नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सर्व काही जवळ आहे परंतु मानसिक अशांती आहे, घरामध्ये ऐश्वर्य आहे पण सुख, समाधान नाही, शत्रूपिडा आहे, विनाकारण आजारी पडणे, तसेच वायफळ नाहक पैसे भरपूर खरावंग होणे यासाठी तसेच घरी बसून संकटे चालून येणे
असे अनेक विचित्र अनुभव सर्वांना येतात. तसेच आपलं काम, नोकरी, कुटुंब, व्यवसाय या सर्वांशी जुळवून घेताना मोठी कसरत होते, त्रास होतो त्यासाठी देखील हा उपाय करू शकता.
म्हणून रात्री झोपताना जर तुम्हाला शांत झोप लागली तर आपल्याला सकाळी फ्रेश वाटते, दिवसाची सुरुवात प्रसन्न होते व दिवस चांगला जातो. म्हणून हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करावा,
रात्री झोपताना जो विचार करत असतो तोच विचार व स्वप्न आपल्याला रात्री दिसत मग तुम्ही वाईट विचार केला तर अशुभ स्वप्न व चांगले विचार, जप केला तर शुभ स्वप्न, भास होतील.
समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल.
श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.
त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.
रात्री झोपताना सुद्धा माणूस त्या इच्छांचा विचार करत झोपतो टेन्शन झोपतो की हे मिळेल की नाही होईल का नाही ते दूर होईल
का नाही मलाच का असा भरपूर विचार माणसाच्या डोक्यात मनात येत असतात आणि तो त्रास त्याला झोपू सुद्धा देत नाही.
रात्री झोपताना उठताना देवाचे नाव घेऊन हा मंत्र बोलून झोपलात तर नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा आहे त्यासुद्धा पूर्ण होतील
तुम्हाला झोप सुद्धा चांगले लागेल आणि उद्याचा दिवस सुद्धा देवाचा आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने चांगला येईल.
म्हणून रात्री झोपताना तुम्ही सुद्धा मंत्र नक्की बोला तुम्हाला फक्त एक वेळेस हा मंत्र रात्री झोपताना बोलायचं आहे महिला असतील पुरुष असतील
कोणी त्या मंत्राचा जप करु शकतात देवघरासमोर सुद्धा बसून तुम्ही या मंत्राचा जप करु शकतात.
|| महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||
सर्व भीती, चिंता, तणाव निघून जाईल. आपलं शरीर, मन शांत होईल. परंतु मंत्र म्हणत असताना तो पूर्ण श्रद्धेने, भक्तीने म्हणायला हवा, कारण इथे किती मंत्र म्हणला यापेक्षा किती श्रद्धापूर्वक,
विश्वास ठेवून म्हणला याला जास्त महत्व आहे. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व संकटे व त्यांच्यावर मात करण्याची शक्ती स्वामी आपल्याला देतात. त्यातील या चिंतामुक्त करणाऱ्या गोष्टी म्हणजे सामींची भक्ती होय.
स्वामींची नित्य सेवा, नित्य जप केल्यास स्वामी पाठीशी उभे राहतात, आपले रक्षण करतात मग कितीही मोठे संकट आले तरीही. जय स्वामी समर्थ
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.