नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, काही लोकांना अचानक कशाची तरी भीती वाटते, विचित्र भास होतात, अनामिक भीती, कुणीतरी सावली दिसणे, भयानक स्वप्न पडणे, आपला जीव घुसमटतोय अस वाटणे, कुणीतरी आजूबाजूला असल्याचा भास होतो,
काही वेळेस हे खरं असते कारण आपल्या आजूबाजूला खूप अदृश्य, अज्ञात शक्ती वास करत असतात, त्यापैकी काही आपल्याला त्रास देतात तर काही आपल्याला देत नाहीत उलट शक्य तितकी मदत करतात.
जर घरी किंकाळी सारखी ऐकू येत असेल किंवा तुमच्या घरात सातत्याने कुणीतरी आजारी पडतं. विनाकारण पैसा निष्फळ गोष्टीवर खर्च होतो आणि परिणामी घरात पैसा टिकत नाही.
तुमचे शत्रू वाढलेले आहेत. कोणत्याही कारणास्तव अगदी कारण नसताना तुम्ही लोकांशी भांडता.
जर तुम्ही एखाद्या स्मशान भूमीजवळून जात असाल तर तुम्हाला विनाकारण भीती वाटत असेल काहीतरी अदृश्य शक्तींचा तुम्हाला भास होत असेल. भ्रम होत असेल. तर भूत प्रेत बाधा करणी दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे.
माचिस मध्ये आपण ही एक वस्तू ठेवायची आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल हे माचीस तुमच्याजवळ ठेवा तुमच्या घरात तुमच्या खिशामध्ये ठेवा
तुमच्या घरातील कलह भांडणे अशांती दूर होईल, समस्या दूर होतील. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या राहू मुळे घडतात. जेव्हा जेव्हा राहू बलवंत होतो तो आपल्याला अशुभ फळे देऊ लागतो.
राहू जेव्हा-जेव्हा अपायकारक बनतो अशुभ बनतो आपल्याला त्याचा भयंकर त्रास होऊ लागतो. अश्या वेळी ही जी माचिस आहे आपण सातत्याने जवळ ठेवा . जर तुमच्या जवळपास सफेद चंदनाच झाड असेल
तर ह्या सफेद चंदनाच मूळ घेऊन ते व्यवस्थीत साफ करून त्या मुळावरती निळ्या रंगाचा धागा गुंडाळावा पण लक्षात घ्या निळ्या रंगाचाच धागा त्यावर गुंडाळा आणि असे हे चंदनाच मूळ आपण आपल्या माचिस मध्ये ठेवा
आणि हे माचिस सदैव आपल्या जवळ ठेवा . आपल्या घरात जेवढे लोक आहेत त्या सर्वांनी एक एक माचिस जवळ ठेवण्यास हरकत नाही. तुमच्याकडे सफेद चंदनाचा मूळ नसेल तर तुम्ही निळा धागा ह्या माचीस वरती सुद्धा गुंडाळू शकता
किंवा त्या आगपेटीच्या आत ठेवला तरी चालेल. जेंव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी किंवा एकांतात असताना जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल कुणीतरी आलेला आहे तुमच्या जवळपास भटकत आहे.
असे वाटेल तेव्हा या माचीसमधील एक काडी पेटवा आणि त्या दिशेला फेका. भीती त्या क्षणात निघून जाईल जेव्हा तुम्ही माचिसची काडी
पेटवाल तेव्हा ही भीती दूर पळून जाईल ह्या माचिस मध्ये राहूला शांत करण्याची खूप मोठी शक्ती असते कारण माचिस मध्ये दारू भरलेली असते.
जेव्हा जेव्हा आपल्या कुंडलीतील राहू खराब होतो तेव्हा तेव्हा आपल संपूर्ण जीवन हा राहू खराब करून टाकतो रात्री-अपरात्री जर तुम्हाला एखादी वाईट शक्ती तुमच्या जवळपास येऊन काही मागणी करत असेल
तर चुकून ही काडीपेटी आपण अशा व्यक्तीला देऊ नका उलटपक्षी आपण ती काडी पेटीतून एक काडी काढून अवश्य पेटवावी आणि शक्य असेल तर ह्या माचीसच्या बॉक्सचे दान आपण गोर गरिबांना करावं राहु प्रसन्न होतो
आणि राहुचे दोष सुद्धा बऱ्याच अंशी कमी होतात . स्वतःची अनामिक भीती कायमची घालवण्यासाठी हा जालीम उपाय नक्की करून पहा,यामुळे तुमचं जीवन नक्की शांतीपूर्ण होईल व जगणं छान वाटेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.