नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, निसर्गामध्ये अशा असंख्य प्रकारच्या वनस्पती आहेत की या वनस्पतींच्या मदतीने आपल्या शरिरातील जे काही आजार असतील हे सर्व आजार मुळापासून दूर होतील. या वनस्पतीमध्ये प्रचंड प्रमाणात ताकत पाहायला मिळते.
या व अशा अनेक वनस्पती आहेत की त्या वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून अशा वनस्पतींचे जतन करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. अशा वनस्पती आपल्या कुंडीमध्ये लावा, परसबागेमध्ये लावा, या वनस्पतींचे जतन करा आणि ही वनस्पती जिच्या मदतीने सर्व विकार नष्ट होतील.
तुम्ही जर नियमित बाहेरच जेवण करत असाल, यामध्ये वडापाव जास्त प्रमाणात असेल, चहा, बाहेरचे फास्टफूड तसेच बंद पाकीट मधील जे जे पदार्थ आहेत, जसे मैदा असेल, असे जर तुम्ही जास्त खात असाल, तुमचे वजन वाढले असेल, तर तुमच्यासाठी ही वनस्पती अत्यंत वरदान ठरणार आहे.
आपण जे अन्न वापरतो, वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी बऱ्याचदा अनेक प्रकारचे पेस्टिसाइड्स वापरतात , याचा एकत्रित परिणाम आपल्या शरिरातील किडनी लिव्हर वरती त्याचा परिणाम होतो आणि याच्या गंभीर समस्या आपल्या शरीरात जाणवतात.
यामध्ये बऱ्याच व्यक्तींना किडनी स्टोन पाहायला मिळतो. महिलांना पीसीओडीचा त्रास असेल , या संबंधीच्या समस्या असतील, पोट साफ न होणे, कमजोरी असेल, सेक्स संबंधी समस्या असेल, या सर्व समस्यावरती ही वनस्पती रामबाण कार्य करणार आहे.
याचा एकत्रित परिणाम आपल्या किडनीवरती होतो म्हणून किडनी संबंधित सर्व आजारावरती ही वनस्पती अमृतासारखे काम करते. या वनस्पतीचे नाव गोखरू आहे. सर्वत्र ही वनस्पती पाहायला मिळते. ही वनस्पती प्रत्येकासाठी फायदेशीर ठरणारी वनस्पती आहे.
या वनस्पतीचा सर्वप्रथम पहिला उपाय , ज्या व्यक्तींना अपचनासंबंधित तक्रारी आहेत, ज्यांना भूक लागत नाही अशा व्यक्तींनी 10 ग्रॅम गोखरू आणि एक ते दोन ग्राम ओवा याचा काढा बनवून ते सकाळी उठल्याबरोबर तुम्ही घ्या. तुमच्या अपचनाच्या सर्व तक्रारी कमी होतील.
सोबत गर्भाशयाचे विकार असतील आणि बऱ्याच वेळेस बाळंतपणानंतरची जळजळ असेल तीही कमी होण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. काही व्यक्तींना लघवी संबंधित तक्रारी आहेत, वारंवार लघवी करणे,
अधून मधून लघवी करणे किंवा वृद्ध लोकांना अशा तक्रारी आहेत त्यांनी गोखरू व काळे तीळ याचे चूर्ण समान प्रमाणात घ्यायचे आणि सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा ही पूड खाल्ले तर कसलाही पोटा संबंधित तक्रारी आहेत,
किडनी संबंधी तक्रार आहेत, ते कमी होतात तसेच बऱ्याच व्यक्तींना कमजोरी, अशक्तपणा ज्या तक्रारी आहेत यावरती हे मिश्रण अत्यंत फायदेशीर ठरत. भृंगराज, बुलेठी, आवळा आणि गोखरू याच एकत्रित मिश्रण तयार करून याच एक एक चमचा जर तुम्ही संध्याकाळी झोपताना किंवा सकाळी उठल्याबरोबर
घेतल्याने याचा शरीरास अत्यंत फायदा होतो. बऱ्याचदा महिलांना गर्भाशयाच्या संबंधित तक्रारी असतात, गोखरू अत्यंत गुणकारी वनस्पती आहेत यासाठी गोखरू चे चूर्ण पाच ग्रॅम लागणार आहे, सोबतच 20 ग्रॅम साखर लागणार आहे
आणि दहा ग्रॅम तो तूप लागेल.तिन्ही पदार्थ एकत्र मिक्स करून सकाळी उठल्याबरोबर एक वेळेस घ्या आणि हा उपाय सलग एक महिना करा. गर्भाशयाशी संबंधित सर्व तक्रारी एकदम कमी होतील. सोबतच बऱ्याच व्यक्तींना मुतखडा होण्याची तक्रार आहे,
ऑपरेशन करूनही बऱ्याच व्यक्तींना मुतखडा वारंवार होतो, अशा व्यक्तीने गोखरू जे आहे याचे चूर्ण करून सकाळी उठल्याबरोबर नियमित एक महिन्यापर्यंत घेतल्याने आपल्या शरिरातील मूतखडे पडतात आणि वारंवार मुतखडा होण्याची समस्या जी आहे पूर्णता मुळापासून जाते.
अत्यंत गुणकारी वनस्पती त्यासाठी ठरते. बऱ्याच व्यक्तींना कंबर दुखीचा त्रास पाहायला मिळतो, कंबर दुखी असणाऱ्या व्यक्तीने या गोखरू चूर्ण पाच ग्रॅम सोबत सुंठीचे चूर्ण पाच ग्रॅम घ्या, चार कप पाण्यामध्ये टाका,
उकळून घेत एक कप शिल्लक राहिल्या नंतर हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर आपणास घ्यायच आहे. असा हा उपाय एक महिना केल्यानंतर कसल्याही प्रकारचा कंबर दुखीचा त्रास पूर्णतः कमी होतो. अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती प्रत्येक व्यक्तीने वापरा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.