नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू पंचांगानुसार आषाढ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी तसेच आषाढी एकादशी म्हणतात. या तिथीचे शास्त्रामध्ये खास महत्त्व आहे. कारण या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने पाताळात शयन करतात.
या चार महिन्यांना चातुर्मास म्हणतात. चातुर्मासामध्ये सर्व मंगलकार्य वर्जित आहेत.
आषाढी एकादशीला काही उपाय केल्यास आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. त्यामुळेच हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रिस्त होतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासाचा आरंभ होतो.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लाखो भक्त विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत यात असतात आणि चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करून भगवान विठ्ठलाचे दर्शन घेतात.
म्हणून शास्त्रामध्ये या एकादशीचे खूपच महत्व सांगितले आहे. अनेक लोक हे व्रत अत्यंत श्रद्धा-भक्तिभावाने उपवास करत असतात. त्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करून, व्रताचा संकल्प केला पाहीजे.
विठूरायाची पूजा करावी,त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे, पिवळे रंगाचे वस्त्र,किंवा पिवळी फुले ,पिवळी मिठाई अशा प्रकारच्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत त्या आपण भगवंताला अर्पण केल्याने ,अधिक लाभ होतो. अतिप्रिय तुळशीपत्र देखील अर्पण करावेत.
याशिवाय अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीच एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पाने तोडू नयेत.कारण शास्त्रानुसार एकादशीला तुळस तोडणे वर्जित मानले जाते.
त्यामुळे एक दिवस आधी तुळशीपत्र तोडून ठेवली पाहिजेत.तसेच एकादशीच्या दिवशी ते तुळशीपत्र श्रीहरी विष्णूंना अर्पण करावे, याचबरोबर एकादशी दिवशी कधीच मांसाहार करू नये.
तसेच पुराणानुसार, कुठलीही तांदळाची वस्तू किंवा तांदळाचे पदार्थ आपण एकादशीच्या दिवशी सेवन करू नये. या दिवशी शक्य असल्यास या दिवशी फलाहार घ्यावा. तसेच असे म्हणतात की,
या मोठ्या एकादशीचे व्रत केल्याने, तुम्हाला पूर्ण वर्षभराच्या एकादशीचे व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होते.
याच बरोबर अशी एक वस्तू जी आपण जर या पवित्र एकादशीच्या दिवशी खाल्यास श्रीहरी विष्णूची कृपादृष्टी आपल्यावर पडते. तसेच या एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास करून , या दिवशी आपल्याला मनुक्याचे सेवन करावे.
कारण हिंदु शास्त्रांनुसार असे सांगितले जाते की, जो व्यक्ती एकादशीला मनुक्याचे सेवन करतो, त्याला धनप्राप्ती होत असते.त्यामुळे एका वाटीमध्ये थोडेसे मनुके घेऊन ते भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करून ,
त्यानंतर आपण प्रसाद रूपात त्याचे सेवन करायचे आहेत. जो व्यक्ती एकादशीच्या दिवशी मनुके नैवेद्य दाखवून त्याचे सेवन केल्यास,अपार धनलाभ होण्याची शक्यता असते. असा उल्लेख आपल्या शास्त्रात आढळतो,
प्रत्येक गोष्टीच एक त्याच त्याच महत्व असतं जे आपण जर पाळलो तर नक्कीच खूप लाभ होईल, त्याचे चमत्कारिक परिणाम, शुभ परिणाम आपल्याला आढळतील.
म्हणून भगवंतांचा जास्तीत जास्त जप करून ही पूजा सफल करावी. या गोष्टी सहज व सोप्या करण्याइतक्या असतात , आपण केल्यास , पूर्ण श्रद्धा भक्ती आपली ईश्वराला अर्पण केल्यास आपण दैवी साक्षात्कार देखील होतो.
पिठाचे गोळे घेऊन ते नदी,तलाव किंवा विहिरीतील माशांना आज किंवा उद्या खाऊ घाला. म्हंजे पितर पण खुश होतील व भगवान विष्णू सुद्धा व तुमच्या अडचणी या कमी होत जातील..
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.