नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, उद्या सर्वपित्री अमावस्या आहे. यावेळी तुम्ही पितरांना मुक्ती देण्यासाठी नक्की काही उपाय करा. शास्त्रानुसार पिपळाच्या झाडावर सर्व देवी-देवता आणि पितरांचा वास असतो. यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा कायदा आहे.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की अमावस्या तिथीला पिंपळाची पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात. या तिथीला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी, काळे तीळ आणि दूध मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण केले जाते.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षात अनेक उपाय केले जातात. त्यात सर्वात जास्त प्रचलित गोष्ट म्हणजे श्राद्ध पक्षात दिला जाणारा पंचबळी. गाय, श्वान, कावळा,मुंगी व देवीदेवतांना अन्नदान देणे.
म्हणजेच पितृपक्षात जे आपण अन्न बनवतो, यात विशेषतः खीर बनवली जाते. असे केल्याने आपले पितृदेव आपल्यावर प्रसन्न होतात. या परंपरेमागे धार्मिक कारणे आहेत. कोणाला काय दान द्यावे , कधी द्यावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे मानले जाते.
भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्या पर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या क्रियेला पंचबळी म्हणतात कारण, आपण पितृपक्षात जे भोजन बनवितो त्याचा एक भाग एका पानावर काढून पश्चिम दिशेला गाईसाठी ठेवला जातो.
कारण गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर स्वर्गात जाताना जी नदी पार करावी लागते ती आहे वैतरणा नदी आणि ती नदी पार करण्यासाठी आपल्याला गाईची मदत होते. त्याशिवाय गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवीदेवतांचे वास्तव्य असते
आणि आपण जर गाईला अन्न दिले तर आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात. दुसरा भाग कुत्र्याला तर तिसरा भाग हा तुम्ही कावळ्याला खाऊ घाला. चौथा भाग हा ब्राम्हण भोजन अथवा गरजू गरीब व्यक्तीला द्या.
यादिवशी काही शास्त्रीय कामे केली जातात. काही ज्योतिषी उपाय जे आपल्या जीवनात असणाऱ्या अडचणी दूर करतात. यासाठी एक साबूत लवंग म्हणजेच तुटकेली नसावी,
फुल असणारी पूर्ण लवंग घ्या व सकाळी देवपूजा झाल्यावर महादेवाच्या पिंडीवर ही लवंग अर्पण करा. यासाठी जर तुमच्या घरी महादेवाची पिंड नसेल तर पिठाची तयार करू शकता व हा विधी करू शकता किंवा जवळपास मंदिर असेल तर तिथे अर्पण करावी
व अर्पण करताना प्रार्थना करा की तुमच्या कुंडलीतील दोष नष्ट होऊदेत. त्यामुळे याचा परिणाम नक्की जाणवेल. प्रार्थना झाल्यावर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप नक्की करा. त्यामुळे तुमचं जीवन सुखी व आनंदी होईल.
दुसरा उपाय असा की तुम्ही घरातील वाढलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करू शकता. यासाठी 10 ते 12 छोट्या कापराच्या वड्या, 5 साबूत लवंग व तसेच 3 मोठ्या विलायची एकत्र घ्या, एक वाटी मध्ये घ्या,
वाटी एका ताटात ठेवा व नंतर हे सर्व प्रज्वलित करा, हे कापूर, लवंग, विलायची तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. याच्या धुराने सर्व कीटक, नको असणारी अशुभ ऊर्जा घरातून बाहेर जाते.
त्यामुळे तुमचं घर शांतीपूर्ण बनेल. तसेच घरातून हे ताट अलगतपणे फिरवावे, सर्व खोल्या व कोपऱ्यात फिरवावे. तसेच घरातील या वस्तू जाळल्याने एक सकारात्मक ऊर्जा निर्मित होऊन दैवी शक्ती घरात प्रवेश करतात.
तिसरा उपाय असा की जर घरातील व्यक्ती सतत आजारी असेल, जाही केल्या आजार बरा होत नसेल तर हा उपाय करावा. एक साबूत लवंग घेऊन ती तुम्ही डाव्या हातात घेऊन मुठीत धरा, जी व्यक्ती आजारी आहे तिच्या वरून केसांपासून नखापर्यंत 7 वेळा उतरवा व आजार दूर होउदे यासाठी प्रार्थना करा.
त्यांनंतर टेरेस वरती जावे व तिथून शक्य तितक्या दूर ही लवंग फेकून द्या. अशी लवंग तुम्ही घरापासून दूर फेकल्यावर खाली या व हात पाय स्वच्छ धुवून देवघरात गुरू नामाचा, इष्ट देवतेचे नामस्मरण करा.
हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. 24 तासांत गुण दाखवेल. तसेच देवघरातील दिव्यात 1 लवंग टाका व त्यामुळे सर्व बाजूनी पैसा येऊ लागेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.