नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जीवनात सुख-समृद्धी यावी असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो. यश, पैसा मिळत नाही, घरात सतत अशांतता असते अशा स्वरूपाचे प्रश्न सध्या अनेक जणांना भेडसावत आहेत.
यासाठी काही जण वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घेतात. जीवनातल्या सुख-समृद्धीचा संबंध वास्तूशीदेखील असतो, असं जाणकारांचं मत आहे. वास्तूची रचना योग्य असेल,
घरात वस्तू योग्य दिशेला ठेवल्या असतील तर जीवनात सुख-शांती, पैसा, यश मिळतं; मात्र वास्तूची रचना चुकीची असेल तर जीवनात सातत्याने समस्या वाढताना दिसतात. याशिवाय घरातल्या काही गोष्टींमुळेदेखील अडचणी निर्माण होऊ शकतात.
घरात कोळ्याचं जाळं असेल तर पैसा टिकत नाही. यश आणि समाधान मिळत नाही. वास्तूशी संबंधित काही नियमांचं पालन केलं तर समस्या दूर होऊ शकतात.
घरात कोळ्याची जाळी-जळमटं होणं हा मोठा वास्तुदोष मानला जातो. यामुळे कुटुंबाची प्रगती खुंटते. घराची साफसफाई करताना एखादा कोपरा तसाच राहिला तर तिथं जाळं, धूळ साचते;
मात्र काही वेळा याकडे आपलं दुर्लक्ष होतं. घरात जाळी-जळमटं असणं हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं. यामुळे जीवनात यश आणि समाधान मिळत नाही. नकारात्मकता वाढतं.
ज्या घरात रोज स्वच्छता होत नाही, त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. कितीही पूजा-विधी केले तरी इच्छित फलप्राप्ती होत नाही. घरात स्वच्छता नसेल, घरात जाळी-जळमटं असतील तर लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्राचे जाणकार सांगतात.
घरात कोळ्याचं जाळं असणं हे दारिद्र्याचं लक्षण असतं. अशा घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. तसंच कुटुंबातल्या सदस्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्या घरात कोळ्याची जाळी,
धूळ असते, त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. घरातलं वातावरण सुखद नसतं. घरात वाद-विवाद होतात आणि वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.
बेडरूममध्ये पलंगाच्या समोर आरसा ठेवणे अत्यंत चुकीचे मानले जाते. वास्तू दोषांचे हे एक प्रमुख कारण आहे. तुमच्या घरातही अशीच परिस्थिती असेल तर आता बदला.
अशा घरांमध्ये पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे होतात आणि सुख-शांतीचा अभाव असतो. चुकूनही बेडसमोर आरसा लावू नका. जर ते काढणे शक्य नसेल तर ते झाकून ठेवा.
तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात गॅसचा स्टोव्ह आणि पाण्याचा स्रोत एकाच दिशेला असेल तर तोही एक प्रमुख वास्तुदोष आहे. लगेच दुरुस्त करा. स्वयंपाकघरात गॅसची शेगडी दक्षिण दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. या दिशेला राहिल्याने परस्पर संबंध मधुर राहतात आणि पैशाची कमतरता भासत नाही.
जर तुमच्या घरातील खिडक्या आणि दरवाजे तुटलेले असतील किंवा त्यातून आवाज येत असेल तर हा वास्तुदोष मानला जातो. हे दुरुस्त करा.
खिडक्या आणि दरवाज्यांमधून येणाऱ्या कोणत्याही आवाजामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच त्यांच्या बिजागरात वेळोवेळी तेल टाकत राहा जेणेकरून आवाज येणार नाही.
जर तुमच्या घराच्या मध्यभागी कोणतीही जड वस्तू ठेवली असेल तर ती लगेच काढून टाका. असे झाल्यावर कुटुंबाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा कायम राहतो आणि त्याला कधीच कर्जापासून दिलासा मिळत नाही.
घराच्या मध्यभागी चुकूनही जड सामान ठेवू नका. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो.घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे खूप महत्वाचे मानले जाते.
मुख्य दरवाजासमोर कोणतेही मोठे झाड किंवा मोठे खांब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा याची नोंद घ्यावी. यामुळे माता लक्ष्मी रागावते आणि घरातून निघून जाते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.