नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ,शुभ वेळी आपण नक्कीच असा एक उपाय करावा ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. आपल्या घरात लक्ष्मी येत नसेल, ती टिकत नसेल तर लक्ष्मीचं आगमन शुभ मानणारा असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे,
हा उपाय केल्यानंतर आपल्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि धन आपल्या घरात टिकून राहील. लक्ष्मी म्हणजे जगणं, लक्ष्मी म्हणजे ईश्वर, लक्ष्मी म्हणजे सर्वकाही होय. यासाठी फार विशेष सामान आपल्याला लागणार नसून जे आपल्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असत .
आपल्या देवघरात ज्या वस्तू असतात त्याच लागतील. पहिली वस्तू म्हणजे अक्षता, तांदूळ जे अखंड असतील, फारसे तुटलेले नसतील, या पिठोरी अमावस्येस , सोमवती अमावस्येस वाटीभर अक्षता म्हणजेच न तुटले फुटलेले तांदूळ घ्यायचे आहेत
आणि सोबत कापराच्या दोन ते तीन वड्या सुद्धा घ्या. अशी सामग्री आपण घ्यायची आहे. या अमावस्येच्या कालावधीतच आपण हा उपाय करायचा आहे. यासाठी आपण वाटीभर अक्षद आणि त्यावरती कापराच्या दोन ते तीन वड्या ठेवायचे आहेत .
ही सामग्री घेऊन आपल्या देवघरासमोर बसून समोर वाटी ठेवावी, मनोभावे हात जोडून भगवान श्रीहरी श्रीविष्णूंना प्रार्थना करा की आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभो, आपले पितर याचा अर्थ आपल्या घरातील ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे,
ज्या व्यक्ती आज आपल्यामध्ये नाहीत, अशा आपल्या व्यक्तींना, मृत व्यक्तींना आपण आपले पूर्वज म्हणतो. या पितरांचे आशीर्वाद लक्ष्मी कृपेसाठी, जीवनात धनवान बनण्यासाठी , श्रीमंत बनण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानले आहेत.
वास्तुशास्त्र-ज्योतिष शास्त्राने सांगितले आहे की आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी प्रार्थना करावी. आपल्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील की ज्यामुळे आपले पितर आपल्यावर अप्रसन्न आहेत,
नाखुश आहेत, तर त्या चुकांची माफी आपण तिथे पितृदेवो भव म्हणत, म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू या जगाचे पालनहार आहेत त्यांच्या पुढे आपण करायची आहे अशी प्रार्थना.
हे सर्व करत असताना एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा त्याठिकाणी प्रज्वलित असेल याची मात्र काळजी घ्या . त्यानंतर ही वाटी त्या अक्षत आणि कापरासहित आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायची,
आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठा असावा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या उंबरठ्याबाहेर आपण ही वाटी ठेवा, अगदी रात्रभर ती वाटी त्याच ठिकाणी ठेवायची आहे,
तिला कोणीही स्पर्श करू नका , ओम नमः शिवाय , ओम नमः शिवाय हा मंत्र जास्तीत जास्त वेळा बोला. 11 , 21, 51 , 108 किती वेळा जमू शकते तितक्या वेळेस बोला.
ओम पितृभ्यो नमः…
हा मंत्र दक्षिण दिशेकडे आपल मुख करून हा मंत्र बोललात तर अति उत्तम होईल . आपल्या पितरांना प्रार्थना करा की आमच्या हातून कळत नकळत ज्या चुका घडल्या असतील ,
त्यांची आम्ही माफी मागतो, क्षमा मागतो, आमच्या जीवनात आपण धन, वैभव, पैसा येण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर कराव्यात. रात्रभर ही वाटी त्याच ठिकाणी ठेवा आणि अमावस्या संपल्यानंतर,
तुम्ही कापराची वडी प्रज्वलित करायच आहे, कापराच्या वड्या दोन ते तीन घ्या आणि तो कापूर जाळा, तांदूळ थोडेसे जळतील, सूर्योदय झाल्यानंतर म्हणजेच सूर्य उगवल्यानंतर हे ज्या ठिकाणी पक्षी आहेत,
चिमणी असतील , एखाद्या झाडाच्या छायेत म्हणजेच सावली मध्ये हे तांदूळ फेकायचे आहेत बसवायचे आहेत, जेणेकरून पक्षी त्यांना ग्रहण करतील, ते दाणे हे जे पक्षी हे दाणे खायला येतात लक्षात घ्या तुमचे पित्र ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे,
त्यांच्या काहीतरी इच्छा आकांक्षा अपेक्षा अपूर्ण असतात, आणि ते जर आपल्या हातून पूर्ण होत नसतील उमजत नसतील त्यांच्या महत्त्वाकांक्षा ज्या होत्या त्या पूर्ण करण्याचा जा प्रयत्न असतो. हा उपाय पितरांना प्रसन्न करणारा आहे.
जेव्हा पितर अप्रसन्न होतात, आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते, त्यामुळे प्रत्येक अमावस्येस आपण आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय जसे की
दहीभात असेल दहीभात आपण घराबाहेर ठेवतो किंवा छतावरती ठेवतो, अशा प्रकारचे तांदळाचे दाणे टाकतो आणि हे पक्षी आहेत यात आपले पितर येत असतात. असा हा उपाय नक्की करावा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.