नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर कोणी तुमच्यावर काही केलेला असेल, तर ती काहीही आणि त्यामुळे तर तुमची प्रगती होत नसेल. लोक जीवनात आनंद मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करतात, परंतु जर नकारात्मक ऊर्जा त्यांच्या घरात राहिली तर प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरतो.
यामुळे वास्तुशास्त्रात घराच्या ऊर्जेला खूप महत्त्व देण्यात आले आहे. यासह, नकारात्मक ऊर्जा ओळखून त्याचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी उपाय देखील देण्यात आले आहेत.
हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात घरातील कोपर्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे उपाय सांगण्यात आले आहे.
त्यामुळे तुम्ही या पाच गोष्टी केल्यास,तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होण्यास सुरुवात होईल.
निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा होय. त्याच्याकडील चारी बाजूनी वातावरण नकारात्मक बनलेले असल्यामुळे,
तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे फक्त वाईट आणि नकारात्मक बातम्या येताना दिसत आहे,मग अशा वेळी आपले विचार सकारात्मक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी खेळती ठेवणे, हे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे योग्य दिशेने प्रयत्न करून,आपण नक्कीच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकतो. तुम्ही जर या काही गोष्टींचा वापर केल्यास,
तर तुम्ही घरात नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता. जर तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली, तर ते शुभ मानले जात।याशिवाय असे म्हणतात की,श्री गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे, म्हणून त्याची मूर्ती मुख्य प्रवेशद्वारावर ठेवणे शुभ मानलं जातं.
दुसरी गोष्ट म्हणजे,तुमच्या घरात तुळशीचे रोप लावले तर, माता तुळस घरातील सर्व नकारात्मक विचार आणि ऊर्जा नष्ट करते. तसेच असापासच्या वातावरणात ऑक्सिजन पुरवठा करीत असते.
तसेच तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे, तुळशी जवळ रोज संध्याकाळी दिवा लावाला पाहिजे.
त्यामुळे तर आणखी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते.
तिसरीची गोष्ट म्हणजे,
तुमच्या घराच्या आजूबाजूला जर सुकलेली झाडे असतील, तर लगेच काढून टाका. कारण अशी झाडं निगेटिव्ह एनर्जी निर्माण करीत असतात. त्यामुळे घराच्या आजूबाजूला प्रसन्न वातावरण असणे ,खूप गरजेचे आहे ती गोष्ट नक्की केली पाहिजे.
पुढील गोष्ट म्हणजे, जर तुमच्या घरात कुठे लिकेज होत असेल, तर त्याचा बंदोबस्त लगेच केला पाहिजे. कारण या लिकेज मुळे त्या ठिकाणी निरनिराळ्या आकृत्या तयार झाल्या असतील, तर वास्तुशास्त्रा प्रमाणे ते अत्यंत अशुभ मानले जाते.त्यामुळे याचा बंदोबस्त लगेच केला पाहिजे.
पाचवी गोष्ट म्हणजे, तुम्हाला जर गालिचे आवडत असतील, तर त्यांने घर सजवा कारण त्यामुळे तुमच्या घराच्या सौंदर्यात भर पडेल आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
सहावीची गोष्ट म्हणजे,मीठ. मीठ हे घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करत असतं, एका भांड्यात थोडेसे मीठ घेऊन पूर्व घराच्या पूर्व दिशेला ठेवल्यास आणि दर आठवड्याला हे मीठ बदल्यास,यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
सातवीची गोष्ट म्हणजे, बरेच जण आपल्या घराच्या खिडकीतून काही अशा गोष्टी दिसतात आणि त्रास होतो,यामध्ये कचरा, उकिरडा यासारख्या वस्तू दिसतात,त्यामुळे सतत परदे लावून ठेवावे. जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही.
यामुळे घरातील एनर्जी दूर करण्यासाठी खूप मदत होईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.