नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी आषाढी किंवा देवशयनी एकादशी नावाने ओळखली जाते. तर वद्य पक्षात येणारी एकादशी कामिका एकादशी नावाने ओळखली जाते. संपूर्ण मराठी महिन्यात २४ एकादशी येतात.
एखाद्या वर्षी अधिक महिना आल्यास दोन एकादशी यात जोडल्या जाऊन त्या वर्षी २६ एकादशी येतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत.
तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. हिंदू धर्मात एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे.
प्रत्येक एकादशीला उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने केले जाते. प्रत्येक एकादशीला विष्णूपूजन करण्याची परंपरा आहे.
कामिका एकदशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर श्रीविष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा.
श्रीविष्णूंचे आवाहन करून त्यांची स्थापना करावी. श्रीविष्णूंच्या मूर्ती किंवा प्रतिमेवर पंचामृताचा अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत.
यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. तसेच ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्रांचा जप करावा.
तुळशीला 108 प्रदक्षिणा घालून हा मंत्र बोला. शक्य नसेल तर जप करता करता स्वतः भोवती प्रदक्षिणा घालावी. व्रतदिनी सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूणयुक्त पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये झाली की,
एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये.
रात्री झोपताना शक्यतो जमिनीवर झोपावे. सोबतच काही विशेष उपाय केल्यास आपल्याला लाभ होईल. पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो, या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाला विषम संख्येत प्रदक्षिणा घाला व नमस्कार आणि प्रार्थना करा.
तसेच तांब्याच्या धातूच्या तांब्यात कच्चे दूध घेऊन अर्पन करा, झाडाखाली एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा ज्यामुळे तुमचं कर्ज लवकर फिटेल, मार्ग निघेल, धनाची समस्या निघून जाईल.
गाईच्या कच्या दुधात केसर घालून श्रीहरी विष्णूंना अभिषेक घाला ज्यामुळे तुमचं भाग्य उजळेल. आपल्या जीवनातील संकटे निघून जाण्यासाठी आपण नक्कीच या सर्व गोष्टी या कामीका एकादशीला करा. शक्यतो व्रतस्थ रहा, नसेल तर भात किंवा तांदळाचे पदार्थ वर्ज्य करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा, दान धर्म करावा.
गुरुवार,13 जुलै, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी असून ती कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते. त्यास पवित्रा एकादशी असेही म्हणतात. यावेळी कामिका एकादशी विशेष आहे कारण ती केवळ गुरुवारीच भगवान विष्णूला समर्पित दिवस आहे.
या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवतांचीही पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या दानधर्माला अधीक महत्व आहे. असं म्हणतात की कामिका एकादशीची कथा श्रीकृषष्णाने धर्मराज युधिष्ठिरास सांगितली होती.
या आधी वशिष्ठ मुनींनी दिलीप राजास सांगितली होती. ही कथा ऐकून त्यांना पापांपासून मुक्ती मिळाली आणि मोक्ष प्राप्तीी झाली. कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून.
त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूचे ध्यान केल्यावर कामिका एकादशीला नवस करुन पूजा करावी. यानंतर अखंड, चंदन, फुले, धूप, दिवे इत्यादींनी भगवान विष्णूची पूजा करावी. फळे आणि मिठाई अर्पित करावे.
विष्णूला लोणी-साखरेचा नवैद्य दाखवावा व तुळशीचे पान अर्पित करावे. तसेच देवी लक्ष्मीची पूजा करावी. यानंतर, कामिका एकादशीची कथा ऐकावी. पूजेच्या शेवटी भगवान श्री विष्णूची आरती करा.
या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी पत्र जरूर अर्पण करा, पण या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नका. त्यासाठी आधीच आदल्या दिवशी आणून ठेवावेत. तुळशीला या दिवशी विशेष महत्व आहे.
तसेच या दिवशी तुम्ही सायंकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा, यानंतर अजून एक दिवा तुम्ही तुळशीत लावायचा आहे. दिवा लावून तुळशीला नमस्कार करा व प्रदक्षिणा घाला. त्यानंतर तुळशी मातेसमोर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा 21 वेळा जप करा. असे केल्यास तुमचं भाग्य जागे होईल, भगवान विष्णूंचा आशीर्वाद पाठीशी राहील. कामिका एकादशीचे व्रत मनोभावे आचरल्यास ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तता होते, असे मानले जाते.
आषाढ महिन्याच्या वद्य पक्षात येणाऱ्या कामिका एकादशीनंतर व्रत-वैकल्यांचा, सण-उत्सवांचा श्रावण मास सुरू होतो. त्यामुळे या कामिका एकादशीला अधिक महत्त्व प्राप्त होते, असे सांगितले जाते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.