30 घरगुती रामबाण उपाय जे ठेवतील तुमच्या कुटुंबाला नेहमीच आनंदी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अशांत आणि ताणग्रस्त गृहस्थी जीवन कोणत्याही माणसाच्या मनावार आणि कामावर वाईट प्रभाव टाकते. यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्व आणि चरित्रातही नकारात्मक परिणाम दिसून येतात.

म्हणूनच शास्त्रांनी गृहस्थ धर्मात सुखी जीवनासाठी मर्यादा आणि अनुशासन आवश्यक मानले आहे. शास्त्रात गृहस्थी जीवनासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या कामांविषयी मार्गदर्शन केल्याचे आढळते.

गृहस्थी व्यक्तीने आळस त्यागून ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या आधी उठून धर्म आणि अर्थ या दोन्ही विषयांचा विचार केला पाहिजे. दिनचर्या निश्चित केली पाहिजे. शरीर आणि मनाची शुद्धी महत्त्वाची आहे.

दात घासणे, शौच आणि आंघोळ करणे आवश्यक आहे. शरीरातून अनेक विषारी पदार्थ बाहेर पडत असतात. यापासून रोग उत्पन्न होतात. रोग मनाला कमकुवत बनवितात. आंघोळीने रोग, शोक, दु:ख दूर होतात.

गंगा स्रान सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे.मनाच्या शुद्धीसाठी गृहस्थीने संध्या, उपासना, सूर्य पूजा, गायत्री मंत्राचे पठण, तर्पण, देव उपासना आदी उपाय केले पाहिजेत. धार्मिक दृष्ट्या पुण्य मिळावे म्हणून तर या गोष्टी आवश्यक आहेतच. शिवाय व्यावहारिकदृष्ट्या ताणमुक्त आणि तंटामुक्त राहण्यासाठीही या गोष्टी आवश्यक आहेत.

अशा रीतीने शरीर शुद्धी आणि देवस्मरणाच्या उपायाने अंत:करणशुद्धी होऊन शक्ती, ऊर्जा मिळते. आजच्या गतिमान जीवनात वेळ काढून गृहस्थींनी हे नियम आणि संयम पाळणे गरजेचे आहे. यामुळे घरातील सदस्यांनाही सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण मिळेल. गृहस्थीच्या मनात समन्वय, प्रेम, विश्वासाची भावना कायम राहील.

रात्री झोपताना पलंगाच्या शेजारी थोडे पाणी ठेवा. तेच पाणी आड वळणावरच्या मोठ्या झाडाला टाकावे. यामुळे घरातील भांडणे, अपमान, रोग, द्वेष किंवा इतर कोणत्याही वाईट गोष्टींपासून नेहमीच संरक्षण मिळेल.

आपण जेवणाआधी एक नैवेद्य जसा देवाला ठेवतो, तसा आणखी काही भाग गाय, कावळा, कुत्रा यांच्यासाठी बाजूला ठेवावा. त्यांच्या रूपाने सर्व जीवात्मा तृप्त होऊन कौटुंबिक सुख-शांती लाभते.

प्रत्येक सोमवारी गंगाजलमिश्रित पाण्याने शिवाला अभिषेक करावा. त्याची व्यवस्थित पूजा केल्यानंतर १०८ वेळा ओम नमः शिवाय जप करावा. असे केल्याने वैवाहिक जीवनात सुसंवाद राहतो. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात मतभेद आहेत त्यांनी रोज सुंदरकांडचा पाठ करावा. शुक्ल पक्षातील कोणत्याही मंगळवारपासून सुंदरकांडाचा पाठ सुरू करता येतो.

प्रदोषाच्या दिवशी गुळाचे शिवलिंग बनवून त्याची यथायोग्य पूजा करा आणि ते शिवलिंग दान करा. असे केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

‘सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते’ रोज या मंत्राचा एक जप केल्याने कौटुंबिक नात्यात मधुरता वाढते.

ज्या महिलांना वैवाहिक सुखात स्थिरता हवी आहे, त्यांनी यासाठी गुरुवारी व्रत पाळावे. व्रताच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी. गूळ आणि हरभरा अर्पण करून भगवान विष्णूची पूजा करावी आणि पिवळे फूल अर्पण करावे. असे केल्याने वैवाहिक जीवनात सुखाचा वर्षाव होईल.

ज्या खोलीत पती-पत्नी झोपतात त्या खोलीचा रंग हलका गुलाबी किंवा हलका हिरवा असावा. कधीही गडद रंग वापरू नका. हलका गुलाबी आणि हलका हिरवा रंग आनंददायी मानला जातो आणि रंग तणाव कमी करण्यास आणि भागीदारांना जवळ आणण्यास मदत करतात.

ज्या खोलीत पती-पत्नी झोपतात त्या खोलीत देव-देवतांचे चित्र लावू नका. जोडप्याने वाहत्या पाण्याचे मोठे चित्र त्यांच्या पायाकडे लावावे. वाहणारे पाणी हे प्रेमाचे प्रतीक आहे.वास्तूनुसार मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते कारण ते शुक्राचे प्रतीक आहे.

त्यामुळे पती-पत्नीचे नाते गोड होते आणि त्यांच्यातील प्रेम वाढते.सुकलेले आणि काटेरी फूल तुमच्या बेडरूममध्ये कधीही ठेवू नका. त्यामुळे पती-पत्नीमधील तणाव वाढतो.

वर्षातून एकदा सर्वांनी एकत्र देव दर्शन किंवा फिरायला जावे.स्वभाषा शुद्ध बोलणे.. टिकवणे. यासाठी मुलांसोबत वेळ घालवून शिकवावे. स्वभूषा- भारतीय वेश सणाच्या दिवशी तरी वापरणे.

भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न करावा. भारतीय भोजन पदार्थ, ऋतू चक्र, त्यानुसार बदल, आरोग्य याबाबत स्वतः समजून घेणे व पुढील पिढीला त्यामागचे शास्त्र सांगणे.

रूढी परंपरा म्हणून ज्या गोष्टी असतात त्यामागील शास्त्र समजून मगच करणे, काळानुरूप आता बंद केल्या पाहिजेत अशा रूढी परंपरा बंद करणे. रोज स्नान, व्यायाम, ध्यान यासाठी आग्रह ठेवणे स्वतः सुरु करून घरातील इतरांना आग्रह.

स्वच्छता कर्मचारी, वर्तमानपत्र दूध वाटप करणारे, भाजी विक्रेते, आदी नियमित आपल्याला भेटणाऱ्यांशी आदराने वागणे, खुशाली विचारपूस करणे, घरातील समारंभ यांचे निमंत्रण देणे.

कुटुंब मित्र बनणे म्हणजे आपल्याला आवडणारी २-४ कुटुंब निश्चित करून सहपरिवार महिन्यातून किमान एकदा त्यांच्या घरी सहज जाणे त्यांना आपल्या घरी बोलावणे, नियमित भेटीतून सुख दुःख वाटता येईल अशी नाती निर्माण करणे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!