धनत्रयोदशीला असे करा यमदीपदान।दिवे किती लावायचे ? नंतर दिव्यांचं काय करायचं ? या चूका टाळा!हा पदार्थ खा!…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करण्याला अतिशय महत्त्व आहे आपल्यावरचं किंवा आपल्या घरादारावरचं अकाल मृत्यूचे भय टाळावं यासाठी हे यमदीपदान केलं जातं. कोणतीही पूजाअर्चा किंवा व्रतवैकल्य म्हटली की ते करताना आपल्याला काही नियमांचे पालन करावे लागत.

म्हणजे ते करताना आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होत नाही तसेच यमदीपदानाच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं तर आजच्या मी तुम्हाला यमदीपदान कसं करावं याबरोबरच ते करताना कोणत्या चुका आपल्याला टाळायचे आहेत. कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत. हे सुद्धा सांगणार आहे. तुमच्या मनामध्ये यमदीपदानाच्या बाबतीत जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या मिळून जातील.

चला तर मग सुरुवात करते मंडळी येत्या 10 नोव्हेंबर 2023 ला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी धनत्रयोदशी आलेली आहे धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंचा धन्वंतरी रूप आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते. आपलं घर धनधान्याने भरलेलं राहावं आपल्या घरातली सुख-समृद्धी कायमस्वरूपी टिकून राहावी आणि आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभाव यासाठी धनत्रयोदशीची पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या पूजेचा मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी शेअर केलेला आहे या आपण यमदीपदान कसं करायचं हे बघणार आहोत.

तर यामध्ये प्रदान करण्यासाठी पिठाचे तेरा दिवे बनवले जातात आणि नंतर ते दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करण्याची पद्धत आहे तर त्यासाठी आपण दररोज पोळीची जी कणीक मळतो तशी कणीक आपल्याला मळायची नाहीये किंवा तुमच्याकडे आधीच पीठ थोडेफार उरलेलं असेल तर त्या कणकेपासून सुद्धा तुम्हाला हे दिवे बनवता येणार नाही कारण पोळ्यांची कणिक आपण मळतो.

तर त्यामध्ये आपण मीठ मिक्स केलेला असतं पण हे पीठ मात्र आपल्याला अळणी मळायचं असतं म्हणजे मिनिट न टाकता ही कणिक आपल्याला मळायचे असते फक्त गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर हळद मिक्स करायची जेणेकरून पिवळा रंग या पिठाला येईल आणि अशा पद्धतीचा अळणी पीठ आपल्याला मळून घ्यायचं असतं या पिठाचे तेरा छोटे छोटे गोळे बनवायचे आणि यानंतर आपल्याला या पिठाचे दिवे करून घ्यायचे आहेत.

तर दिवे बनवताना थोडेसे खोलगट आणि मोठ्या आकाराचे तुम्ही बनवले तर तुम्हाला तेल सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित टाकता येईल आणि वात सुद्धा व्यवस्थित लावता येईल तर तुम्ही .मध्ये बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीचे हे तेरा दिवे बनवायचे आहेत तर पिठाचे तेरा दिवे बनवताना काय करायचं पीठ थोडसं घट्ट मळायचं जेणेकरून दिवे नंतर पसरत नाही.

जास्त वेळ जरी तुम्ही बनवून ठेवले तरी पण ते दिवे तुमचे पसरणार नाही आणि तुम्हाला त्याला सारखा सारखा आकार द्यायची गरज पडणार नाही तर घट्ट कणीक मळली तर व्यवस्थितपणे तुम्ही हे तेरा दिवे बनवू शकता दिवे एकेरी वातीचे लावायचे की दुहेरी मातीचे हा तुमचा प्रश्न असणारच आहे तर मृत्यूची देवता यम यांच्यासाठी आपण हे दिवे दान करत असतो.

