नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, नवरात्र सुरू झाली आहे अशावेळी घरी हे उपाय केल्यास आपली संकटे दूर होतात. घरी स्वच्छता ठेवा. तसेच घरी नेहमी शुभ बोला. अशुभ बोलू नका. जीवनात काही घटना आपल्यामुळे देखील होतात देव तर द्यायला येतो पण आपण ओळखत नाही.
दिव्यात रोज लवंग, कापूर टाकावा. सायंकाळी देवीची आरती करा. देवीचा जप करा. जागर करा. आपल्या घरातील अनेक गोष्टी, जीवनातील बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, त्यामुळे आपल्याला खूप वेदना, त्रास सहन करावा लागतो, सर्वात मोठं संकट म्हणजे आर्थिक संकट ज्यामुळे सर्वच कामे अडतात
व त्यामुळे कौटुंबिक वाद वाढतात व तसेच घरातील मतभेद वाढल्यास तुमचं जीवन निराशाजनक बनते. अशा वेळी घरातील नाती सुद्धा विखुरलेली असतात. याच एक कारण हे असू शकतं की आपल्या घरी नकारात्मक, वाईट शक्तीचा प्रभाव खूप वाढला आहे, त्यामुळे तुमचं जीवन अशा रीतीने टर्न घेत असते.
व्यवसायात मंदी, नोकरीत अपयश व जीवनात निराशा प्रत्येकाच्या जीवनात येत जात राहते ज्यामुळे तुम्ही सतत चिंतीत व अस्वस्थ राहता म्हणून हा एक उपाय केल्यास तुमच्या जीवनात असणाऱ्या समस्या निघून जातील. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी व पुन्हा घरात प्रवेश करू नये
यासाठी आपण तुरटीचा खडा वापरतो. कारण असे आपले शास्त्र सांगते, तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषण करण्याची क्षमता असते. घरातील या ठिकाणी हा तुरटीचा खडा ठेवला की आपल्या अडचणी दूर होतील. यामुळे आपल्या घरातील सकारात्मक लहरी वाढतात व त्यामुळे घरात वाद होत नाहीत.
घरामध्ये या विशिष्ट जागेवर तुरटीचा खडा ठेवल्यास तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. तुरटीला प्राचीन शास्त्रांमध्ये खूपच महत्व प्राप्त आहे आणि अनेक शास्त्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला गेलेला आहे , त्याचबरोबर धन प्राप्ती करण्यासाठी तुरटीचा सुद्धा वापर केला जातो.
कारण तुरटी आपल्या अडचणी बाधा दूर करते ज्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. तंत्र मंत्र शास्त्रात आपल्या ला तुरटीच्या अनेक उपायांचे महत्व कळते, अगदी सोपा व सहज करता येणारा असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा सोपा उपाय नक्की करा.
हा उपाय करताना काही विशिष्ट नियम, खूप खर्च नाहीये. उपाय छोटा व लाभ मोठा असा हा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये जितक्या रूम आहेत, त्या प्रत्येक रूममध्ये एका छोट्याशा वाटीमध्ये एक तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे,
तसेच घरातील टॉयलेट बाथरूम मध्ये देखील एक एक तुरटीचा तुकडा ठेवा, त्यासाठी काचेची वाटी वापरा, त्याचबरोबर तुमचे जर दुकान असेल , तुम्ही जिथे जॉब करता ते ऑफिस अशा ठिकाणी हा तुरटीचा तुकडा ठेवायचा आहे,
तेथील मुख्य प्रवेशद्वार जे असेल तिथे हा तुकडा बांधा. त्याच सोबत आपल्या घराचे जे मुख्य द्वार आहे तिथे काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटीचा खडा बांधून दरवाज्याजवळ लावायचा आहे आणि तो प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला बांधायचा आहे.
असे केल्याने घरांमध्ये जी काही नकारात्मकता आहे, ती निघून जाते. तसेच बाहेरून नकारात्मक ऊर्जा येत नाही. वास्तुदोष निघून जातात. नकारात्मक ऊर्जेमुळे घरामध्ये पैसा येत नाही.
घरातील वातावरण चांगले राहत नाही या सर्वांवर उपाय म्हणून आपल्याला तुरटी काळ्या कपड्यात बांधून दरवाजाजवळ लावायची आहे. त्यामुळे अचानक तुम्हाला धनप्राप्तीचा लाभ होईल आणि घरामध्ये सुख शांती नांदेल.
तसेच अजून एक उपाय जो नवरात्र संपली तरी सलग 3 बुधवारी करायचा आहे, त्यासाठी नागिणीचे पान घ्या व त्यावरती थोडे कुंकू टाकून एक तुरटीचा खडा त्यावर ठेवून ते गुंडाळा व ते पान ताबडतोब पिंपळाच्या झाडाखाली मोठ्या दगडाखाली ठेवून या.
यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील, कर्ज लवकर फिटेल. आयुर्वेदिक शास्त्रासोबतच तुरटीला ज्योतिषशास्त्र, तंत्र-मंत्र ,वास्तुशास्त्रात प्राचीन स्थान आहे. पूर्वी राजे महाराज सुद्धा खूप साऱ्या उपायांसाठी तुरटीचा वापर करत असत,
त्यामुळे त्यांना लाभ होत असे. अदृश्य ज्या शक्ती असतात त्यांना नष्ट करण्यासाठी तुरटीच्या वापर मुख्यत्वे करून केला जातो. हया तुरटीचा उपाय तुम्हाला बराच परिणामकारक जाणवेल व तुमच्यासाठी धनप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतील.
तसेच अंघोळीच्या पाण्यात देखील थोडं तुरतीची पावडर टाका. फरक नक्की जाणवेल. एक मूठ तांदूळ देवीला वाहताना सतत मंत्र बोला. तसेच तुम्ही जीवनात यश मिळवण्यासाठी देवीला थोड कुंकू आणि हळद लावून देवीचा मंत्र बोला.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.