तुम्हालाही पितृपक्षात ‘असे’ हे महत्वाचे संकेत मिळतात? तुमचे पितर खुश आहेत की नाराज???…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पितृपक्ष सुरू आहे, या दरम्यान पिंडदान, श्राद्ध, तर्पण दानधर्म केले जाते. पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण अनेक उपाय करत असतो.

तुम्हाला देवल पितृपक्षात हे संकेत मिळत असतील तर समजून जावे की आपले पितर आपल्यावर खूप प्रसन्न आहेत. आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आपल्याला यश व सुख प्राप्ती होणार आहे. हे संकेत काही खास व्यक्तीना मिळतात. हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्वाचे मानले जाते.

आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न आहेत की नाराज आहेत याचे काही संकेत आपल्या हिंदू शास्त्रात सांगितले आहेत. आपले पितर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला खूप फायदा होत असतो,सर्व गोष्टी सुरळीत सुरू असतात आणि जर आपले पितर नाराज असतील तर हा पितृपक्षाचा काळ खूप चांगला आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी.

आपण त्यांची नाराजी दूर करू शकतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो. जेव्हा आपण एखादे कार्य करीत असतो आणि त्या कार्यात कोणतीही अडचण बाधा न येता व्यवस्थितपणे पूर्ण होत असेल तर समजावे की आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न आहेत.

कधी कधी एखादे कार्य होत नाही, भीती वाटते की हे कार्य शक्य नाही, हे मी करू शकत नाही, या कामात खूप अडथळे येतील परंतु आपण आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना केली की ते काम अगदी व्यवस्थितपणे यशस्वीरीत्या पूर्ण होते,

या बाबतीतही आपल्या पूर्वजांची आपल्यावर कृपादृष्टी असते कारण पूर्वजांचा आशीर्वाद नसेल तर कोणतेही कार्य पूर्ण होऊच शकत नाही आणि कितीतरी दिवसांपासून घडलेली कार्य आपण पितरांच्या आशीर्वादाने सहज पूर्ण करू शकतो.

आपले पितर आपल्यावर प्रसन्न असतील तर त्यांचे श्राद्ध अगदी योग्य प्रकारे व विधीपूर्वक करावे म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला सतत मिळत राहतील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपली सर्व कामे सहजरित्या पूर्ण होतील.

जर तुमच्या घरात शांतता असेल, सर्व लोक समाधानी असतील, मुले मोठ्यांचे म्हणणे ऐकत असतील, घरात आनंदी आनंद असेल तर समजावे की आपले पित्र आपल्यावर खूप प्रसन्न आहेत. जर आपण एखादे कार्य करीत असाल व त्यानंतर नेहमी काही ना काही अडचणी येत असतील , काम होता होता अचानक मध्येच बंद पडत असेल, नेहमी आपण कामाच्या टेन्शन मध्ये राहत असाल.

प्रत्येक वेळी काम पूर्ण होत आले असता एखादे मोठे संकट पुढे येऊन ठेपेल तर समजावे की आपले पितर आपल्यावर नाराज आहेत. जर तुमची मुले तुमचे म्हणणे ऐकत नसतील, मोठ्यांचा आदर करीत नसतील, आज आपण मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करीत असतो परंतु मुलांच्या वर्तनामुळे आपण नेहमी दुःखी व चिंतीत राहत असतो,

तर समजावे की आपल्या पितर आपल्यावर नाराजी आहेत, ते मुलांद्वारे आपल्यावर प्रकट होत आहेत, आपली मुले आपल्याला पीडा दुःख त्रास देत असतात तर हे लक्षण आपले पितर आपल्यावर नाराज असल्याचे आहे.

कधी कधी आपल्याला कुंडली पाहून गुरूजी सांगतात की आपल्या कुंडलीत पितृदोष आहे. म्हणजे आपण योग्य प्रकारे आपल्या पितरांना मान सन्मान देत नाही . आपल्या जीवनात नेहमी काही ना काही अडचणी येतात यावर उपाय म्हणून श्राद्ध करावे.

पुढील गोष्ट म्हणजे जर आपल्या घरात नेहमी वादविवाद भांडण-तंटे होत असतील, अगदी लहान-सहान गोष्टींवरून मोठे भांडण होत असेल, घरातील वातावरण नेहमी अशांत राहत असेल, तर समजावे की आपले पूर्वज आपल्यावर नाराज आहेत.

कारण ज्या घरावर पितृ देवाचा आशीर्वाद असतो त्या घरात कधी लहान-सहान गोष्टींवरून भांडणे होत नाहीत आणि कदाचित झाली तर ती लगेचच मिटतात. तुमच्या घरात जर रोज भांडणे वादविवाद होत असतील तर समजून जावे की आपल्याला आता पितरांना प्रसन्न करण्याची गरज आहे.

