या चुका करू नका, परिणाम 0 मिळेल, देव कधीच साथ देणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,देवाला काहीही अर्पण करताना नियमांचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. असे म्हटले जाते की, देवाला आपल्या हातात दिलेले फुल आवडत नाही, तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले चंदन आणि प्लास्टीकच्या भांड्याच ठेवलेले गंगाजल कधीही अर्पण करु नका.

देवाला नेहमी तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यातच पाणी अर्पण करावे.मंदिरात देवघरात मांसाहार वर्ज्य, तसेच तो करून जाणे देखील. धूम्रपान करू नये. पूजा करताना कोणत्या देवतेला काय अर्पण करावे आणि कोणते करू नये हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, पूजा करताना भगवान विष्णूला तांदूळ, गणेशाला तुळस आणि माँ दुर्गाला दुर्वा अर्पण करु नका. याशिवाय चुकूनही सूर्यदेवाला बिल्वपत्र अर्पण करू नका. असे केल्याने देव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतात.

पूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो. मात्र पुजा करताना हा दिवा अनेक वेळा विझतो. पूजा करताना हा दिवा चुकूनही विझू देऊ नका. हे शुभ मानले जात नाही.

दिव्याला दिवा लावून तो जळवू नका- अनेक वेळा एखादी व्यक्ती नकळत काही चुका करते, ज्यामुळे भविष्यात त्याच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. शास्त्रानुसार पूजा करताना दिवा लावताना अनेकदा लोक ही चूक करताना दिसले आहेत.

दिव्याने कधीही दिवा लावू नये, अशी श्रद्धा आहे. असे केल्याने माणूस गरिबीकडे जातो.ज्योतिष शास्त्रानुसार पूजेच्या वेळी हातात सोन्याची अंगठी कधीही घालू नका. तसेच कोणत्याही शुभ कार्यात दुसऱ्या व्यक्तीची अंगठी घेऊ नये.

घरातील कोणत्याही पूजाविधी किंवा हवन इत्यादी वेळी पत्नीला उजव्या हाताला बसवावे. त्याचवेळी अभिषेक करताना, ब्राह्मणांचे पाय धुतांना आणि सिंदूर दान करताना पत्नीने डाव्या बाजूला बसावे.

आपण जसे आपल्या आप्तजनांना आवडत्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि देतो त्याचप्रमाणे देव पूजेतही ज्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्याच अर्पण कराव्यात. आणि ज्या आवडत नाहीत त्या चुकूनही अर्पण करू नये.

जसे की भगवान विष्णूला तांदूळ, गणेशाला तुळशी आणि देवीला दुर्वा तसेच सूर्यदेवाला बिल्वपत्र अर्थात बेल अर्पण करू नये!पूजा करताना पूजा होईपर्यंत दिवा मालवणार नाही अशा बेताने त्यात तेल, तूप घालून पुरेल अशी वात ठेवावी.

वाऱ्याने दिवा मालवल्यास पुन्हा लावावा, मात्र पूजा होईपर्यंत दिवा पूर्णवेळ ठेवावा. अन्यथा मनाला रुखरुख लागते.दिव्याने दिवा लावू नये, कारण पूजा करताना आपण एकाच वेळी देवांना स्नान, धूप दीप उदबत्ती ओवाळणे, गंध उगाळणे, फुलं अर्पण करणे, स्तोत्र म्हणणे अशा गोष्टी करत असतो.

परंतु त्यातच दिव्याने दिवा लावताना थोडी जरी गडबड झाली तरी अपघात होऊ शकतो. म्हणून तसे करणे टाळावे आणि काडेपेटीतील काडीने दिवा प्रज्वलीत करावा.

सपत्नीक पूजा करताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसावे असे शास्त्र सांगते. तिला वामांगी म्हणतात, कारण ती पुरुषाची डावी बाजू अर्थात कमकुवत बाजू सांभाळणारी असते.

म्हणून तिला नेहमी डाव्या बाजूला बसवूनच पूजा केली पाहिजे.पूजा करताना, मग ती दैनंदिन देवपूजा असो किंवा

नैमित्तिक सत्यनारायण किंवा तत्सम पूजा, त्यावेळेस तुमच्या मालकीची सोन्याची अंगठी असेल तरच ती घाला, दुसऱ्या कोणाची अंगठी घालून पूजा केल्यास ते दारिद्रयाला आमंत्रण ठरू शकते

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!