पाल दिसण्याचे शुभ अशुभ संकेत? धनवान बनाल की कंगाल व्हाल??

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पाल हा असा प्राणी आहे ज्याच्या हालचालींमुळे काही बरे वाईट संकेत मिळू शकतात, आपल्या नजीकच्या आयुष्यात काही विपदा येणार असेल तर त्यासाठी आपण सजग राहू शकतो. आपल्या घरावरती संकट येणार आहे हे काही सांकेतिक रित्या काही वेळेस समजते.

त्यामुळे थोडं सावध राहून आपल्याला काळजी घेता येते. आपल्या घरी सर्वकाही नीट सुरू असताना, अचानक काही गोष्टी बदलू लागतात त्यामुळे आपल्याला शंका येते की घरी काय तरी होणार आहे.

आपल्या घरी जी पाल असते ती असे काही संकेत देते जे आपल्याला समजून घेतले पाहिजेत ज्यामुळे येणाऱ्या काळात येणाऱ्या संकटावर आपण उपाय काढू शकतो.

काही शास्त्रात पालीच्या संकेतांचे उल्लेख आहेत त्यामुळे भविष्यात त्याचा नजीकचा संबंध आढळतो. या शास्त्रा नुसार पाल काहीवेळेस असे संकेत देते की त्यामुळे नजीकच्या काळात एखादा अपघात, किंवा एखादी अडचण, समस्या येऊ शकते ज्यासाठी आपण तो संकेत समजून घेऊन त्यानुसार सतर्क राहायला हवे.

प्रकृतीने भविष्यात होणार्‍या विभिन्न घटनांबद्दल मनुष्याला सचेत करण्यासाठी बरेच माध्यम बनवले आहेत. पशू-पक्षी व जीव-जंतू विभिन्न क्रिया-कलपांच्या माध्यमाने आम्हाला भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल सचेत करतात.

वर्तमानात या गोष्टींवर पूर्णपणे भरवसा करू शकत नाही, पण शकुन शास्त्रात पशू-पक्ष्यांपासून मिळणार्‍या संकेतांचे स्पष्ट वर्णन मिळतात.

घरात वावरणारी पाल देखील भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल संकेत करते. गरज आहे तर त्या संकेतांना जाणून घ्यायची. आपण बघूया पाल आम्हाला भविष्यातील येणार्‍या घटनांची माहिती कशी देते.

पाल एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर प‍डली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते पण डाव्या हातावर पडल्याने धनहानी होऊ शकते. जर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजवीकडून डावीकडे उतरेल तर त्या व्यक्तीचे प्रमोशन आणि धन लाभ होण्याचे योग बनतात.

नवीन घरात प्रवेश करताना जर घर मालकाला मेलेली पाल दिसली तर त्या घरात राहणार्‍या लोकांना आजारपणाची भिती राहते. शकुन शास्त्रानुसार दिवसा जेवण करताना जर पालीचे बोलणे ऐकू आले तर लवकरच शुभ बातमी मिळू शकते.

स्त्रीच्या डाव्या बाजूवर पाल पडली तर सौभाग्यात वृद्धी आणि उजव्या बाजूवर पडली तर एखादी अशुभ बातमी मिळण्याची शक्यता असते. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर पाल पडली तर त्याला सुख-सुविधा मिळतात.

डाव्या गालावर पाल पडली तर आरोग्याशी निगडित तक्रार राहते. शास्त्रात लिहिले आहे. या अपशकुनापासून बचाव करण्यासाठी पूर्ण विधी-विधानाने पूजा करूनच नवीन घरात प्रवेश केले पाहिजे.

जर पाल गुप्तांगावर पडली तर त्या व्यक्तीला एखादा आजार होण्याची शक्यता असते. जर पाली समागम करताना दिसल्या तर जुन्या मित्राची भेट होते.

पहिला संकेत तुम्ही एखादं महत्वाचे काम आटोपून घरी परत येता तेंव्हा तुम्ही घरात आल्याबरोबर जर मुख्य दरवाजात पालीचे दर्शन झाले तर तुम्हाला चिंतेची बाब ठरेल. तो संकेत म्हणजे तुम्ही केलेल्या कामात खूप अडथळे येणार असून संकटांची मालिका सुरू होते.

अशा वेळी काय करायचे सुचत नाही आणि सर्वकाही मनाविरुद्ध घडत असते. पण हा संकेत समजून घेऊन शक्य तितके नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवा. नशिबाने जे होईल ते होईल पण तुमच्या हातात जितके असेल तितके तरी करणे यालाच संकेत समजून घेणं म्हणतात.

दुसरा सर्वात मोठा संकेत म्हणजे जर तुम्ही नवीन वास्तू खरेदी केली असेल व त्यामध्ये राहायला येत असल्यास किंवा नवीन वास्तू बांधून प्रवेश करत असाल तेव्हा जर तुमच्या घरी एखादी मृत पाल आढळली तर समजून जा की काहीतरी अशुभ, विपरीत लवकरच घडणार आहे

आणि त्यासाठी तुम्ही होम हवन, पूजा पाट लवकर करून घेऊ शकता. त्यामुळे तुमचं आलेलं संकट हरेल व त्यातून तुमची सुटका होईल. यावरचा हा उपाय त्वरित करून घेतल्यास नक्कीच विपदा टळू शकते. त्यामुळे या संकेतांचे तुम्हाला फायदे होतात.

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही पाल जर सतत आवाज करत असेल, तिचा आवाज सतत कानी पडत असेल तर समजून जा की नजीकच्या काळात तुमच्या कामात, व्यवसायात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

हे बदल सकारात्मक नसून नकारात्मक असतात ज्यामुळे केवळ हानी पोहचते. अशावेळी हे संकेत लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनात काळजी घेतली पाहिजे. आपण नेहमीच सावध राहिलं पाहिजे. जेणेकरून मनात भीती न बाळगता अवेळी येणाऱ्या संकटावर आपल्याला मात करण्याची ताकद मिळेल.

जर आपल्या घरी काळी जादू वावरत असेल, काळ्या छायेचा प्रभाव असेल तर त्यामुळे देखील पाल जास्त आवाज करते कारण त्या काळ्या छायेचा जास्त प्रभाव पालीवर पडत असतो त्यामुळे त्या मृत होतात.

अशा प्रकारे सतर्कता दर्शविली जाणारी पाल आपल्याला नजीकच्या काळात येणार संकट सूचित करते त्यासाठी आपण विचार करून वागलं पाहिजे व आपलं नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पूजा पाट नित्यपणे करावा, देवध्यान, वास्तूपूजन, पुराण श्रवण करावे.

पालींवर बारकाईने लक्ष ठेऊन या संकेताची चाहूल लागल्यास वेळीच सावध व्हावे, सतर्क रहावे. आपल्याला मिळालेले संकेत समजून घेऊन त्यानुसार हवे ते बदल करावेत जसे की घेतलेले निर्णय ,

ठरवलेल्या गोष्टी साधारणपणे बडलाव्यात ज्यामुळे हे संकट निघून जाईल अथवा त्याचा प्रभाव मर्यादित राहील. या संकेतांचे योग्य रीतीने बोध, शिकवण घेऊन त्याप्रकारे उपाय करून त्यातून मुक्तता करून घ्यावी.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!