म्हणजेच दिवे प्रज्वलित करत असतो तर आपल्याला एकेरी वातीचे हे दिवे लावायचे असतात तुम्ही पुढे जाऊन या बघाल की माझ्या दिव्यांमध्ये तुम्हाला लाल रंगाच्या वाती दिसतील पण त्या वाती मी रेडिमेड आणलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला त्या रंगीत दिसतील पण लाल वाती लावायच्या का असा एका ताईनी मागच्या  प्रश्न विचारला होता तर असं नाहीये तुम्ही कापसाच्या पांढऱ्या शुभ्र वाती तयार करून घेऊ शकतात.

लांब वाती आणि प्रत्येक दिव्यामध्ये एक एक वाद ठेवायची तेल कोणतं वापरायचं तर तुम्ही तिळाचे तेल मोहरीचे तेल किंवा देवपूजेमध्ये जे तेल वापरता ते वापरलं तरी सुद्धा चालेल आपलं स्वयंपाक बनवण्याचं खाद्यतेल असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त ते खरकट असता कामा नये म्हणजे त्या तेलामध्ये तुम्ही बाकी काही तेलकट पदार्थ तळलेले नसावेत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.

दिव्यांच्या तेलवातीबाबत तर तुम्हाला समजलं आता या दिव्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न असा येतोय की यमदीपदानामध्ये तेराच दिवे का बनवावे लागतात एक बनवला तर नाही चालत का तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला समजेल की तेराच दिवे का बनवावे लागतात तेरा दिवे लावण्या मागचं कारण हे आहे की देवतांकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी नरकामध्ये वास्तव्याला असतात.

आणि त्यांचा कालावधी तेरा फळे इतका असतो त्याचबरोबर असेही म्हटलं जातं की 13 या संख्येमध्ये यमाला तृप्त करण्याचे सामर्थ्य आहे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की देहामध्ये तेरा प्रकारचे सूक्ष्म वायू असतात त्यामुळेच आपला देह सजीव असतो म्हणजेच काय आपण जिवंत असतो.

आणि या 13 वायू मधला एक जरी वायू कमी झाला किंवा नष्ट झाला तरी पण आपल्या देहाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जळतात यामध्ये एक तर आपण बेशुद्ध पडू शकतो किंवा आपला अकाली मृत्यू सुद्धा होऊ शकतो तर आपल्या शरीरात असणाऱ्या तेरावूंवर जे काही मृत्यूचे सावट असतं तर ते दूर करण्यासाठी त्यापासून रक्षण करण्यासाठी म्हणून आपल्याला यमदेवतेल आहे 13 दिवे दान करायचे असतात.

त्यामध्ये आपल्यासहित आपल्या कुटुंबाचे सुद्धा रक्षण व्हावं आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला हे संकट येऊ नये खरं बघायला गेलं तर मृत्यू आपण टाळू शकत नाही पण अकाल मृत्यू जो असतो एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे पण आपण म्हणतो ना एक ठराविक आयुष्य आपण जगलं पाहिजे एकदम तरुणपणात एखाद्या व्यक्तीला तर सहाजिक आपल्याला वाईट वाटतं तर त्यालाच आपण अकाली मृत्यू होणं.

असं म्हणतो तर तो सकाळी मृत्यू टाळण्यासाठी म्हणून आपल्याला हे तेरा दिवे लावायचे असतात कारण एखाद्या व्यक्ती जेव्हा मृत पावतो तर दहा दिवसाचा सुतक तर आपण पाळतो पण तेरा दिवस काही ना काही विधी आपल्या घरामध्ये चालूच असतात त्या मृत व्यक्तीच्या नावाने तेराव्या दिवशी तेरावा सुद्धा आपण यासाठीच घालतो तर या 13 संख्येचा इतकं महत्त्व आहे म्हणून आपल्याला पिठाचे तेरा दिवे लावायचे असतात अगदीच काही सबळ कारण तुमच्याकडे असेल किंवा जर तुम्ही एवढे दिवे बनवूच शकणार नसाल असं तर कोणाच्या बाबतीत होणारच नाही 

एक दिवा बनवायचा काय आणि छोटे छोटे तेरा दिवे बनवायचे काय तर आपल्याला एक दिवा न बनवता 13 दिवे पिठापासून बनवायचे आहेत जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करतात तर पूजेमध्ये तुम्ही एखादा दिवा किंवा समया वगैरे लावलेलाच असतात तर सर्वात शेवटी जेव्हा तुम्ही आरती किंवा मंत्र श्लोक म्हणतात किंवा नैवेद्य दाखवतात.

