नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, वास्तूमध्ये झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्व मानले जाते. घरामध्ये योग्य ठिकाणी शुभ वृक्ष आणि रोपे लावल्यास सुख-समृद्धी येते. दुसरीकडे वास्तूनुसार झाडे योग्य दिशेने नसतील तर त्याचे अशुभ परिणाम देखील भोगावे लागतात.
जाणून घेऊया वास्तूनुसार घरामध्ये किंवा आजूबाजूला कोणती झाडे लावल्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.शुभ वृक्ष आणि वनस्पतीमध्ये तुळशीचे नाव प्रथम येते. हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे.
असे मानले जाते की, ज्या घरात तुळशीचे रोप असेल तिथे कधीही पैशाची कमतरता नसते. तुळशीच्या रोपामुळे घरातील नकारात्मक दोष दूर होतात. घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नका नाहीतर अशुभ परिणाम होतील. तुळशीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला लावावे. दररोज स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे.
आवळा, पुराणानुसार आवळा वृक्षावर देवतांचा वास असतो. आवळा वृक्ष आणि त्याचे फळ भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत. घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला आपळ्याचे झाड लावणे नेहमीच फायदेशीर असते.
करवंदाचे झाड लावून त्याची नित्य पूजा केल्याने घरात देवांचा आशीर्वाद राहतो आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. आपल्या आयुष्यात झाडांचे महत्व हे ऑक्सिजन सोडून इतरही प्रकारात त्याचा उपयोग होतो.
घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्या अंगणातील वृक्षवेलींचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्या अंगणात कोणती झाडे लावायला हवीत हे माहीत असणे गरजेचे आहे.
हे एक झाड जर आपण आपल्या घराजवळ लावले तर आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतील. आजकाल आपण हे पाहतोय की आपल्या प्रगतीवर जळणारे आजूबाजूला भरपूर असे लोक आहेत
त्यामुळे जर अशा प्रकारची काळीजादू जर आपल्या घरावर झाली तर आपण कितीही मेहनत केली तर ती उपयोगाची ठरत नाही. घरात पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या करणीबाधेपासून आपल्या घराला सुरक्षित ठेवण्याचे काम हे झाड करते.
जर तुमच्या मनात काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर असे म्हणतात की हे झाड प्रथमेश गणपती बाप्पाचे स्वरूप आहे. हे झाड म्हणजे पांढरी रुई . सर्व प्रकारच्या दुःखांपासून , कष्टापासून हे झाड तुमची सुरक्षा करते.
हे झाड तुमच्या जीवनातील समस्या दुर करते. जर पती -पत्नी मध्ये वाद असतील, मुलगा आणि वडील यांचे पटत नसेल तर हे वाद शमविण्याचे काम हे झाड करत असते. हिंदुधर्म शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की आपण या झाडाची जर सलग 11 वर्षे पूजा केली
तर या झाडाच्या मुळामध्ये गणपती बाप्पा अवतरीत होतात. ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचे अस्तित्व आहे त्या घराकडे वाईट दुष्ट शक्ती वास करत नाही . त्या घरातील व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पैसा येण्याचे अनेक मार्ग निर्माण होतात.
तुमच्या घरात सकारात्मक शक्ती वाढवण्याचे काम हे करत असते. असे मानतात की हे झाड गणपती बाप्पाचे स्वरूप आहे. ज्या पद्धतीने आपण देव पुजा करतो त्याच प्रमाणे या झाडाची पुजा करावी.
या झाडाची पूजा करताना झाडाला कपभर दुध अर्पण करावे आणि ज्या लोकांना दूध उपलब्ध होत नाही अशा लोकांनी शुद्ध पाणी घेऊन त्यात दुधाचे काही थेंब टाकुन ते जल अर्पण करावे.
जर तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असेल तर या रुईच्या झाडाचे एक फुल खिशात घेऊन जा, त्यामुळे तुमचे काम हमखास मार्गी लागण्यासाठी मदत होते.
तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी एक रुईचे आणि एक तुळशीचे पान दररोज ठेवत जा. यांने तुमच्या पैशात सातत्याने वाढ होत राहील.
ज्योतिषशास्त्रात शमी वनस्पतीचा संबंध शनि ग्रहाशी असल्याचे मानले जाते. शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर या झाडाची नियमित पूजा करा. वास्तू शमीनुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला काही अंतरावर शमीचे झाड लावावे. झाडाची सावली घरावर पडणार नाही अशा पद्धतीने लावावी.
अशोक, अशोक वृक्षाला हिंदू धर्मात अतिशय शुभ वृक्ष मानले जाते. या झाडामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. असे मानले जाते की ज्या घरात अशोकाचे झाड असते तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही.
घराजवळ लावल्याने इतर अशुभ झाडांचे दोषही संपतात. असे मानले जाते की ज्या घरात हे झाड असते त्या घरात कधीही मतभेद होत नाहीत आणि त्या घरातील लोकांची नेहमी प्रगती होते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.