अधिक महिन्यात सत्यनारायण करावा? किती व कसा करावा…?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्रीहरीची म्हणजेच भगवान विष्णूची अधिकामात पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते. म्हणूनच सर्व प्रकारची शुभ कार्ये अधिकामात निषिद्ध आहेत, परंतु भगवान सत्यनारायणाची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते.

अधिकामात विष्णुजीची पूजा केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि तुमच्या घरात ऐश्वर्य आणि समृद्धीसोबतच सुख-समृद्धी येते. अधिकामात ग्रह दोष शांत करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप सर्वोत्तम मानला जातो.

पुरोहिताकडून संकल्प घेऊन महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास बरे होईल. जर कोरोनाच्या काळात हे शक्य नसेल तर आपल्या घरी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतील

आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल.तुमच्या इच्छेसाठी एखादे यज्ञ किंवा अनुष्ठान करवून घेण्याचा विचार तुम्ही खूप दिवसांपासून करत असाल, तर या कामासाठी अधीकामाचा काळ उत्तम आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, अधिकामात केलेले यज्ञ आणि अनुष्ठान पूर्णतः फलदायी असतात आणि भगवान आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. अधिकारमासातील परोपकाराची कामे तुम्हाला स्वर्गात जाण्याचा मार्ग प्रशस्त करतात.

विशेषत: गुरुवारी अधिकामादरम्यान पिवळ्या वस्तूंचे दान करावे. असे केल्याने तुम्हाला भगवान श्रीहरींचा आशीर्वाद मिळतो आणि तुमचे गुरुही बलवान होतात. बृहस्पति बलवान आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल.

सत्यनारायण ही पूजा पती-पत्‍नी यांनी जोडीने करावी. पुरुषांनी अगर मुलांनी केली तरी चालते . सत्यनारायण ही पूजा वर्षभरातील कोणत्याही दिवशी , कोणत्याही वेळेला केली तरी चालते यास मुहूर्त पाहण्याची जरूरी नाही तरी पण पौर्णिमा ,

संक्रांत , श्रावण आणि अधिक ( पुरुषोत्तम ) मासातील पूजा विशेष समजली जाते . कोणतेही नवीन कार्य सुरू करताना पूजा करतात . संकल्प करताना पूजा करतात . पूजा शक्यतो गोरज मुहूर्तावर करावी . पुजेसाठी पूजा होईपर्यंत उपवास करावा . प्रात : काळी पूजा केल्यास उत्तम .

पुजेला बसताना आपले मुख पुर्वेकडे करून पुजेला बसावे . दक्षिणेकडे मुख करुन बसू नये . पुजा चालू असताना घरातील सर्व मंडळी , आप्तस्वकीय , मित्रमंडळी जर जिथे पूजा चालू आहे , तेथे थांबून मंत्र किंवा कथा ऎकतील तर यातून निर्माण होणार् ‍ या सात्विक लहरींचा त्यांना लाभ होऊन , सत्यनारायणाचे पुण्य मिळेल .

या पुजेची कलियुगात नितांत गरज आहे .सत्यनारायणाचा फोटो, हळद, कुंकु, गुलाल, बुक्का प्रत्येकी ५० ग्रॅम. फूले, तुळशी (१०८ पाने) हार २, विड्याची पाने ५०, सुपार्‍या २७, नारळ २, खारीक ५, बदाम ५ हळकुंड ५, खोबर्‍याचा तुकडा, गुळाचा खडा,

खोबरे वाटी १, खडीसाखर (१०० ग्रॅम), जानवी जोड, १ मीटर कापडाचे दोन पीस, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) सुवासिक उदबत्ती, कापूर, सुट्टी रुपयांची नाणी ७, समया २, निरांजन १, तांदूळ १ किलो, गहू २५० ग्रॅम, केळीचे किंवा कर्दळीचे खूंट ४, शंख, घंटा, बाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळीग्राम, अत्तराची बाटली, केळी १ डझन, तांब्याचे गडवे ३, ताम्हण २, पाट ४, चौरंग १, वेगवेगळी ५ फळे.

