नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, || श्री स्वामी समर्थ || स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून जर आपण स्वामींचे स्मरण केले तर नक्कीच स्वामी आपली हाक ऐकतात व आपल्या पाठीशी उभे राहतात, धावून येतात.
स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. स्वामी आपल्याला या भवसागरातून तरून नेण्यास आशीर्वाद देतात.
स्वामींची जर कृपा असेल तर भिकारी सुद्धा श्रीमंत होतो, भक्ती करताना त्यामध्ये सातत्य हवं, तसेच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा, स्वामींच्या चरणी सर्व भावना अर्पण करा. पण जर तुम्ही स्वामींची जर आपल्याला कृपा लाभली तर आपलं जीवन आनंदी बनेल.
रोजच्या जीवनातील कोणत्याही वेळी सकाळी असो, सायंकाळी असो किंवा रात्री झोपण्यापूर्वी असो तुम्ही स्वामींचा हा मंत्र जप करा. या मंत्रात खूप मोठे सामर्थ्य आहे, आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. भक्ती करण्यासाठी जात,धर्म यांचे बंधन नसते, ती एक पवित्र श्रद्धा व भावना असते जी शुद्ध अंतःकरणात असते.
तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला हे माहीत असायलाच हवे. तुम्हाला किंवा तुमच्या घरातील, मित्र परिवारातील सदस्याला जर स्वतःच्या जीवनात भरपूर यश मिळवायचे,समाधानी वृत्तीने समाजात मदत करायची असेल तर हा स्वामींचा उपाय तुम्ही नक्की करा.
स्वामींचे जर तुम्ही उपदेश वाचले व त्याचा उपयोग रोजच्या जीवनात केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचं जीवन सरल होईल, समस्या सुटतील व सुख, समाधान तुमच्या आयुष्यात येईल.
श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.
त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.
स्वामींनी असे खूप सारे जीवनावश्यक उपदेश सांगितले आहेत जे केल्याने तुमच्या मनाची शांती कायम राहते. तुमचं मन कोणत्याही परिस्थितीत विचलीत होत नाही व कोणत्याही प्रसंगाला तुम्ही धीराने सामोरं जाऊ शकता.
जीवनातील कटू प्रसंगी तुमच्या मनात कोणतेही वाद, भांडण न आणता फक्त स्वामींचा विचार करा व स्वामींचे प्रतिमा डोळ्यासमोर आणा.
त्यांची मनाला समाधान व सुखावणारी प्रतिमा, फोटो मनात तयार करा किंवा आठवा व मनाला तिकडे स्वामी भक्तीकडे वळवा. असे करत असतानाच मुखात नेहमी
श्री स्वामी समर्थाय , श्री स्वामी समर्थाय नमः असे मंत्र जप करत रहा. तुमचा राग कधी पळून गेला हे तुम्हालाही समजणार नाही त्यामुळे तुम्ही असे करून नक्की पहा.
तुम्हाला सकारात्मक वाटेल. वाद, भांडण पुन्हा कधीच होणार नाही. तसेच हा उपाय फक्त वाद, भांडण झाल्यावर किंवा राग आल्यावर न करता नेहमी करत रहा ज्यामुळे तुम्हाला कधीच परत राग येणार नाही.
तुम्हाला पाहिजे ते मिळेल,फक्त हा मंत्र रोज बोला, फरक जाणवेल, भीती जाईल, मानसिक समाधान मिळेल, स्वामींचा चमत्कार दिसेल . तसेच तुमच्या आयुष्यात जेव्हा राग येतो तेव्हा चुकून रागात अपशब्द बोलले जातात व दुसऱ्यांचे मन दुखावले जाते.
त्यामुळे तुम्ही स्वामी भक्तीत स्वतःची माफी मागू शकता व राग येऊ नये, अपशब्द आपल्याकडून बोलले जाऊ नयेत यासाठी हा उपाय नक्की करून पहा व जास्तीत जास्त स्वामींच्या तारक मंत्राचा, त्यांच्या मंत्राचा जप करत रहा.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या कुलदेवतेचा जप करू शकता व नंतर झोपायला जाऊ शकता.
तिसरी गोष्ट काळाचे स्वामी भगवान शंभू महादेव यांचा जप देवघरासमोर् बसून ओम नमः शिवाय बोला. यामुळे तुम्हाला येणारा प्रत्येक दिवस आनंदात जाईल
या मंत्रात अगाध शक्ती आहे. त्यामुळे तुमचं जीवन वेगळं वळण घेईल, जीवन फुलून येईल. हे उपाय तुम्हाला जमेल तसे आवडत्या देवतेचे करा. सर्व एकत्रित करू नका.
|| श्री स्वामी समर्थ||
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.