नवरात्रीत जर मिळाला संकेत तर लवकरच तुम्ही करोडचे मालक होणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, नवरात्री वर्षातून 4 वेळा येते – माघ, चैत्र, आषाढ आणि अश्विन. अश्विनची नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखली जाते. नवरात्रीच्या वातावरणामुळे तामस आणि नकारात्मक वातावरणाचा अंत होतो.

शारदीय नवरात्रीमुळे मनातील उत्साह आणि आनंद वाढतो. जगातील सर्व शक्ती केवळ स्त्री किंवा स्त्री स्वरूपाकडे आहे, म्हणून नवरात्रीत फक्त देवीची पूजा केली जाते आणि देवीला शक्तीचे रूप म्हटले जाते, म्हणून तिला शक्ती नवरात्र असेही म्हणतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते, ज्याला नवदुर्गेचे रूप म्हणतात. प्रत्येक रूपातून एक विशेष प्रकारचे आशीर्वाद आणि वरदान प्राप्त होते.

यासोबतच तुमच्या ग्रहांच्या समस्याही संपतात. यावेळेस शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 24 ऑक्टोबरला संपणार असून दहाव्या दिवशी दसरा साजरा होणार आहे.

सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे, सर्वजण देवीची मनोभावे पूजा करत आहेत, देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत आहेत, जर हे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अर्थपूर्ण संकेत मिळाले तर समजा साक्षात देवी दुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला आहे.

नवरात्र म्हणजे शक्ती आणि भक्ती यांचा अनोखा संगम, या आठ नऊ दिवसात जी व्यक्ती मनोभावे देवीला शरण जाते, देवीची पूजा करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना देवी नक्की पूर्ण करते.

तुम्ही तुमच्या घरात घटाची स्थापना केली असेल तर सकाळ संध्याकाळ देवीजवळ कापुराची आरती जरूर करा आणि जर घटाची स्थापना तुमच्या घरात केली नसेल तरीही सकाळी सायंकाळी देवाजवळ कापुराची आरती करावी व संपूर्ण घरात कापुराचा सुगंध फिरवावा यामुळे देवीची कृपा तुमच्यावर होईल.

कापुराची आरती करताना त्यात दोन लवंग टाका, यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल व घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होईल. घरातील वातावरण प्रसन्न होऊन देवी आशीर्वाद देते.

हे जे संकेत आहेत ते तुम्हाला नवरात्रात जर दिसले तर समजावे की देवीची कृपा आपल्यावर झाली आहे . आता सर्वकाही शुभ होणार आहे. आपण देवीची पूजा केली आणि देवीने ती पूजा स्वीकारलेली आहे तर काही खास संकेत आहेत.

आपल्याला असे संकेत मिळाले तर समजावे देवी संतुष्ट झाली आहे व आता देवीचं आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. याद्वारे तुमच्या लक्षात येईल की आपली पूजा सफल झाली आहे. घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे.

जर रात्रीच्या वेळी आपल्याला घुबड दिसले तर समजावे की लक्ष्मी मातेचे आगमन घरात झाले आहे, कारण घुबड दिसणे देवी लक्ष्मी प्रसन्न होण्याचा मार्ग आहे आणि ते जर नवरात्रीच्या रात्रीच्या वेळी आपल्या दृष्टीस पडले तर समजावे की देवी लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन झाले आहे.

तसेच नेहमी साधी राहणारी एखादी स्त्री किंवा कुमारीका तुम्हाला भरपूर शृंगार केलेली ,नटलेली दिसली तर समजावे तुमच्यावर देवीची कृपा झाली आहे. विशेषत जर एखादी नवविवाहिता तुम्हाला सोळा शृंगारमध्ये दिसली तर ते जास्तच शुभ असते.

यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील, त्याबरोबरच तुमच्या काही अडचणी व समस्या असतील तर त्यांचेही निवारण होईल. देवीला कमळाचे फूल खूप प्रिय आहे म्हणून एक तरी कमळाचे फूल देवीला नवरात्रीत जरूर अर्पण करावे.

अजूनही जर कमळाचे फूल अर्पण केले नसेल तर अष्टमी किंवा नवमीला एक कमळाचे फूल चरणी अर्पण करावे. जर नवरात्रात सकाळी सकाळी कोणी पूजेचे ताट घेऊन जात आहे व त्यात नारळ आणि कमळाचे फूल तुम्हाला दिसले तर हा एक शुभ संकेत आहे.

यापासून असा संकेत मिळतो की देवी तुमचे संरक्षण करण्यासाठी देवी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आता तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन सर्व अडचणी दूर होतील. जेव्हा तुम्ही नवरात्री देवीच्या दर्शनाला निघाला आहात

व तुम्हाला रस्त्याने गाय दृष्टीस पडली समजावे की देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आता पूर्ण होतील. रात्री जर तुम्हाला स्वप्नात नाग एका ठिकाणी बसलेला दिसला तर समजावे की लवकरच आपल्याला भरपूर धनलाभ होणार आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!