गव्हाचा रवा, साखर, साजूक तूप, प्रत्येकी सव्वा प्रमाणात सव्वा पावशेर अथवा सव्वा किलो प्रमाणात, पाव किलो पासून प्रसाद करावा त्यावर सव्वा केळी कुस्करुन घालावीत. याशिवाय महानैवेद्यासाठी गोड स्वयंपाक करावा.

स्वच्छ जागेवर शक्यतो पूर्व पश्‍चिम चौरंग मांडावा. त्या भोवती रांगोळी काढून त्यात गुलाल अथवा रंग भरावा. आवडीप्रमाणे रोषणाई करावी. चौरंगाला चारी बाजूंना केळीचे अथवा कर्दळीचे खुंट बांधावेत.

चौरंगावर मागील बाजूस सत्यनारायणाचा फोटो उभा ठेवावा. चौरंगावर गहू किंवा तांदूळ पसरावेत, उजव्या बाजूला चौरंगावरच मुठभर तांदूळ ठेवून त्यावर गणपतीचे प्रतिक म्हणून पांढरी सुपारी ठेवावी.

मधल्या तांदूळ किंवा गव्हावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात गंध, फुले, अक्षता, सुपारी, दुर्वा व एक नाणे, आंब्याचा डहाळा ठेवावा, त्यावर विड्याची ५ पाने ठेवावीत. कलशावर हळदी कुंकवाचे पट्टे ओढावेत, छोटे स्वस्तिक चिन्ह काढावे. त्या कलशावर ताम्हण ठेवावे. ताम्हणात तांदुळ किंवा गहू पूर्ण भरावेत. मध्यभागी एक सुपारी मांडावी. (वरुणाचे प्रतिक) आठ दिशांना आठ लोक पालांच्या सुपार्‍या मांडाव्यात.

लोकपाल येणेप्रंमाणे – पूर्वेस इंद्र , पश् ‍ चिमेस वरुण , दक्षिणेस यम , उत्तरेस सोम , आग्नेयेस अग्नि , नैऋत्येस – निश्वति , वायव्येस – वायु , ईशान्येस – इशान ; त्याचप्रमाणे नवग्रहांच्या सुपार् ‍ या मांडाव्यात .

पुजेसाठी बाळकृष्ण अथवा शाळी ग्राम घ्यावा . शाळीग्राम असेल तर अक्षता वाहू नयेत , तुळशीपत्र वहावे . बाळकृष्णाला अक्षता वहाव्यात . चौरंगावर डावीकडे पाच विडे मांडावेत . प्रत्येक विड्यावर एक हळकुंड आणि खारीक ठेवावे . डावीकडे समई ठेवावी . तांदूळावर ठेवलेल्या सुपारी गणपती मागे शंख ठेवावा .

सुहासिनीने हळद-कुंकू लावावे, यजमानानी पुजेला बसल्यानंतर विडे घेऊन पळीत पाणी घ्यावे. विड्याच्या दोन पानावर अक्षता, पैसा व सुपारी ठेवावी. आपल्या कुलदैवतासमोर विडा ठेवून त्यावर एक पळी पाणी सोडावे देवाला नमस्कार करावा.

घरातील थोर मंडळींना नमस्कार करावा, गुरुजींना नमस्कार करुन आपापल्या आसनावर बसावे आणि पुजेला प्रारंभ करावा.

पुढे दिलेल्या २४ नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करून प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे. (आचमन करतेवेळी तोंडाने आवाज करू नये.) चौथ्या नावाचा उच्चार करून संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हनात सोडावे.

याप्रमाणे दोन वेळा करावे. नंतर नावाचा उच्चार करून प्रत्येक वेळी नमस्कार करावा. सर्व नावे संपल्यावर प्राणायाम करावा. ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम: । ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविक्रमाय नम: ।ॐ वामनाय नम: ।ॐ श्रीधराय नम: ।ॐ ह्रषीकेशाय नम: ।ॐ पद्मनाभाय नम: ।ॐ दामोदराय नम: ।

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *