नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, चातुर्मासात विवाह कार्ये, गृह प्रवेश, भूमी पूजन, मुंडन, तिलकोत्सव इत्यादी कार्ये केली जात नाहीत.चातुर्मासात थाळी सोडून पानांवर जेवणे करणे अत्यंत शुभ मानले जाते.
भगवान विष्णूच्या पूजेसाठी जी एकादशी सर्वात शुभ मानली जाते, त्याच पवित्र तिथीला म्हणजेच आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून भगवान विष्णू शयनसाठी क्षीर सागरात जातात.
ज्यानंतर कोणत्याही शुभ कार्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळणे थांबते. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार महिन्याच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.
याशिवाय आषाढ शुद्ध एकादशीस ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. कारण ‘त्या दिवशी देव झोपी जातात’, अशी मान्यता आहे. यानंतर भगवान कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी किंवा देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात.
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते, असे सांगितले जाते. यासह सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याणकारी असतात. चातुर्मासात विवाहमुहूर्त नसतात.
काही दिवसातच चातुर्मास सुरू होईल. चातुर्मास हा 4 महिन्यांचा असल्याने या 4 महिन्यास आपण काही उपाय किंवा गोष्टी तसेच श्री स्वामीची सेवा केल्यास आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील.
त्यामुळे ही सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होते.घरात पैसा,सुख-समृद्धी येते.आपण येत्या आषाढी एकादशी किंवा पौर्णिमा या दिवसापासून चातुर्मासाची सेवा सुरू करू शकतो.
ज्या महिलांना सोळा सोमवार व्रत करायचे असेल तर, त्यांनी आषाढी एकादशी किंवा गुरु पौर्णिमेपासून सोमवार व्रत सुरू करू शकता. याशिवाय कार्तिकी एकादशीला या सोमवार व्रताचे उद्यापन करू शकतो.
तसेच गुरुपौर्णिमेच्या आधी 7 दिवस गुरुचरित्र पारायण केल्यास,स्वामींची कृपादृष्टी राहण्यास मदत होईल.
यासह चातुर्मासच्या चार महिन्यात म्हणजे आषाढी एकादशीपासून घरातील सर्व सदस्यांनी सकाळी लवकर उठून अंघोळ आणि पूजा करावी.तसेच या सगळ्या सदस्यांनी आपल्या घरातील कृष्ण, बाळकृष्ण याची पूर्ण श्रद्धेने पूजा करून ,त्यावर एक तुळशीचे पान अर्पण करावे.त्यामुळे बाळकृष्ण प्रसन्न होतात.
तसेच नियमितपणे रोज स्वामी समर्थांचा एक माळ जप करावा आणि कमीत कमी स्वामी चरित्र सारामृतचे 3 किंवा 1 तरी अध्याय वाचावा.हे वाचन 4 महिन्यापर्यंत आपण करावं.
याशिवाय चातुर्मासात 4 महिन्यांमध्ये गणेशपुराण ,शिवलीलामृत ,स्वामीचरित्र, गुरुचरित्र ,भक्ती लीलामृत ,हरिपाठ, व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णुसहस्त्रनाम यापैकी कोणतेही पवित्र ग्रंथाचे 4 महिने वाचन करावे म्हणजे चार महिने स्वामींची सेवा आपण करत राहावे.
हे वाचन आपल्या इच्छेनुसार सकाळ किंवा संध्याकाळ करावे. याशिवाय ही 4 महिने मांसाहार करू नये आणि घरात जास्तीत जास्त साफसफाई करावी.यापैकी कोणतीही एक सेवा आपण येत्या चातुर्मासात करावी.
त्यामुळे आपल्याला खूप लाभ होईल. जास्तीत जास्त पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी, आपल्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी तसेच देवाची भक्ती जास्तीत घडण्यासाठी हा चातुर्मास महिमा सांगितला जातो.
भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या भक्ताने चातुर्मासात चुकूनही पलंगावर झोपू नये आणि पत्नीशी संबंध प्रस्थापित करु नये. चातुर्मासात मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. तसेच, गुळाचे सेवन करू नये.
चातुर्मासात मांस-मद्य आणि दुसर्याने दिलेला दही-भात खाऊ नये. मुळा, परवल आणि वांगी इत्यादी भाज्याही चातुर्मासातही खाल्ल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत संपूर्ण चातुर्मास दरम्यान या सर्व भाज्यांचा त्याग करावा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.