नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ , भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये,
याबाबत अनेक लोक अनभिज्ञ असतात. अनेकजण तर भीतीने श्राद्धच करीत नाहीत. त्यांचे कारण असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून. पितृपक्षाच्या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान करावे.
या दिवशी तेल, सोने, तूप, चांदी, गूळ, मीठ आणि फळे दान करावीत. या दिवशी ब्राह्मणांना अन्न द्यावे. केवळ तिथीनुसार श्राद्ध पक्षात दान करावे. असे केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील.
जर आपण नकळत कोणतीही चूक केली असेल तर आपण पूर्वजांकडून क्षमा मागू शकता. या परिस्थितीत, आपल्या पूर्वजांची पूजा करताना, त्यांच्या चित्रावर टिळा लावा.
पितराच्या तिथीच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिवशी गरीब लोकांना अन्न वाटप करा आणि चुकांची क्षमा मागा. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. पितृपक्ष हा उद्यापासून सुरू होत आहे.
यासोबतच तुम्ही पितृपक्षात स्वामींची ही सेवा कराल तर पितृचा त्रास तुम्हाला होणार नाही, पितृदोष तुम्हाला लागणार नाहीत आणि तुमचे नेहमी रक्षण होईल . तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की पितृपक्ष सुरू झाले आहे,
पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण करायचे असते, पितृना नैवेद्य दाखवायचा , सेवा करायची ही अशी खास परंपरा आहे, पण त्यासोबत आपल्या पितृपक्षात म्हणजे खास करून या महत्त्वाच्या पंधरा दिवसांमध्ये स्वामी समर्थांची सुद्धा सेवा करू शकतो.
जेणेकरून पित्र तर प्रसन्न होतीलच त्यासोबत स्वामी सुद्धा प्रसन्न होतील आणि पितरांचा त्रास देखील होणार नाही. पितृदोष आपल्याला होणार नाहीत, त्यासोबतच आपले आयुष्यभर रक्षण होईल आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळेल.
पितृपक्षात स्वामींची सेवा दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता, सकाळी – दुपारी – संध्याकाळी , खास करून संध्याकाळी या सेवेचा लाभ तुम्ही घेतला तर याचा लाभ जास्त होईल तसेच याचा लाभ फक्त तुम्हाला स्वतःला मिळणार नाही तर संपूर्ण घराला मिळणार आहे.
घराच्या कोणत्याही सदस्याने स्वामी सेवा पितृपक्षात अवश्य करावी. तुम्हाला रोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळेस नित्यसेवा करायची आहे. स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमधून एक वेळेस काळभैरव अष्टक वाचायचे आहे ,
ही एकच सोपी गोष्ट करायची आहे की रोज संध्याकाळी किंवा रोज सकाळी तुम्हाला फक्त काळभैरव अष्टक एक वेळेस वाचायचे आहे, काळभैरवाष्टक स्वामी समर्थांची नित्यसेवा या पोथी मध्ये दिलेल आहे.
तुम्ही श्रद्धेने विश्वासाने काळभैरवाष्टक बोला, जी व्यक्ती आपल्या घरामध्ये काळभैरव अष्टक वाचते त्यांच्या घरात कधीच कोणता त्रास होत नाही . कधीच घरात विपदा येत नाही .
कधीच घरात नकारात्मकता वाईट शक्ती येत नाही. म्हणून पितृपक्षात स्वामींची ही सेवा तुम्ही नक्की करा. दिवसातून फक्त एक वेळेस नक्की बोला . अगरबत्ती लावून बोला. स्वामी प्रसन्न होतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.