नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, मिठाला नेहमीच नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानले गेले आहेत. म्हणून मिठा वाईट दृष्ट काढण्यासाठी केलं जातं.
आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा घराला दृष्ट लागल्याचे जाणवत असल्यास चिमूटभर मीठ तीन वेळा ओवाळून बाहेर फेकून द्यावे.
याने नजर दोष नाहीसा होतो. वास्तु विज्ञानाप्रमाणे काचेच्या बॉऊलमध्ये मीठ भरून शौचालय आणि स्नान गृहात ठेवावे याने वास्तुदोष दूर होतं.
याचे कारण म्हणजे मीठ आणि काच दोन्ही राहूच्या वस्तू असल्याने अशा प्रकारे राहूचं नकारात्मक प्रभाव दूर करण्यात मदत मिळते.
राहूला नकारात्मक ऊर्जा आणि कीटक व कीटाणूंचा कारक मानले गेले आहे. आणि यामुळे घरातील सुख- समृद्धी आणि आरोग्यावर प्रभाव पडतो.
सेंधव मीठ जे स्फटिक सारखे दिसते व बाजारात सहज मिळते ते या उपायासाठी लागणार आहे. तुमचा शत्रू जर तुम्हाला खूप त्रास देत असेल, तुमची मानसिक शांती खराब केली असेल,
तुमच्या जीवनात खूपच अडचणी मुद्दाम निर्माण करत असेल, सतत तुमच्याविषयी नकारात्मक, वाईट चिंतीत असेल तर अशा शत्रूला अद्दल घडवण्यासाठी हा उपाय करा.
हा उपाय केल्यास तुमचा शत्रू स्वतःच अडचणीत येईल, अक्षरशः बरबाद होईल व तुमच्या विषयी वाईट चिंतन करण्याचे सोडून देईल. हा उपाय गुपचूप घरीच करा.
महिला जे काजळ लावतात ते थोडे घ्यावे व हे सेंधव मीठ जे आहे त्याचा एक छोटा खडा घ्या व त्यावरती त्या शत्रूचे फक्त नाव लिहा ,
तसेच जर तुम्हाला शत्रूच्या आईचे नाव माहीत असेल तर तेही लिहा. यानंतर तुम्ही हा खडा हातात घेऊन मुठीत करकच आवळा पण फोडू नका, त्यावेळी या मंत्राचा 21 वेळा जप करा,
ओम नमो अमूकम हं हं स्वाहा या मंत्रात तुमच्या शत्रूचे नाव अमूकम या ठिकाणी घाला व मंत्र उच्चार करा. पण त्या शत्रूच्या आईच नाव घेऊ नका. मंत्र म्हणून झाल्यावर तुम्ही मुठी उघडा व त्यावर थुंका.
यानंतर लगेच तुम्ही हा खडा टॉयलेट च्या घाण पाण्यात टाका व तिथुन आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. असा हा उपाय तुम्हाला सर्व प्रकारच्या शत्रुपीडेपासून , बाधे पासून तुमचं रक्षण करेल.
अतिशय प्रभावशाली व चमत्कारिक असा हा उपाय आहे. तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मक ऊर्जा या उपायाने निघून जाईल. शत्रूचे भय उरणार नाही. कोणतेही नुकसान होणार नाही.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.