नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस,
पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,’ असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले.
यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले.
तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी.
देवशयनी एकादशी व्रताची सुरुवात दशमी तिथीच्या रात्रीपासून होते. दशमीला रात्रीच्या जेवण्यात मीठ खाणे टाळावे. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कार्य आटपून व्रत संकल्प घ्यावा.
विठोबाची मूर्ती आसानावर विराजित करुन त्यांची विधीपूर्वक पूजा करावी. पंचामृताने स्नान घालावं. नंतर देवाची धूप, उदबत्ती, दीप, पुष्प इतर सामुग्रीने पूजा करावी.
देवाला समस्त पूजन सामग्री, फळ, फुलं, सुके मेवे, मिष्ठान अर्पित करुन मंत्र द्वारा स्तुती करावी. याव्यतिरिक्त शास्त्रात सांगण्यात आलेले सर्व नियम पाळावे.एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विठ्ठल पूजन करावे.
देवाला पिवळे वस्त्र, पिवळे फुलं, पिवळे फळं, पिवळं चंदन अर्पित करावं. त्यांचे हात शंख, चक्र, गदा आणि पद्म सुशोभित करावे.
देवाला विडा आणि सुपारी अर्पित केल्यावर धूप, दीप याने आरती करावी.
या मंत्राचा जप करावा
‘सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत्सुप्तं भवेदिदम्। विबुद्धे त्वयि बुद्धं च जगत्सर्व चराचरम्।।’अर्थात हे जगन्नाथ! आपके निद्रेत गेल्याने संपूर्ण विश्वाला निद्रा लागते आणि आपण जागृत झाल्यावर संपूर्ण जग आणि चराचर जागृत होऊन जातं.
हा संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावं. रात्री देवाचे भजन व स्तुती करावी.
विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. यादिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जयघोष करत असतात.
आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं करावं. या दोन्ही दिवशी देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा.
शास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते.
तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते. एकादशीच्या दिवशी रात्री झोपणे, पान खाणे, खोटं बोलणे, जुगार खेळणे या गोष्टी करु नयेत.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.