त्यावेळेस तुम्ही हे पिठाचे दिवे प्रज्वलित करायचे सुरुवातीलाच तुम्ही लावून ठेवले तर कदाचित पूजा होईपर्यंत त्यातलं तेल संपू शकतो किंवा मग पिठाच्या दिव्यांमध्ये वाती लावल्यावर बऱ्याच वेळा असं होतं की संपूर्ण वाती सुद्धा जळून जातात तर त्यापेक्षा पूजेचा एकदम शेवटचा टाईम येईल की पूजा आता आपली संपत आलेली आहे त्यावेळेस तुम्ही हे पिठाचे दिवे लावा.

आणि सर्वात प्रथम या दिव्यांनी तुम्ही या संपूर्ण पूजेला ओवाळून घ्या त्यानंतर तुम्ही ते दिवे बाहेर न्यायचे आहेत आणि तुमच्या तुळशीजवळ म्हणा किंवा मोकळ्या जागेत म्हणा किंवा तुमच्या छतावर जागा असेल तर तुम्ही तिथे सुद्धा ते लावू शकता दक्षिण दिशेला तोंड करून तर दिवे ठेवण्यासाठी तुम्ही खाली एखादा पेपर वगैरे घेऊ शकता किंवा तुळशीजवळ ठेवणार असाल तर तुळशीजवळ आपण रांगोळी वगैरे काढलेले असेल.

तर त्या रांगोळीवर तुम्ही ते दिवे ठेवले तरीसुद्धा चालतं तुम्ही हे दिवे दक्षिण दिशेला तोंड करून स्वस्तिकच्या आकारात ठेवू शकता किंवा गोलाकार सुद्धा ठेवू शकता किंवा आपल्याकडे बऱ्याच प्रकारची क्रिएटिव्हिटी असते तर आपल्या पद्धतीने आपण हे दिवे कशाही प्रकारे ठेवू शकतो फक्त लक्षात एवढे ठेवायचं की या ज्या दिव्यांच्या वाती आहेत त्या दक्षिणेला असल्या पाहिजे दक्षिण दिशा कोणती हे माहीत नसणारे लोक कमी असतील.

बऱ्यापैकी जणांना दिशांचे ज्ञान असतंच जे शाळेत जातात शिकतात त्यांना नक्कीच दिशा कोणत्याही माहिती असतं पण ज्यांना दिशा माहिती नाही की ही दिशा कोणती ती दिशा कोणती आणि मग त्यामध्ये दक्षिण दिशा कोणती हे जर ओळखायचं असेल तर सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेला जर तुम्ही तोंड करून उभे राहिलात तर तुमच्या उजव्या हाताला जी दिशा येते ती असते दक्षिण दिशा आणि त्या दक्षिण दिशेला त्या वातीच तोंड असेल अशा पद्धतीने तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत.

आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न सहज तयार होऊ शकतो की प्रदोष काळामध्ये नेमकी पूजा करायची की दिवे लावायचे कारण पूजा झाल्यानंतरच आपल्याला हे दिवे दक्षिणेला तोंड करून लावायचे असतात तर प्रदेश काळामध्ये सुरुवातीला तुम्ही पूजा करून घ्या सर्वात शेवटी त्या पूजेला या दिव्यांनी ओवाळा.

