आजपासून पितृपक्षात रोज किचनमध्ये ठेवा ही वस्तू, पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही वस्तू…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ …. भाद्रपद महिन्यातील प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे.

म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते. पण या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाही. प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत.

सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केलं. ते चैत्र शुल्क प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदू नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्र महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाचा राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे.

संपूर्ण पितृपक्षामध्ये रोज हा मंत्र जप केल्यास आपल्या घरात सुख-समृद्धी नांदते. दुःख राहत नाही, कोणताही दोष राहत नाही. खास करून ही एक प्रकारे पितृपक्षाची सेवा आहे. पितृपक्षामध्ये करण्यासारखी ही सोपी सेवा आहे.

पंधरा दिवसांचा कालावधी असतो. यामध्ये आपण पितृपक्षामध्ये तिथीनुसार श्राद्ध करत असतो . पितृपक्षामध्ये आपण रोज या एका मंत्राचा जप तुम्ही करा. हा जप तुम्ही 11 वेळेस करू शकता, एक वेळेस करू शकता, किंवा संपूर्ण एक माळ तुम्ही या मंत्राचा जप करु शकता.

हा मंत्र जप सकाळी केला तर अति उत्तम, संध्याकाळी केला तरीही चालेल, रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवघरासमोर बसून तुम्ही हा मंत्र जप करु शकता. हा मंत्र तुमच्या पितरांना प्रसन्न करेल , पितृदोष संपवेल,

तुमच्या घरातल्या अडचणी – दुःख- संकट – समस्या सगळ्या नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल . जर आपल्यावर आपले पितृ प्रसन्न राहिले तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही, कारण त्यांचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहतो आणि सर्व कामे व्यवस्थित सुरळीत सुरू राहतात.

पितृपक्षामध्ये श्राद्ध गरजेचे असते, परंतु पितरांना प्रसन्न करणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते , हा मंत्र तुम्हीसुद्धा या पितृपक्षामध्ये नक्की बोला. घरातल्या कोणत्याही सदस्याने याचा जप केला तर त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो.

हा मंत्र काही आहे. ओम पितृ देवताय नमः , ओम पितृ देवताय नमः , हा अगदी सोपा मंत्र आहे, तुम्हाला या मंत्राचा जप 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळा संपूर्ण एक माळ तुम्ही या मंत्राचा जप करु शकता.

एक सेवा म्हणून तुम्ही पंधरा दिवस करायचे आहे . पितृ देव तुमच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील.तसेच या पंधरा दिवसात काही शुभ कार्ये अथवा महत्वाचे व्यवहार करू नयेत, जसे की सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात टाळले जाते.

2 तांबे पाणी भरेल असा मातीचा माठ घ्या व त्यात 2 तांबे पाणी आणि थोडे काळे तीळ तसेच 2 दुर्वा टाकून किचन ओट्यावर ठेवा. हे पाणी आपल्यासाठी नहीये ते पित्रांसाठी आहे. या पितृपक्षात पितर आपल्या घरी येत असतात त्यासाठी आपल्याला हा उपाय त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी करा.

रोज सकाळी अंघोळ करून तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला हे पाणी घाला व पुन्हा बदलून भरून ठेवा असे सर्वपित्री अमावस्या पर्यंत करा. तसेच तुम्ही पिंपळाचे झाडाला पाणी व दूध मिश्रण तसेच थोडे काळे तीळ घालून अर्पण करावे. यामुळे पितृदोष नक्की कमी होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!