नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, कुठल्याही नवीन कामाची सुरूवात करायची असेल तर आपण त्या कार्याचा श्रीगणेशा असं म्हणतो. कारण गणपती बाप्पा सर्व देवी-देवतांमध्ये प्रथम पुज्यनिय मानले जातात.
गणपती बाप्पा शक्ती, बुद्धी आणि विवेकाचं प्रतिक आहेत. आपल्या सर्व भक्तांचे विघ्न हरण्याचं काम बाप्पा करतो. म्हणूनच गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता पण म्हणतो.
ज्या लोकांच्या आयुष्यात कुठलंही संकट असेल जर त्यांनी संकष्टी चतुर्थीची विशेष पूजा केली तर त्याचा उत्तम परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो, कारण संकष्टीचा अर्थच संकट हरणारी चतुर्थी असा होतो.
हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि सणाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. पंचांगानुसार दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते.
ज्याचे गणेश पुराणानुसार सर्व संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे. हे व्रत केल्याने भक्तांना अनेक प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते.
पंचांगानुसार कार्तिक महिना सुरू झाला असून या महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवले जाणार आहे.
या महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 6 जुलै रोजी उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत आहे. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यावरच हे व्रत सुरू होते आणि या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 10 वा. 06 मि.नी आहे.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केली जाते आणि गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मात, भगवान गणेशाला प्रथम पूज्य देवाचा दर्जा देण्यात आला आहे आणि प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते.
संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भाविकांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि या व्रतामुळे सर्व चतुर्थीच्या उपवासाचे फळ मिळते, असा विश्वास आहे.
या दिवशी गणेशाची पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून संकष्टी व्रत प्रारंभ करा. या विशेष दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.
सर्वप्रथम उपासनास्थळ स्वच्छ करा आणि त्यावर लाल कपडा घालून गणेश जीची मूर्ती किंवा फोटो लावा.
पूजेच्या वेळी आपला चेहरा पूर्व आणि उत्तर दिशेला असावा. परमेश्वरासमोर दिवा लावावा.
यानंतर प्रसादासाठी फुले, अक्षता, सिंदूर, मोदक आणि केळी ठेवा. यानंतर विधिने गणेशाची पूजा करावी आणि मंत्रांचा जप करावा.
ओम गं गणपतये नमः असा गणेशाचा जप करा. तसेच अथर्वशीर्ष पठण करावे. तसेच 21 दुर्वा गणपतीला वहाव्यात, तसेच लाल रंगाचे फुल गणपती बाप्पांना आवडते ते आपण अर्पण करावे.
या दिवशी विशेष करून गणपती बाप्पांच्या आवडत्या पदार्थांनी नैवेद्य करावा, जसे की मोदक, शक्य तितके 21, 51 असे मोदक करा. गणपती स्तोत्र पठण करावे.
सात्विक आहार व सात्विक वर्तन ठेवावे, व्यसन, मद्यपान करू नये तसेच मांसाहार देखील करू नका. जीवनातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी 5 हळकुंड लाल कपड्यात गुंडाळून ती पोटली गणपतीला अर्पण करावे,
प्रार्थना करा व नंतर जवळपास असणाऱ्या गणेश मंदिरात ती पोटली तिथे असणाऱ्या बाप्पांच्या चरणी अर्पण करा. लगेचच तुम्हाला धनस्रोत निर्माण होतील. त्यामुळे जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी बळ मिळते.
24 तासात धन मार्ग तुम्हाला खुले होतील. तसेच या दिवशी गणपतीसमोर चार मुखी तुपाचा दिवा लावावा याने घरातील वातावरण चांगले राहते.
शक्य झाल्यास शमीची पाने गणपतीला अर्पण करावीत व गणपती स्तोत्राचा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान या दिवशी चुकूनही करू नका.
तसेच दुर्वा कधीही बाप्पांच्या चरणी अर्पण करू नका आणि मस्तकी सुद्धा, त्या हातावर,सोंडेवर,दातांवर अर्पण करा. तसेच तुटके फुटके अक्षत अर्पण करू नका.
तुळस ही शिव परिवारातील कोणालाही अर्पण करू नये. भगवान गणेश, कार्तिकेय, माता पार्वती,भोलेनाथ शिव यांना कधीही तुळस अर्पण करू नये.
बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत. बाप्पांना तुम्ही उकडीचे मोदक, सारणाचे मोदक जर खोबऱ्याचे असतील जमत नसतील तर खव्याचे बेकरीत मिळतात ते दाखवा.
तसेच अजून एक पारंपरिक नैवेद्य म्हणजे खोबऱ्याची वाटी व गूळ दाखवा. कापूर व लवंग घेऊन तुम्ही नक्की आरती करा.
फरक दिसेल. तसेच कापूर वडी दिव्यात सुद्धा टाका. धूप आरती पूर्ण घरातून फिरवा. 21 वेळेस मंत्र बोला. अथर्वशीर्ष बोला.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.