नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, फुले सर्वाना प्रिय असतात, मानवाला, देवाला. ताजी ताजी फुले अगदी मन प्रसन्न करतात. कुणी गजरा, तर कुणी देवघरात हार करण्यासाठी याचा वापर करत. देवीदेवतांना त्यांच्या आवडत्या वस्तू जर अर्पण केल्या तर ते त्वरित प्रसन्न होतात.
म्हणून आपण त्या त्या देवी देवतांना प्रसाद व पूजेचे साहित्य जे त्यांना प्रिय असेल ते अर्पण करावे. भारतातील जास्वंदी ही बहुदा झुडुपस्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे.
साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले इ,याचे प्रकार पाहायला मिळतात.जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात..
हे जास्वंदीचे फुल जर सूर्यदेवाला नियमितपणे अर्पण केल्यास , सर्वात मोठा शत्रूही तुमच्या पुढे हार मानेल. आपण देवाची पूजा करतांना अनेक फुलाचा हार करत असतो. त्यामध्ये जास्वंदीचे फुल वापरल्यास काही चमत्कारिक फायदे होतात, असे सांगितले आहे.
देवपूजेतील देवाला कोणती फुले अर्पण करावी, हे देखील खूप महत्वाचे मानले जाते. यामध्ये जास्वंदीच्या फुलाला खूप महत्त्व मानले जाते. हे फुल अनेक रंगात उपलब्ध असते.
पण आपल्याला या एका उपायासाठी लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुलाची गरज लागणार आहे. हे फुल प्रामुख्याने माता लक्ष्मी, भगवान गणेशजी, माँ दुर्गा सर्वांनाच आवडते. हनुमान जी यांना जास्वंदीचे फुल देखील आवडते.
असे म्हणतात की, जर मंगळवारी हनुमान जी किंवा माँ दुर्गा यांना जास्वंदीचे फुल अर्पण केल्यास तसेच शुक्रवारी देवी लक्ष्मीला अर्पण केल्यास आपल्याला सुख व समृद्धी मिळत असते. याशिवाय आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते. ग्रहांची दशा शांत होते.
तसेच दुसरीकडे, सूर्यदेवतेच्या पूजेमध्ये जास्वंदीच्या फुलाचा वापर केल्यास , इच्छा असूनही शत्रू तुमचे नुकसान करु शकत नाहीत आणि तुमचे आयुष्य दीर्घायु बनते. तसेच तुमचे आरोग्य चांगले राहते, निरोगी राहते.
असे मानले जाते की , मां दुर्गा जास्वंदीच्या फुलामध्ये वास करत असते आणि या फुलांच्या हिरव्या भागात बुध आणि केतू राहत असतात. या जास्वंदीच्या फुलाच्या शेवटी शनिदेव असतात.
याशिवाय हे फुल सूर्याचे प्रतिनिधित्व करत असते. तसेच या जास्वंदीच्या फुलाच्या माध्यभागी भगवान चंद्र असतात. या जास्वंदीच्या फुलाचे वास्तुच्या दृष्टिकोनातून काही फायदे सांगितले जातात, यामध्ये जर तुम्ही हे जास्वंदीचे फुल तुमच्या घरातील गुलदस्त्यात लावल्यास,
तुमच्या घरात प्रेम आणि नात्यातील मजबुती वाढते. जास्वंदीचे फुल वापरण्याचा, असा एक उपाय आपल्याला करावयाचा आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येकावर राज्य करण्यास सक्षम असाल.
जो उपाय आपल्याला रविवारीच्या दिवशी करायचा आहे, त्यादिवशी जास्त लाभदायक ठरतो. या उपयासाठी आपल्याला श्री गणेशांना 8 जास्वंदीचे लाल फुले अर्पण करावी,
मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही फुले सूर्यप्रकाशमध्ये अर्धा तास ठेवावीत. तसेच मग ही फुले नंतर सावलीत ठेवावी. अशा प्रकारे, ही प्रकिया सलग दोन-चार दिवसांत केल्यास , ही जास्वंदीचे फुल पूर्ण सुकून जातील.
त्यासाठी आपण याची पावडर तयार करायची आहे. याशिवाय या मिश्रणात थोडेसे कापूर ,आणि चिमूटभर कुंकु मिक्स करून घ्यावे. अशा प्रकारे हा तुमचा वाशीकरण टिळक तयार होतो. याचा वापर कोणत्याही व्यक्तीला वशीकरण करण्यासाठी करावा.
तुम्ही जेव्हा हा टिळक लावून कुठेही बाहेर पडता, तेव्हा कोणत्याही प्रकारचे लोक तुमचा विरोध करणार नाहीत. त्यामुळे आपले प्रत्येक कार्य पूर्ण होईल. तसेच अनेक देवी-देवता ज्यांच्यात देवतांचे निवासस्थान असते आणि याशिवाय भगवान गणेशाला, जो बुद्धीचा देव आहेत,
त्यांना अर्पण केल्यामुळे या टिळकाची शक्ती आणखीनच वाढत असते. असा हा चमत्कारिक उपाय नक्की करून पहा. दुसरा उपाय म्हणजे एक तांब्याचा कलश व त्यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी व 7 काळे मोरया टाका व अर्घ्य सूर्याला द्या.
त्या आधी पाच वाती दिव्यात पंचमुखी लावा आणि तो तुळशीत लावा. 5 तांदूळ घेऊन तुम्ही शिवलिंगावर वाहा व ओम नमः शिवाय मंत्र 1008 वेळेस बोलून इच्छा व्यक्त करा. तुम्ही तुमच्या यशाच्या जवळच असाल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.