आणि नंतर हे दिवे तुम्ही दक्षिणेला तोंड करून लावा तर साधारणता रात्रीचे आठ वाजेपर्यंत आठ वाजेच्या आतपर्यंत तुम्ही हे दिवे दक्षिणेला तोंड करून लावू शकतात जेव्हा आपण हे यमदीपदान करत असतो म्हणजेच दिवे दक्षिणेला तोंड करून ठेवत असतो तेव्हा यमदीपदानाचा एक मंत्र आहे तो म्हणायचा असतो तर तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते आणि म्हणून सुद्धा दाखवते मृत्यू नापास दंड कालेन शामयासह त्रयोदशांधी पदानात सूर्य जहा प्रियता मामा मंत्राचा अर्थ असा होतो.

धनत्रयोदशीला जो व्यक्ती यमासाठी किंवा यमाच्या नावाने हे दीपदान करतो तर यमदीपदानामुळे यमदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले ते अकाली मृत्यूच्या पाठशापासून किंवा दंडापासून सुटका करतात तर ज्यांना ज्यांना मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी फक्त मंत्राचा अर्थ समजावून घेतला तरीसुद्धा पुरेसा आहे.

यामासाठी दिवे लावून तुम्ही घरात येतात तर आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम कडुनिंबाची पाने आणि गुळ किंवा कडुनिंबाची पान आणि साखर हा प्रसाद खायचा आहे तर तुम्ही धनत्रयोदशीच्या पूजेचा मी जो काही व्हिडिओ शेअर केलेला आहे तो एकदा नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला हेही बघायला मिळेल की पूजेमध्ये मी काही औषधी वनस्पती सुद्धा ठेवल्या होत्या ज्यामध्ये तुळस होती त्याचबरोबर कडुनिंबाची पानं होती काही मसाल्याचे पदार्थ सुद्धा होते कारण या पूजेमध्ये आपण धन्वंतरी देवांची पूजा यासाठी करतो.

कारण आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने हा दिवस जो आहे धनत्रयोदशीचा तो धन्वंतरी जयंतीचा आहे वैद्य मंडळी किंवा डॉक्टर लोक यासाठीच धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतात धन्वंतरी हे जे आहेत तर ते देवांचा वैद्य आहेत असं त्यांना म्हटलं जातं आणि या प्रसादामध्ये आपण जर धने आणि गूळ मिक्स करून खाल्लं तर आपल्याला एकदमच कडुनिंबाची पानं खाणं शक्य होत नाही कारण ते कडू असतात तर आपण पूजेमध्ये गणपती बाप्पांचा प्रसाद म्हणून गुळ खोबरं ठेवलेलं असतं 

आणि कुबेर देव त्यांना पांढऱ्या रंगाची मिठाई या दिवशी अर्पण केली जाते तर साखर सुद्धा असते तर तुम्ही काय करायचं त्याच पूजेमधला गुळ किंवा साखर घ्यायची आणि यामध्ये तुम्हाला कडुनिंबाची काही पानं एकदम बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आहेत आणि हा प्रसाद तुम्हाला खायचा आहे.

तर तुम्ही कोणताही पर्याय यामध्ये निवडू शकता कडुनिंबाची पानं आणि गुळ किंवा कडुनिंबाची पानं आणि साखर तर या दिवशी धने आणि गुळ सुद्धा एकत्र करून खाण्याची पद्धत आहे पण आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगायचं झालं तर कडुनिंबाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आपण जुन्या काळच्या लोकांना जर बघतो.

किंवा त्यांच्याकडून सुद्धा ऐकलेला आहे की आम्ही ब्रश नाही वापरायचो आम्ही ब्रश ऐवजी कडुनिंबाची जी काडी असते ती सकाळी सकाळी चावायचं आणि तोच आमचा ब्रश असायचा तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांनी हा प्रयोग केलेला असेल कडुनिंबाची उत्पत्ती अमृता पासून झालेली आहे.

