नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात.
भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवतात
आषाढी एकादशीचे विधी : आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपास करावयाचा असतो. विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी.
पांडुरंगाची मूर्ती असल्यास पीतांबर नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला झोपवावे, असा विधी आहे.
या दिवसापासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे त्यागले जाते. काही मंडळी हे चार महिने परान्न सेवन करत नाहीत.
काही मंडळी एकभुक्त राहतात. काही जण नक्तव्रत म्हणजे केवळ रात्रीचे भोजन करतात. या साऱ्या व्रतांना ‘गोविंदशयन व्रत’ असे एकच नाव आहे.
या एकादशीला पद्मा एकादशी असेही एक नाव आहे.फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी, प्रजेची काळजी घेणारा होता.
सुख समृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले.
त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले.
राजाने हे व्रत मनोभावे केले. त्यायोगे वरुणराजाने कृपा केली. योग्यवेळी हवी तशीच पर्जन्यवृष्टी झाली. मांधात्याच्या राज्याला पुन्हा सुख समृद्धीचे, आनंदाचे दिवस प्राप्त झाले.
मांधाता राजावर जशी कृपादृष्टी झाली, तशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे,
तर संपूर्ण जगाला आनंदाने, समाधानाने न्हाऊन टाकावे अशी प्रार्थना करूया. देवशयनी एकादशीचे व्रत करून भगवान श्रीहरींची विधिवत पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात
आणि त्यांच्या कृपेने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात, त्यानंतर भगवान शिवांवर विश्व चालवण्याची जबाबदारी येते.
यावेळी एकादशीला शुक्ल आणि ब्रह्मयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढते. हे व्रत केल्याने मनुष्य मृत्यूनंतर वैकुंठधाम प्राप्त करतो. त्यामुळे या दिवशी अशी काही कामे आहेत
जी प्रत्येकाने करावीत. ही कामे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते.भगवान विष्णू या दिवशी ४ महिने झोपतात,
म्हणून झोपण्यापूर्वी त्यांना हंगामी फळे, मिठाई, अन्नधान्य अर्पण करा. देवाला प्रार्थना करा की हे भगवान गोविंद,विष्णूदेवा दिलेली वस्तू तुम्हाला समर्पित आहे,
ती प्रेमाने स्वीकारा आशीर्वाद द्या आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेवा.भगवान विष्णूची पूजा सकाळी आणि रात्री करावी आणि शक्य असल्यास दान करावे.
दान केल्याने नेहमीच सुख समृद्धी येते. रात्री जागरण करताना भगवान विष्णूची कथा, विष्णु सहस्रनाम आणि विष्णु पुराणाचे पठण करावे.
जो असे करतो तो मागील जन्माच्या पापकर्मांच्या बंधनातून मुक्त होऊन वैकुंठधामाला जातो.भगवान विष्णू योगनिद्रामध्ये चार महिने राहतात,
म्हणून त्यांच्यासाठी एक सुंदर आणि मऊ पलंग तयार करा आणि पलंगावर लाल कपडा टाकून उशी घेऊन झोपवा. तसेच त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करा
आणि मंत्रोच्चार करा. जर मंत्र येत नसेल तर फक्त हरीचे नाव घ्या. तसेच देवाला प्रार्थना करून म्हणा की हे परमेश्वरा, तुमची कृपा सदैव आमच्या पाठीशी राहो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.