नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, उद्या अमावस्या तिथी आहे. काही खास उपाय करून आपण आपल्या घराचं रक्षण करू शकतो. आपल्या घरावर जर कुणाची नजर असेल, कोणी काळी जादू केलीय अस वाटत असेल,
तुम्ही सतत आजारी असाल किंवा घरात भरपूर नकारात्मक लहरी पसरल्या असतील तर हा एक छोटा उपाय नक्की करा. हा उपाय तुम्हाला अशा वाईट शक्तींपासून नक्की वाचवेल.
त्यामुळे तुम्हाला जर सारखा कोणता त्रास होत असेल, सारख बर वाटत नसेल तर हा एक उपाय करून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल.
ज्योतिष शास्त्रानुसार मिठाला चंद्र व शुक्राचे प्रतिक मानले जाते. तसेच काहीजण राहूचे देखील प्रतिक मानतात. मिठाचा योग्य वापर आपल्याला घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी होतो.
त्यामुळे मिठाचा योग्य ठिकाणी वापर करणे अवश्य जाणून घ्यावे. स्टीलच्या बरणीत जर मीठ ठेवले तर तुम्हाला नुकसान होऊ शकते त्यामुळे आपल्या दुःखात वाढ होते. मीठ कोणाच्याही हातात देऊ नये,
त्यामुळे आपले नाते संबंध बिघडतात व तसेच जर तुम्ही मीठ खाली सांडले तर ते अशुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र व शुक्र कमजोर होतात.
घरातील बाथरूम मध्ये काचेच्या वाटीत घालून मीठ ठेवल्यास घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतात. तसेच तुम्ही जर घरातील मुख्य दरवाजा वरती लाल कपड्यात खडे मीठ बांधून ठेवले तर घरात अशुभ, अमंगळ गोष्ट प्रवेश करत नाही.
व्यवसायात वृद्धी होत नसल्यास तुम्ही दुकानाच्या शटरला कपड्यात मीठ बांधून ठेवा, याचे परिणाम नक्कीच पाहायला मिळतील व तुमची भरभराट होईल. तेथील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल.
तुमच्या घरातील नैऋत्य कोपऱ्यात तुम्ही एक काचेच्या ग्लास मध्ये मीठ टाकून त्यात पाणी घाला व त्यावरती लाल रंगाचा बल्ब लावा असे केल्याने तुमच्या घरात वेगाने धनाचे आगमन होईल.
ग्लास कोरडा झाल्यावर पुन्हा स्वच्छ धुवून पाणी व मीठ पुन्हा ठेवून द्या. दररोज फरशी पुसताना गुरुवार चा दिवस वगळता इतर सर्व दिवशी त्या पाण्यात मूठभर मीठ घालून फरशी पुसावी, असे केल्याने लक्ष्मीचे आगमन होते.
घरात जर बरकत येत नसेल, धन येत नसेल , पैसा टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता, एक छोटी काचेची बरणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये 5-6
लवंगा टाकून ठेवा.
घरात कोणाला नजर बाधा, नजर दोष असेल तर मूठभर मीठ घेऊन 3 वेळा उतरून बाहेर फेकून द्यावे, असे 3 दिवस सलग करा ज्यामुळे सर्व नजर दोष निघून जातील. सारखी भीती वाटत असेल,
वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही घड्याळाच्या दिशेने 7 वेळा मीठ उतरवून ते बेसिनच्या वाहत्या पाण्यात सोडून द्या असे केल्याने तुमच्यातील सर्व दोष निघून जातील. शनीचा दोष कमी करायचा असेल तर जेवताना वरून मीठ घेऊ नये.
स्वयंपाक करताना मीठ जरी कमी पडले तरी वरून घेऊ नये तसे असल्यास काळे मीठ वापरा. जर कुंडलीत चंद्र कमजोर असेल तर तुम्ही साधे मीठ मुळीच वापरू नका त्याऐवजी काळे मीठ किंवा शेंदीलवान वापरा.
जर एखादी व्यक्ती सतत अंथरुणावर खिळून असेल तर काळे मीठ घेऊन तिच्या उशिजवळ काचेच्या वाटीत ठेवा व दर आठवड्याला ते बदला, असे केल्याने ती व्यक्ती लवकर बरी होईल.
घरात कलह, वाद होत असतील तर घरातील सर्व व्यक्ती जास्त वेळ जिथे बसतात तिथे डंका तांब्याच्या कलशात मीठ व पाणी घेऊन एका कोपऱ्यात ठेवा, महिन्यातून एकदा ते बदलत जा.
असे केल्याने घरातील वाद कमी होतात व सर्वांचे स्वास्थ्य निरोगी राहते. तसेच काचेच्या वाटीत 4-5 तूर्टीचे खडे टॉयलेट अथवा बाथरूम मध्ये ठेवा तसेच हॉल मध्ये पण ठेवत चला. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा संपून जाईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.