देवघरात ठेवा या 3 वस्तू, पैसा कधीही कमी पडणार नाही…..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तुमच्या घरातील अडचणी दूर होत नसतील, गरिबी हटत नसेल तर तुम्ही काही नियम पाळायला हवेत.

तसेच काही वेळेस असे घडते की तुम्ही सर्व काही करता तरीही काही गोष्टी साध्य होत नाहीत. आशा वेळी तुमचं नशीब,

तुमचं घरातील वास्तुशास्त्र व देवाची तुमच्यावर असणारी कृपा या गोष्टी सुद्धा तुमच्या यशाला-अपयशाला कारण असते.

त्यामुळे सत्कर्म करून जितके होईल तितके आनंदी राहणे हाच उपाय आहे. तसेच तुम्ही जर देवपूजा करत असाल तर तुमच्या देव्हाऱ्यात या गोष्टी नक्की ठेवा.

असे केल्याने तुमचे भाग्य, तुमचे नशीब नक्की बदलेल.

या 3 वस्तू तुमच्या देवघरात ठेवल्याने तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील, घरात पैसा टिकून राहील व लक्ष्मीची कृपा बरसेल.

तुमच्या घरात, जीवनात जसे माता लक्ष्मीचे धनाचे महत्व आहे तसेच तुमच्या देवघरात सुद्धा अतिआवश्यक आहे. देवघरात बरेच लोक लक्ष्मीची प्रतिमा, फोटो पूजन करतात.

परंतु फोटो किंवा प्रतिमेपेक्षा आपल्या शास्त्रानुसार, धर्मानुसार मूर्ती पूजेला जास्त महत्व आहे. मूर्तीपूजा केल्याने ते जास्त लाभदायी ठरते.

आपल्या अंगठ्याच्या आकाराची चांदीची मूर्ती जरी तुम्ही सोनाराकडून आणली तरी चालते, तसेच ही मूर्ती घेताना तुम्ही काळजी जरूर घ्या की बरेच जण लक्ष्मी ची उभी असलेली मूर्ती घेतात,

तर तसे न करता माता लक्ष्मी कमळात आरूढ असणारी बसलेली मूर्ती स्थापन करा. आपल्या घरी नेहमी धन राहावे, माता लक्ष्मी नांदावी यासाठी बसलेली चांदीची मूर्ती स्थापन करा.

तिची योग्य पूजा करून लाल रंगाचे फुल व्हा, धूप दीप आरती करा व 5 फळांचा नैवेद्य दाखवा. आठवड्यातून शुक्रवारी किंवा मंगळवारी लक्ष्मीची मूर्ती पूजन जरूर करा व प्रार्थना करा.

प्रत्येक बुधवारी जवळच्या गणपती मंदिरात जा व तिथे गणेशाचे दर्शन घ्या. दर्शन घेऊन तिथे तुमच्या क्षमतेनुसार 101, 501, 1001 रुपये दान करा , तिथे जर पुजारी असतील तर त्यांना द्या किंवा गणपतीचरणी अर्पण करा.

येताना त्यातील 1 रुपया मागून घ्या तो 1 रुपया घरी आणा व तुमच्या देव्हाऱ्यात सुपारी सोबत ते पूजन करा. सुपारी हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. असे केल्याने तुमच्यावर बाप्पांची सदैव कृपा राहते.

देवपूजा करताना त्या सुपारीचे व रुपयांचे देखील पूजन करा. तसेच जर तुम्ही रोज नियमितपणे कोणत्याही मंदिरात, तुमच्या आवडत्या मंदिरात जा व तेथील देवतांचा आशीर्वाद घ्या,

नंतर तेथील देवाला अर्पण केलेलं फुल तुम्ही घरी घेऊन या व ते तुमच्या देवघरात ठेवा. हा उपाय तुम्ही रोज केलात तर घरातील अशुभ शक्ती निघून जाते.

नजरात्मक गोष्टी नष्ट होतात, तुम्हाला तुमच्या कामात यश येते व घरात सुख समाधान राहते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!