गुरुपौर्णिमे पर्यंत करा ही स्वामी सेवा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा देखील म्हणले जाते. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्यासाठी हा मंगलदिन साजरा केला जातो.

असे सांगितले जाते की, महर्षी व्यास यांच्याएवढे श्रेष्ठ गुरु, आचार्य हे कोणीच अद्याप झालेले नाहीत . अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे, असे शास्त्रात कथन केले आहे.

एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.

यावेळी गुरुपौर्णिमा 23 जुलैला आहे. हा गुरु पौर्णिमेचा दिवस स्वामी सेवेकरी , स्वामी भक्तांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. प्रत्येक सेवेकरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुची विशेष सेवा करून थोडे पुण्य आपल्या भाग्यात घेत असतो.

त्यासाठी तो कधी स्वामींच्या केंद्रात जातो तर कधी घरात राहून यांची पूजा करत असतो. याबरोबर तुम्ही एक उपाय केला तर तुमचे सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

हा उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमा येण्याच्या आधी कोणत्याही दिवशी करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला फक्त गुरुपौर्णिमा येण्याआधी आपल्या देवघरात एक वस्तू ठेवायची आहे

आणि एक वस्तू ठेवल्या नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू दान करावी ,त्यामुळे तुमच्या घरातील गरिबी, दरिद्री कटकट, इडापिडा ,दोष त्या वस्तू सोबत घरातून बाहेर जाऊन ,तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

पौराणिक ग्रंथामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचं खूप महत्त्व सांगितले गेले आहे. म्हणून तुम्हाला ही वस्तू आधीच आपल्या देवघरात ठेवायची आहे.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आपल्या देवघरात 11 रुपये ठेवायचे आहेत. हे 11 रुपये तुम्ही देवघरात कोणत्याही जागी ठेऊ शकता

आणि रोज आपण सकाळ-संध्याकाळ देवपूजा करताना हे 11 रुपयाची सुद्धा हळदी-कुंकू आणि अक्षता टाकून पूजा करायची आहे.

गुरुपौर्णिमा येण्याच्या आधीच तुम्हाला ते 11 रुपये देवघरात ठेवायचं आहेत. तसेच त्याची रोज पुजा करायचे. मग ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे.

23 जुलैला त्या दिवशी हे 11 रुपये दान करायचे आहे. यामध्ये तुम्ही हे 11 रुपये कोणत्या मंदिरात दान करू शकतात

किंवा स्वामींच्या केंद्रात तसेच मठात दान करू शकतात किंवा कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करावे.

अशा प्रकारे हे 11 रुपये दान केल्यास सर्व प्रकारची इडा-पिडा ,दोष , कटकटी तुमच्या घरातून निघून जातील.

पण हा उपाय तुम्हला गुरुपौर्णिमा येण्याआधी एक-दोन दिवस आधी किंवा आजपासून करायला सुरुवात केली पाहिजे.

तुम्ही हे अकरा रुपये देवघरात ठेवून द्यावे आणि त्यांची पूजा करत राहिल्याने त्या गुरुपौर्णिमाच्या दिवशी ते दान करायचे आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!