नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. नवरात्रीचा पहिला नियम, आपण देवीच्या नावानं जो घट बसवतो, देवी शेजारी जो मंगल कलश स्थापन केलेला असतो तो जोपर्यंत दसरा येत नाही त्या दिवसापर्यंत म्हणजे कधीकधी दसरा दहाव्या दिवशी येतो कधी कधी नवव्या दिवशी येतो नऊ ते दहा दिवस म्हणजे दसऱ्याच्या दिवसापर्यंत आपल्याला घट किंवा मंगल कलश हलवायचं नाहीये.
यानंतरचा दुसरा नियम म्हणजे आपण देवीचा घट बसवल्यानंतर देवीच्या अगदी समोर आपल्या देवघरातले जे टाक असतात ते सुद्धा वीड्याच्या पानांवर मांडून ठेवलेले असतात. तुमच्याकडे सुद्धा देवीचे किंवा तुमच्या देवघरातले टाक तुम्ही मांडून ठेवलेले असतील तर त्याना दहा दिवस आंघोळ घालायची नाही.
म्हणजे दसऱ्याच्या दिवशी डायरेक्ट या देवांना आपल्याला नाहायच आहे. असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये देव सुद्धा घरी बसलेले असतात त्याना सुद्धा आपल्याला आंघोळ घालायची नाहीये.
यानंतरचा तिसरा नियम म्हणजे देवीला तुम्ही दररोज माळ घालू शकता. बर्याच जणांचा प्रश्न असतो की देवीला किंवा घटाला आपण दररोज माळ किंवा पाणी घालू शकतो का? दररोज पाणी घालू शकतो का? देवीचे फोटोला माला घालू शकतो का? किंवा घटाला माळ घालू शकतो का? तुम्ही देवीला दररोज माळ घालू शकता. घटाला सुद्धा दररोज माळ घालू शकता.
घटाला पाणी सुद्धा घालू शकता. असा नियम असतो की फक्त विषम दिवशी घटाला माळ घालायची आणि तेव्हाच पाणी घालायचं. जसं की विषम दिवसांमध्ये म्हणजे पहिल्या दिवशी माळ घातली जाते त्यानंतर तिसर्या दिवशी 5 व्या मग 7 व्या दिवशी मग नवव्या दिवशी अशा पद्धतीने घटाला माळ घातली जाते. तुम्ही जर हे नियम पाळणार असाल तर तुम्ही तिसऱ्या दिवसाची माळ घालणार असाल तेव्हा दुसऱ्या दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाची दोन्ही माळी तुम्हाला तिसऱ्या दिवशी घालायचे आहे.
अजून पाचव्या दिवशी जर तुम्ही माळ घालणार असाल तर चौथ्या दिवसाची आणि पाचव्या दिवसाचे म्हणजे पाचव्या दिवशी सुद्धा तुम्हाला दोन माळी घालावे लागतील. तर विषम दिवस असा नियम तुम्ही करा. तर मग तुम्ही अशा पद्धतीने घटाला माळ घालू शकता आणि तेव्हाच पाणी सुद्धा घालू शकता.
जर तुम्हाला पिरियड म्हणजे मासिक पाळी असेल, जे कोणी नवरात्रीचे व्रत करत असेल आणि त्या महिलेला जर मासिक पाळी असेल तर मग घटाला माळ पाणी कोणी करायची? देवीची पूजा कोणी करायची? तर शास्त्र असे सांगते की उपवास मात्र त्या स्त्रीने करायचा मात्र पाणी आहे किंवा तुमची दररोजची पूजा असेल देवीची ती तुम्ही घरातल्या इतर सदस्यांना करायला सांगू शकता.
त्यानंतर चा पुढचा नियम सांगायचा झाला तर उपवास कोणत्या पद्धतीने करायचा? आता तुम्ही जर दर वर्षी पूर्ण नऊ दिवसाचे उपवास करत असाल तर पूर्ण नऊ दिवसाचे उपवास करा. जर शक्य नसेल तर उठता बसता उपवास ज्याला आपण म्हणतो तसा केला तरी चालेल.
घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे घटस्थापना च्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उपास सोडू शकता आणि डायरेक्ट मग जेव्हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी तेव्हा तुम्ही उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी सोडायच.
अजून दुसरे म्हणजे प्रतिपदा, सप्तमी, अष्टमी, नवमी असे चार दिवस सुद्धा तुम्ही उपवास धरू शकता आणि नेहमी जर नऊ दिवसाचे उपवास तुम्ही करत असाल तर पूर्ण नऊ दिवसाचे उपवास अशा प्रकारे तुम्हाला उपवास करता येईल. या नंतर चा पुढचा नियम नवरात्रीचे उपवास करत असताना तुमच्या समजा पहिला 1-2 माळी झाल्या आणि काही गोष्टी अनपेक्षित घडतात
जर सूतक वगैरे असं काही असेल आणि तुमच्या घरात तुम्ही घट बसवलाय, देवीची पूजा तर करत होता आता राहिलेल्या दिवसांच्या माळी त्या दिवसाची पूजा कोण करणार? असा सुद्धा प्रश्न तयार होईल. तर असं काही घडलं तर घाबरू नका. राहिलेल्या दिवसांची जी पूजा आहे ती तुम्ही दुसऱ्या कुळातील व्यक्तींकडून करून घेऊ शकता.
तुम्ही मात्र तिथे हात लावायचा नाही कारण सुतक असल्यास आपल्याला देव पूजा करता येत नाही आता दुसऱ्या कुळातील म्हणजे आपल्या गावात किंवा आपण राहतो तिथे सुद्धा आजूबाजूला दुसऱ्या कुळातील लोक आपल्या शेजारी किंवा आजूबाजूला राहत असतात त्यांच्याकडून किंवा मग तुमच्या पाहुणे व्यक्तींकडून तुम्ही घटाला माळपानी किंवा घटाची पूजा आहे जी नवरात्रीची पूजा हे राहिलेली करून घेऊ शकता.
