना काही नियम घालून देणं गरजेचं असतं. वस्तू, खेळण्या , खाणंपिणं याबाबतचे हट्ट असतील तर अमूक वेळीच अमूक एक मिळेल असा नियम घालावा.

तो नियम तोडला तर शिक्षा होऊ शकते याची जाणीव त्यांना द्यावी. अर्थात मुलांसाठी ही शिक्षा कठोर नसावी. केवळ आपण जर नियम तोडला तर आपल्याला शिक्षा होते, आई बाबा ती करतात याची जाणीव मुलांना होते.

त्यामुळेही हट्टीपणातलं सातत्य कमी होतं.मुलं सारखी हट्ट करतात आणि आई बाबा त्यांचं काहीही ऐकून न घेता त्यांना सतत रागवत असतात. पण यामुळे मुलांचा हट्टपणा थोडीच कमी होणार आहे?

मुलांना बोलण्याचा , पूर्णपणे व्यक्त होण्याचा अवकाश पालकांनी द्यायला हवा. आपल्याला जे सांगायचंय ते मुलांचं पूर्ण बोलून झाल्यावर सांगावं. यामुळे आपलं आई बाबा ऐकून घेतात तसं आपणही आई बाबांचं ऐकून घ्यायला हवं हे मुलांना समजू लागतं.

बालमानसशास्रज्ञ म्हणतात की मुलांच्या वाईट गोष्टी सोडवण्याचा मार्ग पालकांच्या वागण्यातूनच मिळू शकतो.

याशिवाय आपल शास्त्र काही उपाय सांगते. रोज सकाळी देवपूजा झाल्यावर कोणत्याही प्रकारचा दिवा त्यात 2 वाती आणि मोहरीचे तेल, 2 काळी मिरी टाका. त्यानंतर दिवा लावताना कुलदेवतेचा जप करा. प्रार्थना करा की तुमचं मूल हट्टी न होण्यासाठी,

त्याचे दुरुगुन अवगुण बाहेर निघून जाण्यासाठी. हा उपाय खूप कामी येतो. मुलाचा स्वभाव नॉर्मल होईतोवर करत रहा. देव तुमचं भल करो. उद्या चतुर्थी दिवशी तुम्ही काही खास उपाय करा. यामुळे तुमची मुलं हुशार होतील. हट्टी पण कमी करतील.

तसेच मुलांना रोज ओम गणेशाय नमः बोलायला लावा. उद्या अथर्वशीर्ष बोलायला शिकवा. गणेशाची प्रार्थना बोलावी. उद्या गणपती बापांच्या मंदिरात त्यांना घेऊन जा. तिथे असणारी उदी लावा. फेऱ्या मारा. तसेच काही स्त्रोत्र पठण करा.. उद्यापासून रोज त्यांना गणेश स्तोत्र पठण करवून घ्या.

या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. देवाची करुणा भाकावी, त्याच्या सान्निध्यात राहावे, पूजा करावी, अभिषेक करावा. यामुळे पूजेत मन एकाग्र होते. बाह्य विश्वाचा विसर पडतो.

मुखी नाम यावे, याकरीता ‘ओम गं गणपतये नम:’ या मंत्राचा जप करावा. अथर्वशीर्ष पाठ असल्यास त्याची ११ किंवा २१ आवर्तने करावी. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तीभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही!

6 जुलै 2023 संकष्ट चतुर्थी असून १०. ०६ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. कापूर सोबत एक खोबऱ्याचा तुकडा जाळून ओवळताना ओम गणेशाय नमः बोला. संपेपर्यंत बोला.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!