आपण खूप कष्ट करतो, भरपूर पैसा घरात येतो परंतु टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा सारखा खर्च होतो व वेळेवर आपल्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. असे होत असेल तर समजावे की आपले पितर नाराज आहेत.

म्हणून पितरांचे व्यवस्थित रित्या श्राद्ध करावे , पिंडदान तर्पण करावे ,काही वेळा आपली काहीही चूक नसताना उगाचच आपण कोर्ट केस मध्ये अडकतो, कोर्टाच्या पायर्यासारखा चढाव्या लागतात , केस काही केल्या संपतच नाही , काय करावे हेच सुचत नाही तर अशा वेळेस समजून जावे ही पूर्वजांची ही आपल्यावरील नाराजी आहे, म्हणून योग्य प्रकारे श्राद्ध तर्पण करून आपल्या पितरांना प्रसन्न करावे.

पितरांकडे आपल्या सुखी व समाधानी जीवनासाठी प्रार्थना करावी. या काही लक्षणांवरून आपल्या लक्षात येते की आपले पितर आपल्यावर प्रसन्न आहेत की नाराज. त्यांना जास्त प्रसन्न करण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम ठेवण्यासाठी त्यांचे विधीपूर्वक व्रत करावे

पितृपक्षाचा संपूर्ण काळ हा पितरांना समर्पित असतो. सोळा दिवस चालणारा हा पितृपक्ष काळ पूर्णपणे शांततेत पाळला जातो म्हणजेच घरचे पूर्वजांची आठवण काढून शोकाकुल असतात व त्या त्या तिथीला तर्पण केलं जातं.

तसेच कोणतही शुभ कार्य या दरम्यान केलं जातं नाही. त्याला पितृपंधरवडा अशी मान्यता आहे मात्र यादरम्यान पितर पितृलोकातून पृथ्वी लोकांवर आपला भाग ग्रहण करण्यासाठी येत असतात.

म्हणून आपल्या पूर्वजांच्या मृत्यू तिथीनुसार तर्पण व श्राद्ध जरूर करावे. पितृपक्षात जर हे संकेत मिळाले तर ते खूप शुभ मानले जातात. जर तुम्हालाही असे संकेत मिळत असतील तर समजून जावे की आपले पितर आपल्यावर प्रसन्न आहेत.

जर पितृपक्षादरम्यान आपले अडकलेले पैसे, गेलेले पैसे परत मिळायला लागले, कोणी कर्ज घेतलेले असेल किंवा उसने पैसे घेतलेले असतील तर ते स्वतः होऊन येऊन देतील, आणून देत असतील तर समजून जावे की आपल्या पूर्वजांचा हा आशीर्वाद आहे.

त्याशिवाय या महिन्यात अचानक अनपेक्षित धनप्राप्ती होत असेल, ज्याची आपण कल्पनाही केली नव्हती तर समजून जावे आपले पितर आपल्यावर खुश आहेत.

आपले पितर जर आपल्यावर नाराज असले तर ते प्रत्येक कार्यात अडथळे आणतात. कोणतेही कार्य पुर्ण होऊ देत नाहीत. परंतु जर आपले प्रत्येक कार्य विनाअडथळेच पूर्ण होत असेल,

आपली अडलेली कामे अचानक पितृपक्षात मार्गाला लागली असतीळ तर समजून जावे ही आपल्यावर पितरांचा आशीर्वाद आहे. आपल्यावर पितर प्रसन्न आहेत. आपल्या कामात अडचणी अडथळे येत असतील,

आपल्या पूर्वजांची आठवण करत असतील, आपले कार्य पूर्ण होत असेल तर समजून जावे की आपल्या पूर्वजांचा आपल्यावर आशीर्वाद आहे.

जर पितृपक्षात आपले पितर आपल्या स्वप्नात येत असतीळ किंवा वेळोवेळी त्यांची आठवण येत असेल तर समजून जावे की पितर आपल्या बरोबर आहेत. स्वप्नात आपल्याला साप दिसला आणि त्या सापाकडे बघून आनंद वाटत असे वाटत असेल ,

आपल्याला प्रसन्न, उत्साही वाटत असेल तर हाही एक आपले पितर आपल्यावर प्रसन्न होण्याचा संकेत आहे. आपले पित्र आपल्यावर संतुष्ट आहेत, त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम आहे असा त्याचा अर्थ झाला.

तुम्हाला पितृपक्षात असे संकेत मिळत असतील तर समजुन जा की तुमचे पितर तुमच्यावर नक्कीच प्रसन्न आहेत. जर नसतील तर विधिवत श्राद्ध व तर्पण पितृपक्ष संपण्या पूर्वीच करून घ्या.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!