10 ऑक्टोबर पूर्वी एकदा वाचा, साक्षात स्वामी दिसतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.

त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.

कोणीही कोणत्याही धर्मपंथांच्या मार्गाने गेलात तरीही, समाजापुढे एक ‘आदर्श’ राहिला पाहिजे. ‘सर्व देव नमस्कार: केशवं प्रतिगच्छति।’ याचा दाखला श्री स्वामी देत असत.

भोंदू लबाड माणसे ही समाजाला लागलेली कीड असून तिचा बंदोबस्त वेळीच करावयास हवा, असं स्वामींचे मत होतं. समाजातील निष्क्रियतेवर ते नेहमीच आघात करीत. ‘आळशी माणसाचे तोंडही पाहू नये’असे स्वामी नेहमी म्हणत.

‘बैलासारखे कष्ट करा’ असा त्यांचा सततचा आग्रह होता. स्वामींचा कर्मवादावर भर होता. कोणी मनात विवंचना करीत बसल्यास, ‘काय रे, तुजजवळ बैल नाहीत काय?’ असा प्रश्न महाराज करीत. ‘मेहनत करून खावे. शेत करून खावे.’

असे ते सांगत. हा कर्मयोग श्री स्वामींनी सातत्याने सांगितला. आपणही स्वामींचे सेवेकरी असाल तर हा उपदेश आपल्याला माहीत असायलाच हवा. काही वेळी मन खूप चिंतीत असते, काळजी करत असते

त्यामुळे इच्छा असूनही आपण स्वामींची सेवा मनापासून करू शकत नाही. अशा वेळी मनात खूप वाईट विचार येतात. खूप वेळेस मनात भलते सलते विचार येतात. अशा वेळी स्वामींनी आपल्याला खूपच मदत करतील असे उपाय सांगितले आहेत.

श्री स्वामी समर्थ , समर्थ अक्कलकोटचे एक अवतारी पुरुष होऊन गेले , तसेच स्वामींना दिगंबर दत्ताचा अवतार देखील मानतात. पद्मासनात बसलेली एक प्रसन्न व्यक्ती, हाती एक मणी, चेहऱ्यावर युगायुगांच्या खुणा, असीम तेज असे ते स्वामींचे रूप पाहून भक्त प्रसन्न राहतात.

स्वामींची अनेक रुपं आपल्याला पाहायला मिळतात. माऊलीच्या रुपात देखील स्वामी शांत व आपल्याला आधार देणारे वाटतात. परंतु त्यांचे रूप ने मूळ स्वरूपात आहे ते म्हणजे पद्मासनात चैतन्यमूर्ती व शरीरावर तेजस्वी वलये, साधनेचे अमोघ तेज पाहायला मिळते.

एकदा एक स्वामींचा भक्त स्वामींकडे जातो व तो सांगतो की स्वामी मला जप, पूजा , नामस्मरण करताना मनात खूपच वाईट विचार येतात , जप करताना ते विचार मला विचलित करतात त्यामुळे माझी खूप इच्छा असूनही मी ते नीट मनापासून करू शकत नाही.

यावरती स्वामींनी अतिशय छान समजावून सांगितले, स्वामी त्याला म्हणाले की तुझी 2 घरे आहेत, त्यापैकी एक तू स्वतः वापरतोस व दुसरं तू भाडेकरु ला दिल आहे, जर तू अचानक त्या भाडेकरूला घर सोडून जायला सांगितलं तर तो जाईल का? नाही ना?

तो विरोध करेल? चिडेल, भांडण करेल किंवा मुदत मागून घेईल अगदी तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. जर तू अचानक नाम, जप करण्यासाठी बसशील तर तुझ्या अंतरी असणारे षडरिपु बाहेर डोकावतील,

तुला त्या चांगल्या गोष्टींपासून परावृत्त करतील, सुरुवातीला हे मानवी गुण म्हणजेच लोभ, माया, मत्सर तुला जप करताना अडथळा आणतील परंतु जर पुन्हा पुन्हा जोमाने तू नाम जप सातत्यपूर्ण करशील तर नक्कीच मनावर ताबा मिळवशील.

आणि खरंच आपलं सुद्धा असच होतंय, आपणही जपत सातत्य ठेवलं तर वाईट विचार न येता चांगले विचार सतत मनात येतील, श्रद्धा भक्ती वृद्धिंगत होईल.
आपलं जीवन भक्तिमय बनवा.

घरी स्वामी प्रतिमे समोर शांत शून्य नजरेने स्वामीजिंकडे पहा, बाकी सर्वकाही विसरून जीवन अनमोल आहे, स्वामी माउली मला या संकटाचा नाश करण्यासाठी ताकद दे बोला, तसेच जीवनात असणारे टेन्शन निघून जाऊदेत,

हे माऊली तुम्ही सदैव पाठीशी रहा असे म्हणत स्वामींचा नाम जप मंत्रजप करा, जितका शांतपणे जास्त करता येईल तितका करा. मग बघा तुमच्याकडे किती छान ऊर्जा येते, मनातील भीती, दडपण निघून जाते व असणाऱ्या संकट हसत हसत सहज सामोरे जाल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!