धन्वंतरी देव अमृतत्व देणारे आहेत हे त्यातून प्रतीत होतं कडुनिंबाची पाच-सहा पान जरी आपण दररोज खाल्ली तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची व्याधी होण्याची अजिबात शक्यता शक्यता नाही किंवा संभव सुद्धा नाही एवढं हे कडुनिंबाचे महत्त्व आहे त्यामुळे धन्वंतरीचा प्रसाद म्हणून आपल्याला ही कडुनिंबाची पानं या दिवशी खायचे असतात तुम्ही धने आणि गुळ सुद्धा खाऊ शकता पण हा सुद्धा प्रसाद तुम्हाला आवर्जून खायचा आहे.

फक्त कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि मगच ते तुम्ही गुळामध्ये किंवा साखरेमध्ये मिक्स करून खाऊ शकता. यामध्ये पदांची माहिती मी तुम्हाला सांगितली आता कथा सुद्धा सांगते जेणेकरून तुम्हाला यमदीपदानाचे महत्त्व अजून चांगल्या प्रकारे समजेल हेमराजा म्हणून एक राजा होता आणि त्यांना एक मुलगा होता त्याच्या भविष्यवाणी मध्ये असं सांगितलं होतं की तुमचा मुलगा 16 व्या वर्षीच मृत पावणार त्याचं लग्न सुद्धा होईल.

आणि लग्नानंतर चौथ्या दिवशीच याला मृत्यू येईल राजाराणी यामुळे खूप व्याकुळ होतात त्यामुळे आपला मुलगा जोपर्यंत आहे जोपर्यंत त्याचा आयुष्य आहे तोपर्यंत त्याने सर्व प्रकारची सुख उपभोगावी म्हणून ते प्रयत्न करत असतात आणि त्यामध्येच ते त्याचं लग्न सुद्धा लावून देतात तुम्हाला माहितीच आहे की पूर्वीच्या काळी लग्न अगदी लवकर व्हायची बालविवाह पाहिजे.

त्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या मुलाचा एक प्रकारे बालविवाह करून दिला होता त्यानंतर त्याच्या पत्नीला सुद्धा ही कल्पना असते की आपला पती जो आहे तो लग्नानंतर चौथ्या दिवशीच अमृत पावणार आहे त्यामुळे ती रात्री त्याला झोपू देत नाही त्याचं मन जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न ती करत असते ती त्यांच्या खोलीमध्ये सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते त्याचबरोबर त्यांच्या महालाचे जे काही प्रवेशद्वार असतं.

तर तिथे सोन्या-चांदीच्या गोष्टी ठेवते आणि त्यांचा जो महाल आहे तो पूर्ण दिव्यांनी लखलखित करते म्हणजे तिथे काय प्रकाश ती तयार करते वेगवेगळी गाणी गोष्टी सांगून ती त्याला जागा ठेवण्याचा प्रयत्न करते जेव्हा यमाचे दूध सरपाच्या रूपात त्यांच्या खोलीमध्ये प्रवेश करतात तर त्या दूतांचे डोळे जे आहेत ते त्या प्रकाशानेच दिपून जातात.

आणि या कारणामुळे यमाचे दूध घरी किंवा यमलोकात निघून जातात म्हणजे त्यांच्या घरी ते निघून जातात आणि आल्यानंतर जेव्हा त्यांना यम विचारतो की मी तुम्हाला राजकुमाराचे प्राण हिरावून आणायला सांगितले होते आणि इकडे तर पृथ्वी लोकात तो राजकुमार जो आहे तो जिवंत असतो कारण सर्पद अंश आणि त्याचा मृत्यू होईल हे भविष्यवाणी मध्ये सांगितलेलं होतं 16 व्या वर्षी पण डोळे दिपल्यामुळे सर्परूप विजय यमदूत आहेत ते परत यमलोका जातात.

