घरच्या घरी पौर्णिमेपासून 11,21, 51 दिवस करा हे सेवा, यामुळे 7 पिढ्यांची गरिबी संपून जाईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सध्या अधिक महिना चालु आहे. हा महिना धार्मिक कार्य सुरू करण्यासाठीचा महत्वाचा महिना समजला जातो. या महिण्या पासून बहुतांश सर्वच धार्मिक लोक भगवान श्री सत्यनारायण देवतेची पुजा, म्हणजेच घरी सत्यनारायण करतात. त्यासाठी बहुतेक सर्वच ब्राम्हणच्या मागे भक्तांची वर्दळ लागलेली असते.

सण असेल तरच नव्हे ; तर जे लोक धार्मिक आहेत , ते महिन्याच्या प्रत्येक पोर्णिमेला घरात सत्यनारण पुजा करतात . किंवा काही शुभकार्य असेल तेव्हाही आपल्या घरात सत्यनारायणाची पुजा केली जाते. सत्यनारायण पुजे मुळे घरात प्रसन्नता नांदते आणि घरातील वातावरण प्रफुल्ल राहते.

सत्यनारायणाची पुजा इच्छापुर्ती साठी घातली जाते. तर सहसा लोक ही पुजा घरात शांती, सुख, धन प्राप्तीसाठी देखील करत असतात. घरात सत्यनारायन पुजा केल्याने नवग्रह तृप्त होतात आणि घरातील सदस्यांना समाधान लाभते .

ईच्छापूर्ती साठी आणि ईच्छा पूर्ती नंतर सत्यनारायन पुजा करण्याचा प्रघात आहे . त्या साठीच आजच्या या घरच्या घरी सत्यनारायन पुजा काशी करावी , या लेखाचा आपणास नक्कीच फायदा होईलही पुजा काही लोक ब्राम्हण बोलवुन करतात तर काही लोक घरच्या घरी करतात. या पुजे साठी पाण्याचा तांब्याचा कलश, चौरंग, केळीच्या झाडाचे पाच खांब. भगवान श्री सत्यनारायन देवतेचा फोटो अथवा श्रीकृष्णाची मुर्ती लागते.

शालीग्राम जर तुमच्या रोजच्या पुजेत असेल तर तोसुध्दा या पुजे मध्ये ठेवावा लागतो. गहु, तांदुळ देखील लागतात. नवग्रहांच्या 9 सुपार्‍या लागतात. प्रसादासाठी रवा, साजुक तुप, साखर हया साहित्या पासुन बनवलेला शिरा आणि त्या शिर्‍यावर केळी चे बारीक काप टाकावे.

पुजेमध्ये अटी शर्ती तशा काही नाहीत फक्त ही पुजा मनोभावे करावी लागते. वर्षभरातुन एकदा तरी ही पुजा घालावी. याने निश्चित फळ प्राप्त होवुन घरात सुख-समृध्दी नांदते . सत्यनारायणाची पुजा घरात घातल्याने सौभाग्य नांदते धनलाभ होतो. सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णु यांची पुजा या व्रतामध्ये केली जाते. या व्रताने घरातील आप आपसातील वाद देखील मिटतात आणि घरात सुख खेळते राहते.ही पुजा करायची असल्यास खालील साहित्य घेऊन व्यवस्थित योग्य प्रकारे पूजेची मांडणी करावी.

1. वर नमुद केल्या प्रमाणे सर्व साहित्य सत्यनारायणा च्या पुजेच्या एक दिवस आधीच घरात आणुन ठेवावे.घरातील जे यजमान पुजा करणार आहेत , त्यांनी सोवळे नेसुन अंगावर उपरणे ओढावे , स्वच्छ हात पाय धुवून हे वस्त्र परिधान करावे.

4. पश्चिम किंवा पुर्व दिशे कडे चौरंग मांडावा , त्याला मागे 3 आणि समोर 2 असे केळीचे खांब बांधावे ,उत्तर – दक्षिण दिशेकडे चौंरगाचे तोंड नसावे. आणि पुजेला बसणा-या यजमानाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे. पुर्व-पश्चिम अशाप्रकारे चौंरग मांडावा.

5. चौंरगा वर एक वस्त्र अंथरावे ,घरातील कोरे ब्लाउज पीस असेल तरी चालेल आणि दोरीच्या किंवा सुतकीच्या साहाय्याने केळीचे खांब चौंरगाच्या चारही बाजुला बांधून घ्यावे.

