गुरुपौर्णिमा येईपर्यंत स्वामींची ही प्रभावी सेवा करा, नशिबात नाही तेपण मिळेल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, गुरूपौर्णिमा हा भारतातील एक सर्वात महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजन देखील केले जाते.

म्हणून या येत्या गुरुपौर्णिमेला काही मंत्राचा जप केल्यास आपल्या जीवनातील समस्या दुर होण्यास मदत होईल. त्याच बरोबर घरात पैसा येण्याचे मार्ग निर्माण होतील.
त्यामुळे येत्या काही दिवसातच गुरुपौर्णिमा येत असल्याने आपण हा उपाय करून पहा . कारण गुरुपौर्णिमा ह सण स्वामी भक्तांसाठी तसेच स्वामी सेवेकरी यांच्या साठी अगदी महत्वाचा दिवस मानला जातो.

कारण हा गुरुचा दिवस असतो व गुरूला शरण जाण्याचा दिवस असतो,असे म्हणतात.आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो.

प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते.

व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.

म्हणून स्वामी सेवेकरिंसाठी हा दिवस खूप मोठा मानला जातो. तसेच यावर्षी गुरुपौर्णिमा 3 जुलै रोजी आहे. त्यामुळे आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा गुरु पौर्णिमेपर्यंत ही सेवा केल्यास स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर पडण्यास मदत होते.

तसेच हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमा येईपर्यंत करायचा आहे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा स्वामी समर्थ पूर्ण करतील,असे सांगितले जाते. या उपायासाठी किंवा सेवेसाठी आपल्याला फक्त रोज एका विशिष्ट प्रकारच्या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे.

असे केल्यास आपल्याला धनाची कधीच उणीव भासणार नाही. हा जप संपूर्ण एक माळ रोज करायचा आहे.तसेच हा उपाय दिवसातून कधीही करू शकता. रोज गुरु पौर्णिमेपर्यंत हा जप देवघरासमोर बसून स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणीही केल्यास फळ मिळते.

असे सांगितले जाते की, हा मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा अगदी शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र मानला जातो. हा मंत्र म्हणजे ” श्री अक्कलकोट स्वामी समर्थांय नमः” ” श्री अक्कलकोट स्वामी समर्थांय नमः ” हा पवित्र मंत्र आहे. तुम्ही हा मंत्र 108 वेळेस रोज जप करणे आवश्यक आहे.

हा जप गुरु पौर्णिमेपर्यंत केल्यास यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला होत असतात.तसे काही भक्तांनी याचा अनुभव ही सांगितला आहे. तसेच जर तुम्ही काही काम करत असाल त्या कामातून जर प्रचंड पैसा प्राप्त करायचा असेल

किंवा धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण करायचे असतील तर हा उपाय त्यास मदत करतो. हा मंत्र जप केल्यास स्वामींची महती नक्की दिसेल, कारण जो व्यक्ती स्वामींना मनापासून पूर्ण श्रद्धेने शरण जातो त्यास स्वामी नेहमी संकटातून सोडवतात , स्वामी सांगतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.

तसेच गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा.

श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा, गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे.

म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.नृसिंह सरस्वतींनी चौदाव्या शतकात लिहिलेला ‘श्री गुरुचरित्र’ हा दत्त भक्तांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा ग्रंथ. भाविक भक्तिभावाने त्याची पारायणे करतात. श्रीदत्तांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा नृसिंह सरस्वती व तिसरा अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, असे सांगतात.

त्यातील पहिला अवतार श्रीपाद विल्लभ यांनी कृष्णा पंचगंगा संगमावर नृसिंहवाडी येथे जपानुष्ठान केले. भीमा अमरजा संगमावर गाणगापूर येथे त्यांचे वास्तव्य दोन तपे म्हणजे चोवीस वर्षे होते. त्यामुळे गाणगापूरला दत्तपंथीयांत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायात आलेल्या दत्त कथेचा आधी परिचय मला महत्त्वाचा वाटतो. असे म्हटले जाते की ब्रह्मदेवाचे जे सात पुत्र होते त्यात अत्री प्रमुख होत. त्यांची पत्नी अनुसूया. ती रुपवती, पतिव्रता, पतिसेवा तत्पर मनापासून अतिथी सेवा करणे हा तिचा आचार होता. योग, ज्ञान, संन्यास, वैराग्य, सातत्य, चिकाटी, चमत्कार व कडक शिस्त व शिस्तीचे कडक आचरण म्हणजे गुरुचरित्र होय.