तर तेव्हा यमाचे दूध सांगतात की हेम राजा जेव्हा तुम्ही आम्हाला असं काम सांगतात की पृथ्वी लोकांवर जा आणि एखाद्या व्यक्तीचे प्राण हिरावून तुम्ही माझ्याकडे घेऊन या म्हणजेच त्या माणसाचा साहजिक त्या क्षणी मृत्यू होईल आणि त्याचा आत्मा जो आहे तो आम्ही इकडे घेऊन येऊ पण त्यावेळेस आम्हाला खूप दुःख होतं कारण जेव्हा आम्ही पृथ्वी लोकांवर जातो एखाद्याचा प्राण हिरावून घेतो त्यावेळेस त्याचा जो परिवार असतो तो खूप रडतो खूप आक्रोश करतो.

आणि हे आम्हाला बघवत नाही त्यातल्या त्यात अशा तरुण मुलांचे आयुष्य जेव्हा आम्ही हिरावून आणतो तेव्हा तर त्याहीपेक्षा जास्त त्रास आम्हाला बघायला मिळतो तेव्हा यामध्येवाने सांगितलं तर यामधून त्यांनी विचारलेलं असतं की यावर तुम्ही काहीतरी तर उपाय करा किंवा तो आम्हाला सुचवा तेव्हा हे सांगतात की ज्यावेळेस धनत्रयोदशीच्या दिवशी जय जय व्यक्ती माझ्यासाठी यमदीपदान करतील म्हणजेच दक्षिण दिशेला तोंड करून तेरा दिवे लावतील तर अशा व्यक्तींच्या घरांवर कधीही अकाल मृत्यूचा संकट येणार नाही.

किंवा कुणाचाही अपमृत्यू होणार नाही तेव्हापासूनच ही यमदीपदान करण्याची प्रथा जी आहे ती रूढ झाली म्हणूनच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करायचं असतं तर तुम्ही सुद्धा धनत्रयोदशीला यमदीपदान करायला अजिबात विसरू नका हे दिवे जे आहेत ते जर तुम्ही बाहेर लावलेले असतील तर सकाळपर्यंत म्हणजे बऱ्याच वेळा आपण जर ते मोकळ्या जागेत लावले तर कुत्रे वगैरे त्यांना खातात 

आणि कुत्र्यांनी जर हे दिवे खाल्ले तर अजूनच चांगलं मानलं जातं त्यामुळे तुमचे दिवे जर सगळे तिथे नसतील तर नाराज व्हायचं काही कारण नाही शक्यतो पिठाच्या दिव्यांमध्ये आपण ज्या वाटी लावतो तर त्या वाती जळून जातात पूर्णतः आणि जळाला नाही तर चांगल्या चांगल्या वाती तुम्ही काढून घेऊ शकता.

दिवाळीच्या भरपूर दिवस म्हणजे चार-पाच दिवस तरी आपण सतत दिवे पण त्यालावत असतो तर त्यामध्ये लावायला तुम्हाला त्या वाती कामात येतील आणि पूर्ण जळालेला असतील तर काही हरकत नाही त्यातला जो काळपट भाग आहे तो तुम्ही काढून टाका आणि बाकी पीठ जे आहेत म्हणजे दिवे जे आहेत.

तर त्या पिठाचा तुम्ही गोळा तयार करा हा पिठाचा गोळा तुम्ही नंतर प्राण्यांना देऊ शकता गाईला देऊ शकता किंवा पक्षांना सुद्धा देऊ शकता आणि यापैकी काही शक्य झालं नाही तर हे जे पीठ आहे ते तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून दिलं तरी सुद्धा चालतं कारण आपलं मध्ये यमदीपदान जे आहे ते पूर्ण झालेलं असतं त्यामुळे त्या पिठाचा नंतर काहीही उपयोग नसतो ज्यांना हे तेरा दिवे बाहेर लावणे शक्य होणार नाही जागेच्या अडचणीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांनी घरामध्ये जिथे आपण धनत्रयोदशीची पूजा केलेली असते तिथेच हे दिवे दक्षिणेला तोंड करून लावले तरीसुद्धा चालणार आहे

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!