नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज असते. गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते.
ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वत: कोणतीही ज्ञानपिपासा दाखविल्याशिवाय गुरू आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत.
अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे.
सतत तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा नावातच सर्व काही आहे, तारक म्हणजे तारणारा. तो कधी म्हणावा, चालता, बोलता, उठता बसता. या मंत्राची जादू, प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी,
इतका अप्रतिम व तरूणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य, भारी, कमालच! मन खूप सैरभैर झालय, खूप एकटं वाटतंय तर म्हणा तारक मंत्र, कामं अडली आहेत म्हणा तारक मंत्र, रडू येतंय,
उदास वाटतंय एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे “माझ्या स्वामींचा तारक मंत्र! उदाहरणं देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे “तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे, हे नक्की कळेल.
स्वामींचा तारक मन्त्र जणू जीवनामृतच होय. असे म्हणतात जेव्हा कुणी कुणाचं नसत तेव्हा स्वामी त्याचे असतात, स्वामी तुमच्या प्रयत्नांची ताकद असतात, तुमच्या यशाचं गमक असतात,
तुमच्या धाडसातील रहस्य आहेत, स्वामींचा आशीर्वाद धूर्त, कपटी, स्वार्थी बुद्धिजीवींना मिळत नाही तर तो मिळतो फक्त प्रामाणिक कष्ट करत स्वामींच स्मरण करणाऱ्या व्यक्तीला.
आपल्या शास्त्रात नाम, जप, मंत्र यांना खूप महत्व आहे, त्यासाठी आपल्याला फार काही करायचे नसते, अगदी सहज सोपे शुद्ध मनाने पूर्ण श्रद्धा ठेवून जप करायचा. रोज रात्री सर्वचजण मोबाईल, टीव्ही पाहतात व झोपी जातात,
सकाळी परत कामासाठी जातात, अशा वेळी झोप शांत व्हावी व आपलं ईश्वर चिंतन देखील व्हाव यासाठी हा उपाय करा. स्वामींचा तारक मंत्र झोपण्यापूर्वी एक वेळ बोला, ऐका किंवा पुस्तक,
ऑनलाइन वाचला तरी चालेल पण तुमच्या मुखातून तो रोज एकवेळ तरी यायला हवा. याचा सकारात्मक परिणाम नक्की तुम्हाला जाणवेल. तुमचं जीवन आनंदाने, समाधानाने भरून जाईल.
तुमच्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. स्वामी समर्थ तारक मंत्र मानवी मनाला उद्देशून असून यात मानवाला आपल्या कार्याप्रती नेहमी निर्भीड राहावे असे सुचवण्यात आले आहे.
स्वामीच्या आशीर्वादाने केलेले कोणतेही कार्य कायम यशस्वी होते. महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच उभे असतात असा या तारक मंत्राचा अर्थ असून. आपण नेहमीच या मंत्राचा जप केला पाहिजे.
हा मंत्र एक सुंदर जीवनाची अनुभूती देतो. त्यासाठी आपण स्वामींची रोज पूजा, सेवा, पाठ, अभंग केलं पाहिजे तसेच आपण घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी पुण्य कर्म करण्यासाठी स्वामींच्या तारक मंत्राचा जप केला पाहिजे. जो आपल्याला या भवसागरातून बाहेर काढेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.