नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवाळीत दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो.
दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो. देवासमोर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहेत.
दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतिक मानले जाते. दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतिक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे.
घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. धर्मशास्त्रानुसार, देवासमोर दिवा लावणे अनिवार्य मानले गेले आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो.
पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो.
मात्र, तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असे सांगितले जाते. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे.
शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो.
आपण देवपूजा करत असताना दिवा लावतो आपण कधी कधी पाहतो कि दिव्याच्या वातीवर कधी कधी काळजी आलेली असते. त्यावर फुलासारखा आकार झालेला असतो. कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी तो गुलाबाच्या फुलासारखा वाटतो.
दिव्यात हे काळ्या रंगाचे फुल का बनते आणि ह्याचे काय महत्व आहे. कधी कधी दिवा शांत झाला कि त्यानंतर हे फुल बनते तर कधी कधी दिवा सुरु असतानाच हे फुल तयार झालेलं दिसते.
हे फुल कशामुळे बनते ह्याचा आपल्या पूजनाशी काही संबंध आहे का ह्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेउयात. दिव्यात फुल बनणे हे एक साकारत्मकतेचे प्रतीक आहे. ह्याचाच अर्थ असा होतो कि आपल्या इष्ट देवाची कृपा आपल्यावर झालेली आहे. आपण भगवंताचे जी काही उपासना करीत आहोत. ती भगवंतांपर्यंत पोहचत आहे आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहे.
दिव्यात हे फुल दरोरोजच बनत नाही हे फुल कधीतरी दृष्टीस पडते. दिवा आपण दररोज लावतो मग हे फुल का दररोज बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो, मग देवाची कृपा आपल्यावर नाहीका भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते.
परंतु भगवंत कोणत्याही प्रकारचे संकेत हे आपल्याला दररोज देत नाहीत. दोन चार दिवसात आठवड्यात महिन्यात भगवंत आपल्या प्रसन्नतेचे संकेत देतात. म्हणून दिव्यात फुल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे काही कारण नाही.
दिव्यात जे फुल बनते त्याचे आपण काय करावे. मित्रांनो जर तुम्हाला असे फुल बनलेले दिसले तर ते आपण अगदी अलगत काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले असेल ते तूप किंवा तेल त्या दिव्यात मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळी आपण लावावा.
त्यामुळे भागवतांचा आशीर्वाद आपल्या बरोबर राहील. आपल्याला आसपास सकरात्मक ऊर्जा असलेले जाणवेल. आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतील. आपले सर्व काम बिना अडथळ्याचे व यशस्वीरीत्या पार पडेल.
आपण जर हा टिळा जर कपाळाला लावलेला असेल तर कोणतीही वाईट ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही आपण अश्या नकारात्मक शक्तींपासून चार हाथ अगदी लांब असू. जर भगवंतांचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोण्हीदेखील रोखु शकत नाही.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.