नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय दुर्गा माता, सध्या सर्वत्र शारदीय नवरात्र सुरू आहेत आणि या नवरात्रीमध्ये आपल्या जवळपास असणाऱ्या गरीब लोकांना होतकरू गरजू लोकांना या चार वस्तूंपैकी कोणत्याही एका वस्तूचे दान आपण अवश्य करा. आपली जशी क्षमता आहे जसे सामर्थ्य आहे तसे दान करा, त्यानुसार आपण दानधर्म नक्की करा.
हिंदू धर्मात दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. आपण जी वस्तू दान करतो ती हजारो पटींनी पुन्हा परतून आपल्याला प्राप्त होत असते आणि नवरात्रीमध्ये केलेलं हे देवी दुर्गा मातेला प्रसन्न करतं.
जीवनातील मोठ्यात मोठ्या बाधा समस्या अडचणी दूर होतात. घराची, आपली आपल्या कुटुंबाची भरभराट होते. जर आपण लक्ष्मीच दान केले, तर लक्ष्मी हजारो पटींनी परतून आपल्याकडे येतात. आपल्या घरात लक्ष्मी निरंतर वाढत राहते .
या चार वस्तू ज्या आहेत की ज्यांच दान केल्यास आपल्या मनातील इच्छा देवी माता पूर्ण करते,कारण जेव्हा आपण दान करतो तेव्हा दान स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे आशीर्वाद मिळत असतात.
पहिलं दान अन्नदान, हिंदू धर्म शास्त्राने अन्नदान सर्वश्रेष्ठ दान असे म्हटलेले आहे आणि म्हणूनच जे भुकेले लोक आहेत, गरीब आहेत, गरजू आहेत अशा लोकांना आपण अन्नदान केल्यास सातजन्माची पापे नष्ट होतात आणि पुढील जन्म मानवजन्म श्रीमंत कुटुंबात जन्मास येतो.
घरातील गरिबी,दारिद्र्य जे आहे ते जर त्यापासून पिच्छा सोडवायच असेल तर अन्नदान हे अत्यंत महान दान मानलेल आहे. जीवनातील अनेक प्रकारचे कष्ट आणि त्रास सुद्धा अन्नदान केल्याने दूर होतात.
अत्यंत साध सोप दान आपल्या नवरात्रीमध्ये नक्की करा. दुसरं आहे ते गुळाचं दान होय. जी व्यक्ती आपल्या जीवनातील काळात आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कमीत कमी एकदा तरी नवरात्रीमध्ये एखाद्या गरीब व्यक्तीस किंवा एखाद्या निर्धन व्यक्तीस एखाद्या विद्वान ब्राह्मणांस गुळाच दान करते
तिला जीवनामध्ये गरिबीचा सामना कधीच करावा लागत नाही. घरात गरिबी असेल तर ती निघून जाते. पैसा येत राहतो आणि सोबतच घरामध्ये जर सातत्याने वादविवाद होत असतील, नकारात्मक शक्ती असतील त्या नकारात्मक शक्ती सुद्धा दूर होतात.
नवग्रहांचे दोष दूर होतात. जर कुंडलीत काही दोष असतील ते दूर होतात. घरामध्ये वादविवाद चालू आहे , आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा वाढीस लागू शकतो. अत्यंत शुभ दान हे मानलं जातं.
नवरात्रीमध्ये गुळाचा नक्की करा. तिसरी वस्तू आहे, वस्त्र दान, कपडे , त्यातल्या त्यात जर आपण एखाद्या कन्येला एखाद्या दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीला जर या नवरात्रीमध्ये वस्त्र दान केले, लाल रंगाच वस्त्र असेल, कन्या ही प्रत्यक्ष माता दुर्गेचे रूप मानण्यात आलेली आहे.
अनेक प्रकारचे पापकर्म वस्त्र दान केल्याने दूर होतात आणि म्हणून नवरात्रीमध्ये वस्त्रदान करा. चौथी जी वस्तू आहे , ज्यांची क्षमता आहे त्यांनी या वस्तूचे दान नक्की करा. हे आहे सुवर्ण दान! आपण सोन्याच दान करा अथवा चांदीचे दान करावे.
अशी मान्यता आहे की, जी व्यक्ती सुवर्ण किंवा चांदीचे दान करते ती आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती प्रदान करते. तिचे पितर जे असतात त्यांच्या आत्म्यास शांती लाभते. यांच्या कृपाशीर्वादाने जीवनामध्ये प्रगती साध्य होते.
घरामध्ये सुख शांती येते. तुमचं सामर्थ्य असेल तरच आपण हे दान करा . एक गोष्ट मात्र धर्माच्या बाबतीत अत्यंत महत्वाची आहे, तुम्ही तुमच्या सामर्थ्य नुसार दान करायला हवं, आपल्याकडे कोट्यवधी रुपये आहेत
आणि आपण दहा वीस रुपयांचा दान करत असाल तर त्यांची किंमत अत्यंत अल्प असते. आपले सामर्थ्य जितके, त्यानुसार दान करावे आणि दान धर्माबद्दलची वाच्यता कुठेही करू नका या कानाचा त्या कानाला कळता कामा नये.
दुसरा उपाय असा की तुम्ही 1 पांढरा चौकोनी कागद घ्या, वाटीत थोड कुंकू घेऊन ओल करा व कागदावर तुम्हाला व्यवस्थित स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. नंतर 9 हा अंक लिहा. कागदावर थोड्या अक्षत वाहा.
तसेच तो कागद आता देवघरात घडी घालून ठेवा. यामुळे काय होईल की जीवन सुखी होईल. आता तुम्हाला 1 मंत्र बोला. ओम महालक्ष्मी नमो नमः. 11 वेळेस बोला..तुमची इच्छा बोलून आशीर्वाद मागा. पूर्ण श्रद्धा विश्वास ठेऊन उपाय करा. आज ना उद्या काम होईलच. ती चिठ्ठी इच्छा पूर्ण झाल्यावर वाहत्या पाण्यात सोडून द्या.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.