नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करुदेत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेऊदेत. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आश्वासक अमृतवाणी वाचूया. तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपले स्वामी सांगतात की वेळ कितीही वाईट आली म्हणून डगमगू नकोस आम्ही आहोत,
ही सर्व दुःख संपवू शकतो पण हे भोग भोगून संपले की पुन्हा मागचे दुःख पुढे येत नाही. विश्वास ठेव. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तुझ्या मनात आहे. मी समजू शकतो तुला जे दिसतंय ते सत्य आहेस पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करून खरं सत्य त्यातच आहे.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मला ओळखतात ते माझ्यावर कधीही शंका घेत नाहीत. माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलच नाही. तुझ्या काही आठवणी असतील तर त्यांचा परिणाम वर्तमान काळात होऊ देऊ नकोस. त्यातून केवळ अनुभव घे. तुझ्या जीवनात आलेल्या कटू गोष्टींची पुन्हा पुन्हा मांडणी करू नकोस.
कर्ता-करविता मी आहे. जगापुढे मीपणा मिरवतो. जे आयुष्य आहे ते मला अर्पण आहे. मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न सांगता येईल फक्त तू विश्वास ठेव. मी तुझ्या अंतरात मनामध्ये मी आहे.
तुला हरवून नाही चालायचं, या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही मी. जिथं तू जगत आहेस मी त्या ठिकाणी आहेच. मार्ग दाखवत असणार आहे. स्वामी माऊली म्हणतात नको उदास होऊ. तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ. बघ मी आहे . तुझा विश्वास नकळत तुझ्यासमोर असा ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल.
निश्चिंत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला कळत नकळत इतके तुमच्या मनात काय चालले आहे हे मला कळते. तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे.
तुम्ही नाव घेता तेंव्हा आम्ही तुमच्या मागे पुढे चालतो. तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते देणारच. त्यासाठी तर हा बसला आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मनाचा खेळ आहे
आणि आत्मविश्वास आत्म्याचे बळ आहे आणि स्वामी या बाळाचे ताकत आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. माझे नामस्मरण करत रहा. तुझे आयुष्य कसे सुखमय करायचे ते मी बघीन.
मृत्यूनंतर ते काढून घेतले जाईल. राहते ते फक्त तुमचे कर्म असते आणि मी तुमच्या सोबत असेल. मी चुकीचे वागणार्या ना कधीही लवकर मुक्ती देत नाही तर पापाचा घडा कसा भरणार आणि नाही भरला तर शिक्षा कशी मिळणार त्यामुळे शांत राहून त्यांना स्वतः करून भोगावे लागते.
मी किती वर्षापासून आहे हे महत्त्वाचे नाही. तर त्याचे प्रेम विश्वास आहे. यावर तो श्रेष्ठ ठरतो आम्हाला सर्व भक्त सारखेच आहे. भुकेला जो आहे त्याचा हात धरा त्याला खाऊ घाला
मी सदैव पाठीशी तुझ्या वाट्याला आलेले हे काय फक्त या जन्म कर्माचे फळ त्याच्या मागचा जन्म सगळ्या जन्मातील कर्माचा हिशोब हा एकत्र होत असून मला समाधान मिळते. त्या अनुषंगाने या भक्ताच्या परीक्षेची वेळ तो सगळ्यांना माफ करतो. तुझ्या मनाचा मोठेपणा आहे पण आमच्या काठीला न्याय करावाच लागतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.