नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, नवरात्र हा हिंदू धर्मातील जनतेद्वारा साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण खोट्या, वाईट गोष्टींवरील सत्याचा विजय दर्शवतो. नवरात्र म्हणजे आदिमाया, आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. या काळात भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो. हिंदू धर्मानुसार नवरात्र वर्षातून दोनदा साजरे केली जाते.
पहिली नवरात्र चैत्र महिन्यात साजरी केली जाते आणि दुसरी नवरात्र अश्विन महिन्यात साजरी केली जाते. म्हणजेच पहिली नवरात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात साजरी केली जाते आणि ऑक्टोबरमध्ये दुसरी.
नवरात्र नऊ दिवस सतत चालू असते. ज्यात देवीच्या विविध रूपांची लोक भक्तीने पूजा करतात. भारतातील नवरात्र वेगवेगळ्या पद्धतींनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरी केली जाते. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात.
नवरात्रीच्या नऊ दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो. अखंड नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा, पूजा, आरती केली जाते. वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात. घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापना केला जातो.
एका भांड्यामध्ये काळी माती ठेऊन या मातीमध्ये नऊ धान्य पेरतात. त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवला जातो. या घटात आंब्याची किंवा विड्याची पाने गोलाकार ठेवतात. त्यावर नारळ ठेवला जातो.
देवीपुढे अखंड दिवा तेवत ठेवला जातो. समोर देवीचे ताट ठेवतात. त्याच्यापुढे ५ फळे ठेवली जाते. या घटाला झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते.नऊ दिवसानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा असे ही म्हणतात.
दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे. असत्यावर सत्याच्या विजयचा प्रतीक आहे म्हणजे दसरा होय. या दिवशी आपट्याची पाने आणतात. आपट्याची पाने मित्र मंडळींना, गुरूंना, मोठ्या माणसांना देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात.
या दिवशी शुभमुहूर्तावर नवीन कामे हाती घेतली जातात. यादिवशी पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा केली जाते. सरस्वतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच यादिवशी व्यापारी, कामगार आपल्या शस्त्रात्रांची पूजा करतात.
इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू मूर्ती अथवा तस्वीरीमधील पायापासून डोक्यापर्यंत १०८ वेळेस वाहिल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात.देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?
देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्या पर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, श्री सुक्त, देवी स्तुती किंवा नवार्ण मंत्र या गोष्टींचा वापर करावा.
अष्टमी ,चतुर्दशी, पौर्णिमा ,नवरात्र ,लक्ष्मीपूजन , मंगळवार ,शुक्रवार, पोर्णिमा गुरु पुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे,अमावस्येला कुंकुमार्चन करु नये.
आश्विन नवरात्रात सप्तशती चे पाठ वाचण्या पूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे. कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते.
जागृत मूर्ती तील शक्ती तत्त्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. मूळ कार्यरत शक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे.
शक्ती तत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवात “शक्तीतत्त्व” आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते.
जागृतमूर्तीतील शक्तीतत्त्वकुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारे कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत भरून ठेवावे.
कार्यसिध्दीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू, देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटावे. हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळावर लावावे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.