नवरात्र येण्यापूर्वी घरातून बाहेर काढा या वस्तू, देवी सुखाने राहून जाईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, देवी लक्ष्मी आपल्या भक्तांची प्रत्येक क्षणी काळजी घेते, परंतु नवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा करणे विशेष फलदायी आहे. या काळात पूजेचे फायदेही लवकर मिळतात.

याचे कारण म्हणजे माता दुर्गा नवरात्रीच्या काळात पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकते.लवकरच शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु होईल. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवसापासून पुढील नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते.

यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या दिवसात देवीची मनोभावे पूजा व अर्चना केली जाते. तसेच येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी बळ मागितले जाते. सणसमारंभ आले की, आपण घराची साफसफाई करतो. परंतु, सफाई केल्यानंतर देखील काही जुन्या वस्तू टाकून न देता त्या घरात तशाच ठेवतो.

नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. याशिवाय नवरात्रीच्या काळात तुम्ही मातीचे छोटे घर खरेदी करून देवी मंदिरात ठेवू शकता, हे घरामध्ये सौख्य आणण्याचे काम करेल.

घरात मातीचे घर आणल्याने संपत्तीशी संबंधित योग तयार होतात. यामुळे पैशाची अडचण येत नाही. दुसरीकडे, विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये देवीला लाल ओढणी घालावी. असे केल्याने पतीचे आरोग्य सुधारते आणि ते दीर्घायुषी होतात.

नवरात्रीच्या काळात वस्त्र खरेदी करून घरात आणा. देवीला अर्पण करा. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील. नवरात्रीच्या काळात पताका खरेदी करणे आणि अर्पण करणे देखील चांगले मानले जाते.

माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते. नवरात्रीपूर्वीच लोक घरोघरी तयारीला लागतात. शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला आई अंबेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काही वस्तू बाहेर टाका, कारण या गोष्टी घरात नकारात्मकता आणतात.

तुटलेल्या मूर्ती, कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. हे शुभ मानले जात नाही. तुमच्या घरामध्ये भंगलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी त्या घरातून काढून पवित्र नदीत टाकाव्यात.

जुने शूज आणि चप्पल, तुमच्या घरात जुने शूज आणि चप्पल पडलेले असतील, जे तुम्ही वापरत नसाल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाका. वास्तु तज्ज्ञांच्या मते जुने शूज आणि चप्पल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते.

फुटलेल्या काचा, तुटलेल्या काचा किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाका.

फाटलेली धार्मिक पुस्तके, वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तके कधीही घरात ठेवू नयेत. कोणताही धार्मिक ग्रंथ फाटला असेल तर तो नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित करावा.

नवरात्रीपूर्वी घरातील जळमटं, घुळ काढून संपूर्ण घर स्वच्छ करावे. यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते.पताका म्हणजे विजयाचे चिन्ह. 9 दिवस घरी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पताकाची पूजा करणे शुभ आहे. त्यामुळे भाविकांनी या वास्तु टिप्सचा अवलंब करायला हरकत नाही.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!