आपल्याला डायरेक्ट शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याचे दिवशी घट हलवायचा आहे. घरामध्ये जो अखंड दिवा चालू राहणार आहे. नवरात्रीचे नऊ ते दहा दिवस आपण घर डायरेक्ट सोडून कुठेही जायचं नाहीये. तुम्हाला जर कुठे प्रवास करायचा असेल नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये घरच्या कुणीतरी एका सदस्याला मात्र घरीच राहू द्या. घरी अखंड दिवा चालू असतो.
पुढचा नियम म्हणजे नवरात्र काळामध्ये दिवसा झोपणे टाळायचं. तुम्हाला जर दिवसा थोडेफार झोपण्याची सवय असेल तर रात्रीचे उपवास तुम्ही करत असाल तर तेव्हा मात्र दिवसा झोपायचं नाहीये. नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांपैकी वयोवृद्ध नसेल कुणाला लहान बाळ असेल किंवा बीपी शुगरचा त्रास असेल त्यांनी मात्र जास्त वेळ उपाशी राहायचं नाही.
जास्त वेळा जेवण करायचं म्हणजे एका वेळी जास्त जेवण न करता थोड्या-थोड्या कालावधीने काहीतरी खात राहायचं म्हणजे त्यांना काही त्रास होणार नाही आणि वयोवृद्ध कोणी उपवास करणार असेल तर त्यांनी उठता बसता उपवास केला तरी चालेल.
नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये दाढी करू नये नखे कापू नये किंवा केस सुद्धा कापू नये. या काही आपल्या क्रिया आहेत या तुम्ही नवरात्रीच्या आधीच करून घेऊ शकता. जेणेकरून तुम्ही नवरात्रीत हे नियम पाळा.
नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांनी नऊ ते दहा दिवस लिंबू कापू नये. नवरात्रीच्या काळामध्ये काळ्या रंगाचे कपडे न घालण्याचा नियम आहे. दसऱ्याच्या दिवशी जेंव्हा आपण आपट्याची पाने आणतो डायरेक्ट घरात आणायचे नाही.
दसऱ्याच्या दिवशी सकाळी मारुतीच्या मंदिरात जायचं किंवा तुमच्याकडे जर मारुतीचा फोटो असेल तर पहिल्यांदा त्याची पूजा करून नारळ फोडायचं नंतर आपट्याची पानं मारुतीच्या फोटोला किंवा गावाकडे गावाकडे मंदिर असतात तर तिथे पहिल्यांदा आपट्याची पानं व्हायची कारण विजयादशमीचा दिवस मारुतीच्या मंदिरात प्रथम जायचं असतं.
तिथे नारळ फोडून दर्शन करून आणि आपट्याची पाने वाहून नंतरच की आपट्याची पानं घरी आणायची आणि संध्याकाळी जेव्हा आपण देवीची तळी भरतो त्यानंतर ती घरात आणायची. म्हणजे मारुतीचे मंदिरातून आणल्यानंतर सुद्धा घराच्या बाहेर आपण आपली जागा असते काही घराच्या बाहेर सुद्धा आपली मोकळी जागा असते तर तिथे तरी तुम्ही व्यवस्थित ठेवून देऊ शकता
आणि जेव्हा संध्याकाळी देवीच्या नावाची तळी भरली जाते त्यानंतरच देवीच्या चरणी पहिल्यांदा आपल्याला ती आपट्याची पानं व्हायचे आहे. घटाचे गहू उगवलेली असतात वेदिका ज्याला आपण म्हणतो तर त्याची माळ घालायची.
ही आपट्याची पाने देवी ला आईची देवीची तळी भरल्यानंतरच आपल्यालाही आपट्याची पाने एकमेकांना देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायचे आहेत. यानंतरचा अजून एक नियम आहे दसऱ्याच्या दिवशी चा तुम्ही जर शेतकरी असाल तर शेती अवजारांची सुद्धा पूजा या दिवशी नक्की करा.
नारळ फोडा झेंडूची फुलं वाहा. त्याचबरोबर शेती अवजारांना शेंदूर सुद्धा या दिवशी लावला जातो. या दिवशी शेतकरी लोकांनी भूमिपूजन अवश्य करा व भूमिपूजन म्हणजे तुम्ही जो काही स्वयंपाक दसऱ्याच्या दिवशी केला असेल पुरणपोळी पुरी जो काही तुमच्या कडे स्वयंपाक म्हटल्यावर त्यामध्ये पोळी चपाती हा प्रकार येणार आहे किंवा पुरी असेल
तर त्यावर तुमचे दसऱ्याच्या दिवशी चे जे काही पदार्थ तुम्ही तयार केलेले आहेत टाकायचे. शेतीमध्ये थोडासा खड्डा करायचा. त्यामध्ये भूमिदान म्हणजे भूमिपूजन आपल्याला करायचा आहे. तर जे काही पशुपक्षी जे काही आपल्या शेतामध्ये राहत असतात तर त्यांच्यासाठी या जीवजंतू साठी मला असं म्हटलं तरी चालेल.
त्यांच्यासाठी हे दान आपण करत असतो त्याला भूमिदान भूमिपूजन असेसुद्धा म्हटल्या जातात. त्यांच्या नावाने आपल्याला जमिनीमध्ये हे आहे आणि तिथे अगरबत्ती वाहून पूजा करायचे आहे. यामुळे तुमचं नवरात्रीचे जे काही व्रत आहे ते सुफळ संपूर्ण होईल. तुम्हाला पूर्ण फळ मिळेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.