नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ओम दुर्गादेवी नमः, दुर्गा मातेचा आशीर्वाद हवा असेल तर मातेचं आगमन होण्याआधी ही एक वस्तू नवरात्री येण्याआधी घरात नक्की आणा. घरात श्रीमंती येईल. सुख समृद्धी नांदेल. लक्ष्मीचा वास राहील.
नवरात्री यावर्षी सप्टेंबर सोमवार पासून सुरू होणार आहेत म्हणजेच 15 ऑक्टोबर नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना आहे. या दिवशी घटाची स्थापना केली जाईल. जर नवरात्रीत ही वस्तू तुम्ही घरी आणली तर पैसा तुमच्या घरामध्ये भरपूर येईल, कुठे अडकून असेल तर परत मिळेल.
घरातील वातावरण आरोग्यदायी संपन्न आणि सकारात्मक बनेल. नवरात्रीमध्ये देवी महालक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होते परंतु यासाठी नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीची पूजा करायला पाहिजे, घरांमध्ये साफसफाई करायला पाहिजे.
आणि असे काही उपाय देखील करायचे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल. वास्तुशास्त्रामध्ये काही वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या आपण आपल्या घरामध्ये आणल्यानंतर यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होते.
आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते, आपल्या घरावर परिवारावर त्यांची कृपा ठेवते आणि त्यामुळेच ही नवरात्र सुरू होण्याआधी देवी माता आपल्या घरात विराजमान होण्याआधी नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये या काही वस्तू आपल्याला आणायला पाहिजे.
सध्या बरेच लोक विचार करतात की पितृपक्ष सुरू आहे. म्हणून आम्ही नवीन काही खरेदी करणार नाही. नवीन कोणती वस्तू आहे ती पितृपक्षात तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही सात तारखेला दिवसा ही वस्तू आणू शकता,
परंतु सात तारखेलाच आणा, कारण नवरात्र त्या दिवसापासून सुरू होणार आहे. नवरात्रीच्या आधी आणायचे असेल तर आधी आणा किंवा सात तारखेला पहिल्या दिवशी आणि त्यानंतर पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही वस्तू आणू शकता.
तुम्हाला नवरात्री मध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुमच्या घरात तुमच्या कुलदेवतेची मूर्ती आणायची आहे. कुलदेवतेची मूर्ती तुमच्या घरात आधीपासूनच असेल तर तुम्ही नवरात्री दिवशी या कुलदेवतेच्या मूर्तीचे अभिषेक करायचे.
दुधाने पाण्याने त्यांचे पूजन करायचे आणि नऊ दिवसापर्यंत त्यांना विविध प्रकारचे नैवेद्य तुम्ही दाखवायच. त्यांची नित्य पुजा करायची. भजन,आरती करायची असं नऊ दिवसापर्यंत तुमच्या कुलदेवीची किंवा कुलदेवतेची तुम्ही आराधना सेवा करावी परंतु
तुमच्याकडे जर कुलदेवीची मुर्ती नसेल आणि कुलदेवी तुम्हाला माहीत असेल की आमची कुलदेवी अमुक ही आहे , तर नवरात्रीच्या दिवशी पहिल्या दिवशी किंवा नवरात्री येण्याआधीच तुम्ही ती मूर्ती घरात ठेवायची आणि आपल्या देवघरात मूर्ती स्थापना करायची.
काही वेळेस बऱ्याच लोकांना तर त्यांची कुलदेवी कोण आहे हेच माहीत नसतं तर मग अशा वेळेस तुम्ही कुलदेवीच्या नावाने एक कळस देवघरात स्थापन करावा, पहिल्या दिवशी तुम्ही स्थापन करावा म्हणजे मातीचा तांब्या घ्यायचा,
त्यामध्ये विड्याचे किंवा आंब्याचे पान लावायचे, शुद्ध पाणी भरायचं, त्यावर नारळ ठेवतात, त्याचे पूजन करायचे व तुमची कोणतीही कुलदेवता असू द्या फक्त स्मरण करायचं. कुलदेवीचे स्मरण करायचे.
नाव माहीत नसेल, कुलदेवी माहीत नसेल तरी तुम्ही स्मरण करायचे. देवीला नमस्कार करायचा.त्या कळसाची कुलदेवीची तोपर्यंत पूजन करायचे आणि नऊ दिवस झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ते नारळ न फोडता,
त्याचे पान असतील, ते सर्व तुम्ही विसर्जन करा, कळसाच पाणी असेल तर तुम्ही तुळशीमध्ये टाकू शकता आणि आंब्याची पानं नारळ असेल तर वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकता. तर अशा रीतीने तुम्ही नवरात्री येण्याआधीच किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरी कुलदेवीची मूर्ती आणा किंवा कळस स्थापन करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.