14 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या , घरात नक्की करा एक विशेष नैवेद्य, सर्व पितृदोष नष्ट होतील, गरिबी पळून जाईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपले पूर्वज आपला आदर्श असतात, त्यांच्या साहस आणि पराक्रमाचा वारसा आपण जपत असतो, त्यांचं धैर्य,संस्कार आपण आमलात आणून त्यांचं जतन करून पुढच्या पिढीकडे देखील देत असतो, तरच आपले पितर प्रसन्न होतात, याशिवाय शास्त्रानुसार पितरांना शांत करण्यासाठी,

प्रसन्न करण्यासाठी आणखीन एक उपाय सांगितलं आहे, तो म्हणजे पितृपक्षात करायचा उपाय. पितृपक्ष हा सुरू झाला आहे तो 14 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे, त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्या पर्यंत हा पितृपक्ष असतो. ज्या पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांचा ज्या तिथीला मृत्यू झाला आहे

त्या तिथीला श्राद्ध करतो जर तुम्हाला तिथी लक्षात नसेल तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येला हे श्राद्ध व तर्पण करू शकता. कारण पूर्वजांच्या पिंड दानासाठी अमावस्या तिथी सर्वोत्तम मानली जाते.

श्राद्ध करताना आपल्या घरातून नैवेद्य बनवावा, आपल्या पितरांना खुश करण्यासाठी हा शास्त्र पुराणात सांगितलेला उपाय म्हणजेच नैवेद्य केल्यास,तुमच्या कुंडलीतील सर्व पितृदोष नष्ट होतील. पितृ तुमच्यांवर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल.

हा काळ म्हणजेच पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाचा सगळ्यात मोठा दिवस हा सर्वपित्री अमावस्येचा दिवस मानला . या दिवशी सर्व पितर पाहत असतात की आपण त्यांचं स्मरण करतो की नाही.

त्यांना खुश करण्यासाठी याच सर्वपित्री अमावस्या दिवशी एक खास करून पितरांसाठी एक नैवेद्य करायचा आहे. तुम्ही जो काही स्वयंपाक कराल, श्राद्धासाठी त्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून समाविष्ट करा.

कारण ही वस्तू प्रत्येक पितृना अगदी प्रिय, आवडती मानली जाते.ज्या ज्या वेळी आपण पितरांच श्राद्ध करतो,त्यामध्ये जास्तीत जास्त करून आपण तळलेले पदार्थ त्या जेवणात करत असतो.

स्वयंपाक करताना एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की, जो आपला स्वयंपाकाचा सुगंध असतो,त्याने सुद्धा पितर आमंत्रित होत असतात. 14 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्याच्या तिथीला घरामध्ये जेव्हा जेवण नैवेद्य श्राद्धासाठी करता,

त्यामध्ये तांदळाची खीर करायची आहे. कारण हिंदु शास्त्रानुसार, प्रत्येक पितरांना तांदळाची खीर अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते आणि तुम्ही हा विशेष नैवेद्य करा, पितृपक्ष काळात बाकी नैवेद्याच्यामध्ये एक वाटी खीर नक्की ठेवलीच पाहिजे.

समजा जर तुम्ही पूर्वजांच्या तिथीला श्राद्ध घातला असाल तर सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्ध करत नसाल, तर तुम्ही खीर करायचीच आहे आणि ती खीर एखाद्या तुमच्या घराच्या छतावर किंवा अशा जागेवर ठेवायची की, तिथे पक्षी किंवा कावळे येतील.

यामध्ये काही लोकांची समस्या असते की,त्या लोकांच्या घरांवर गच्ची, टेरेस नाही. अशा वेळी हा नैवेद्द तुम्ही अशा जागेवर ठेवा की, जिथे प्राणी तोंड लावणार नाही, फक्त पक्षी येतील व कोणीही पक्षसुद्धा कावळे किंवा चिमणी असल्या कोणताही असू द्या, अशा जागेवर ठेवावे.

तसेच जर तुम्ही श्राद्ध करीत नसाल,तर एकच वाटी खीर तुम्हाला ठेवायचीच आहे आणि श्राद्ध करत असाल, तरीही तुमची श्राद्ध करण्याची परंपरा आहे त्यामध्ये तुम्ही खीर समाविष्ट करा.

पितर जर खुश असतील, प्रसन्न असतील तर ते वंश वृद्धीसाठी आशीर्वाद देतील अन्यथा जर नाराज असतील ते सर्वच कामे अडतात. पितरांना मुक्त करण्यासाठी जा रामबाण उपाय जो अगदी सोपा आहे तो करा,

जीवनातील गरीबी निघून जाईल. ठीक 12 वाजता तुम्ही 51 रुपयांचे दान त्या मध्ये 30 रुपयांचे पेढे, 10 रुपयांचे जानवे आणि 11 रुपये दक्षिणा घेऊन 12 वाजता कोणत्याही ब्राम्हणाला दान करा. काही न काही दान नक्की करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!