नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पितृपक्षात पंधरा दिवसांच्या कालावधीत आपले पित्र म्हणजेच असे लोक जे आज आपल्यात नाहीत ,त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना आपण आपले पितर म्हणतो. हे पितृलोक या 15 दिवसात या धरती लोकावर येतात,
आपल्या घरी येतात,मग ते कोणत्याही रुपात येतील, कुत्रा असेल, मांजर असेल , गाय असेल , कोणताही पशू असेल या पशूच्या किंवा अगदी सूक्ष्म जिवांच्या स्वरूपात सुद्धा येतात. पितर आपल्या घरी येतात या पंधरा दिवसांसाठी आणि अनेक लोक पितरांचे श्राद्ध घालतात,
तर्पण करतात, ज्या तिथीला पितरांचा मृत्यू झालेला आहे आपल्या पूर्वजांना आपण ज्या तिथीला अग्नी दिलेला आहे आपण त्या तिथीला आपल्या पितरांच्या नावे जेवू घालतो .
आपले जे पितर असतात त्यांचा आपल्या जीवनावर एकंदरीतच फार मोठा प्रभाव पडत असतो, इतर कोणत्याही कारणास्तव आपले पितर प्रसन्न असतील, आपल्यावर नाराज असतील तर आपल्या जीवनात पितृ दोष उत्पन्न होतात आणि मग कोणत्याही कामामध्ये सातत्याने अडथळे येत राहतात.
कामे पूर्ण होत नाहीत. पंधरवड्याच्या पितृपक्षात दररोज रात्री दररोज सायंकाळी एक दिवा आपल्या घरात प्रज्वलित करणे हा एक जबरदस्त परिणामकारक उपाय आहे. पितर हे पाहण्यासाठी आलेले असतात की आपण त्यांचे स्मरण करतो की नाही, त्याच्या फोटोला पण हार अर्पण करतो की नाही,
तर अत्यंत साधा सोपा मात्र प्रभावशाली हा उपाय आहे. ज्यामुळे आपले पितर हे अत्यंत प्रसन्न होतात. आपला आशीर्वाद देतात आणि मग प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळू लागतं. आपल्या घराची दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते . हा उपाय पितृपक्षात दररोज करण्यासारखा आहे.
मात्र दररोज करणे तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी या पितृपक्षातील पौर्णिमा, अमावस्या, एकादशी आणि तुमच्या पितरांची मृत्यूची जी तिथी आहे अगदी कमीत कमी त्या दिवशी आपण हा उपाय नक्की करा.
सायंकाळी किंवा रात्री व्हायचा आत, दिवसा करायचं नाही, जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा उपाय करावा. हा उपाय करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावेत . स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि त्यानंतर एक दिवा लावावा, दिवा मातीचा असेल, पितळेचा , धातूचा किंवा पिठापासून मळलेल्या कणकेचा सुद्धा चालतो.
असा एक दिवा आपण घ्यायचा आहे , त्यामध्ये कापसाची वात टाकायचे आहे किंवा मोहरीचे तेल वापरू शकता. मोहरीचे तेल अति उत्तम मानले जाते, या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ मात्र नक्की टाका.
तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर ही कणीक मळताना त्यामध्ये मीठ मात्र चुकूनही टाकू नका या गोष्टीची काळजी घ्या. हा दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा, म्हणून आपल्या घराची दक्षिण दिशा आहे तिथं हा दिवा लावायचा आहे आतील किंवा बाहेरच्या बाजूला लावणे शक्य असेल तर तेही करा.
मात्र आतील बाजूला लावणे हे श्रेयस्कर आहे, दक्षिणेकडची जी भिंत आहे तो कोपरा व्यवस्थित साफ स्वच्छ करून घ्या आणि त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे. कोणत्याही कारणास्तव जर या दक्षिणेकडे तुमची एखादी बाथरूम टॉयलेट असेल किंवा नसेल तर मात्र हा कोपरा कटाक्षाने टाळा.
त्या ठिकाणी हा दिवा लावू नका. त्या जागा नकारात्मक ऊर्जा ने भरलेल्या मानल्या जातात, त्या ठिकाणी केलेले उपाय हे सफल होत नाहीत, दक्षिणेकडची जी भिंत आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही साफसफाई करून हा दिवा प्रज्वलित करू शकता .
काही अडचणी असतील तर कधी घरातील कोणती म्हणून घ्या. आता हा दिवा लावताना दिव्याखाली तांदूळ मात्र नक्की टाका तांदूळ टाकून ठेवा, शक्य नसेल तर एखादि प्लेट किंवा वाटी घ्यावे, झाडाची पान पण ठेवू शकता.
प्रथम गणेशजींना प्रणाम करावा, भगवान श्री महालक्ष्मीना नमन करावं आणि सर्वात शेवटी पितृ देवांना नमस्कार करा आणि प्रार्थना करायचे आहे, हे पितृदेव आमच्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभो,
या आमच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करायची. आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळो देण्याची त्यानंतर आपल्या पितरांना आपण प्रणाम करायचा आहे.
वंदन करायच आहे प्रार्थना करायची की आपल्या जीवनात जर पितृ दोष असतील तर पित्रू दोषा पासून आपल्याला मुक्ती मिळावी. आपल्या घरात सुख-समृद्धी सौभाग्य शांतता समाधान नांदावे . त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा 11 वेळेस जप करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.