6. त्यानंतर चौंरगावर अंथरलेल्या ब्लाउज पीस वर किंवा वस्त्रा वर श्रीविष्णुंचा फोटो ठेवावा. फोटोला वस्त्रमाळ घालावी, अष्टगंध लावावा आणि झेंडूच्या फुलांचा किंवा इतर कोणत्याही फुलांचा हार श्रीविष्णुंच्या म्हणजे सत्यनारायण देवतेच्या फोटोला घालावा .त्यांनतर चौरंगाच्या भोवताल घरातील गृहीणीला स्वच्छ आणि सुरेख अशी रंगाने भरलेली रांगोळी काढण्यास सांगावी. रांगोळीने श्री सत्यनारायण नाव चौरंगाच्या पुढयात काढावे .

8. त्यांनतर मग यजमानांनी एक आसन घेउन चौंरगा समोर बसावे. सर्व प्रथम तांब्याचा कलश घ्यावा त्याला कुंकू लावावे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावे.मग त्या पाण्या मध्ये हळद कुंकू टाकावे आणि एक लक्ष्मीचे चित्र असलेला चांदीचा शिक्का त्या पाण्या मध्ये टाकावा आणि कलशाला पांढ-या दो-यांनी पाच वेढे बांधावेत

आणि कलशात 5 नागिलेचे पाने अर्धवट घालावी .10. आणि मग श्रीविष्णुच्या फोटोसमोर थोडेसं तांदुळ टाकावे आणि त्या तांदळामध्ये कलश रोवुन ठेवावा. आणि त्या पाण्याच्या कलशावर नारळ ठेवावा. त्यालाच फुलांचा छोटा हार करून घालावा. अशा प्रकारे कलश पुजा करावी .

11. त्यानंतर कलशाच्या बाजुला केळी तसेच पाच कोणतेही फळ ठेवावे. केळी, चिकु, डाळिंब असे फळ कलशाच्या एका बाजुला ठेवावेत आणि त्या फळांवर फुल ठेवावे.12. कलशाच्या समोर थोडे थोडे तांदुळ टाकुन त्यावर नऊ सुपा-या ठेवाव्यात. त्या सुपा-यांवर हळद कुंकू वहावे , फुल वहावे यालाच नवग्रहाची पुजा म्हणतात.

13. त्यांनतर समोर एक ताम्हण घ्यावे त्या ताम्हणात एक सुपारी घ्यावी. त्या सुपारीवर आधी पाणी टाकावे. त्यांनतर दुध टाकावे आणि त्यांनतर परत पाणी टाकावे. आणि ती सुपारी वस्त्राने स्वच्छ पुसून घ्यावी आणि सर्वात समोर ठेवुन त्यावर हळद कुंकू , दूर्वा ,अक्षदा वाहाव्यात.

ही सुपारी म्हणजेच गणपतीचे प्रतीक म्हणून कोणतीही पुजा करायच्या आधी पूजली जाते .अशी सुपारीची पुजा करून घ्यावी म्हणजे गणपतीची पुजा झाल्यासारखे होते.त्यांनतर मग त्याच ताम्हणा मध्ये श्रीकृष्णाची [बाळकृष्ण] मुर्ती घ्यावी. श्रीकृष्णाची मुर्तीची पुजा देखील गणपतीची पुजा केल्या प्रमाणे करावी आणि त्यांनतर श्रीकृष्णाची मुर्ती कलशाच्या समोर ठेवुन गंधफुल वाहावे.

15. त्यांनतर त्यांना वस्त्रमाळ वाहाव्यात आणि मग समोर मोठी समई ठेवुन त्यामध्ये तेल टाकुन दिवा लावुन ठेवावा. तसेच दुसर्‍या दिव्यात अजून दोन वाटी घालून तुपाचा दिवा लावावा .16. कृष्णाच्या मूर्तीला तुलसीच्या मंजुळा वाहाव्या.

17. हे सर्व झाल्यावर सत्यनारायणाची पोथी घेउन यातली सत्यनारायणाची कथा पुर्ण वाचुन घ्यावी. आणि कथा वाचल्यानंतर निरंजन लावुन सर्वप्रथम गणपतीची आरती म्हणावी. आणि मग श्री सत्यनारायन ची आरती म्हणावी. या दोन आरत्या करून बाकीच्या तीन कोणत्याही आरत्या कराव्यात.

18. त्यांनतर कापुर टाकुन कापुर आरती म्हणून पुजा संपन्न करावी.सत्य नारायण पुजा केल्याने घरात शांति, समाधान आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, त्यामुळे कमीत कमी वर्षातून एक वेळेस तरी सत्यनारायण पुजा करावीच.

पौर्णिमेपासून तुम्ही रोज करू शकता संकल्प करून 11,21 किंवा 51 दिवस करू शकता. पूजा अगदी पूर्ण विधिवत विशेष तिथींना करा, रोज तुम्हाला शक्य होईल तितकीच करा पण करा. संकल्प पूर्ण होऊ पर्यंत करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!