या सगळ्या गोष्टीचे एकत्रित करून सामान्य माणसाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. भक्ती, मुक्ती, अनन्यसाधारण भरवसा (विश्वास) ठेवण्याचा प्रयत्न करून साकल्याने विचार करावयास लावणारे दैवत आहे. हा विषय व यातील आशय हा पूर्ण श्रद्धेचा आहे. पण या गोष्टी सातत्याने पार पाडावयाच्या म्हणजे शरीर प्रकृती उत्तम हवी. निरामय हवी. तरच हातून सेवा घडते.

धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे नृसिंह सरस्वतींनी दत्त भक्ती स्वीकारली. त्यामुळे अनेक भक्त वाढले. श्रीगुरूंनी आपल्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीतही लोकरक्षणाचे व धर्मसंस्थापनाचे फार मोठे अमोल कार्य केले आहे. नृसिंहवाडी व गाणगापूर या जुन्या तीर्थाना नवा उजाळा देऊन त्यांचे माहात्म्य वाढवले. लोकांना सन्मार्ग दाखवला. अनेकांच्या भौतिक व्याधी दूर केल्या.

अनेक लोकांना आत्मिक समाधान प्राप्त करून दिले. व्रते व वैकल्ये आणि कर्मकांड यांची पुनस्र्थापना करून सर्वसामान्य लोकांना शाश्वत सुखाचा मार्ग दाखवला. समाजातील तळागाळातील लोकांनाही त्यांनी तेराव्या शतकाच्या अखेपर्यंत दत्त उपासनेचा जो प्रवाह वाहत आला त्याला सजीव करण्याचे काम नृसिंह सरस्वतींनी केले. त्यांचे जीवनकार्य केवळ दत्त उपासनेच्या पुरते नसून सर्व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे.

त्यांच्या काळात संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच या संतांचा उदय झाला. त्या काळात आक्रमशील संस्कृतीने हिंदू परंपरेचा नाश करण्याचा प्रयत्न सर्व महाराष्ट्रभर चालविला होता. त्या महान संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचे काम स्वामींनी केले.

असा अनेक लोकांचा दत्त, दत्तपंथ व स्वामींचे कार्य याकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन होता. पण सर्वाचा सारांश एकच होता. धर्मस्थापना हेच मुख्य कार्य असल्यामुळे महाराजांनी एका विशिष्ट देवाची भक्ती वाढविली नाही. तप, सदाचरण, ध्यानधारणा यालाच महत्त्व होते.

धर्माधर्मातील कटुता न वाढावी व हिंदू धर्माचे व समाजाचे परधर्मीयांकडून संरक्षण केले. हेच मुख्य कार्य आहे. त्याचे वर्णन गुरुचरित्रात आहे. त्याच प्रमाणे वैदिक धर्माचे रक्षण व त्याची वाढ हाही मुख्य हेतू होता. श्रीज्ञानेश्वरांच्या वारकऱ्यांनी महाराष्ट्रातील फार मोठय़ा वर्गाचा मनुष्य या नात्याने अध:पात होऊ दिला नाही.

नृसिंह सरस्वतीचे कार्य नंतरच होते. जनतेत आत्मविश्वास उत्पन्न करून मनोधैर्य वाढवले. भक्तीमार्गाकडे वळवले. गायनावर महाराजांची फार छाप होती. त्यांना आवड होती. त्यामुळे जनतेच्या मुखी याचे वर्णन करणारी काव्ये होती. दत्तप्रेमींना मराठी भाषेप्रमाणे संस्कृत स्तोत्रांबद्दलही आदर आहे.

गुरुचरित्रातील कित्येक ओव्यांना मंत्राचे सामथ्र्य आहे. किंवा हा सगळा ग्रंथच प्रभावी मंत्र आहे, असे मानले जाते. गुरुचरित्राचे पारायण कसे व किती दिवसांत करावे. याचेही मार्गदर्शन या या ग्रंथात आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!