सर्वात मोठी अमावस्या, सर्वपित्री अमावस्या, इथे जाळा या 2 वस्तू, नाही होणार कधीच भांडण….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, उद्या शनिवारी सर्वात मोठी व महत्वाची अमावस्या तिथी आहे. आपल्या पितरांच्या मृत्यूच्या तिथी माहीत नसेल किंवा काही अडचणीमुळे जर आपल्याला तर्पण करणे जमले नसेल तर सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी श्राद्ध करावे.

पितरांचा स्वयंपाक करून श्राद्ध केल जात. यासाठी गाय कुत्रा कावळा मुंग्या यांना खाऊ दिल जातं. कावळ्याला, गाईला कुत्र्याला काय खायला द्यावे तसेच त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे हे खूप महत्वाचे आहे.

हे उपाय केले तर आपले पितर तृप्त होतात. पितर आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. काळ्या उडदाचे वडे करून कालभैरवाच्या मंदिरात जाऊन त्यांना याचा नैवेद्य दाखवावा. गाईला खाऊ घालावे.

एखाद्याला एका गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल, भीतीदायक स्वप्ने पडत असतील, मनावर नेहमीच कसले ना कसले दडपण वाटत असेल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी एक तांब्या पाणी घ्यावे व एक मूठभर काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ते पाणी अर्पण करावे व ते कार्य अर्पण करावे

आणि प्रार्थना करावे ते माझ्या मनात होते ते लवकर आता पण आपोआप नष्ट होईल . गाईचे पितृपक्षात खूप महत्त्व आहे. गाईला आपण माता म्हणतो. गायीमध्ये 33 कोटी देव देवतांचे वास्तव्य असते.

म्हणून अमावस्याच्या दिवशी आपण जे काही तयार करतो ते संपूर्ण अन्न गाईला देखील वाढावे व काही शक्य नसेल तर पोळी त्या पोळीवर थोडासा गुळाचा खडा ठेवून ते पोळी खायला द्यावी आणि जर हे शक्य नसेल तर थोडाफार हिरवा चारा किंवा एखादी हिरवी पालेभाजी त्यामुळे आपल्या जीवनातील पितृदोष नष्ट होतात.

गाय हे संपन्नतेचे व शांतीचे प्रतीक आहे. आपल्या जीवनातील अडचणी संपतात व आपल्या जीवनात संपन्नता येते. एक तांब्या पाण्यात चिमूटभर काळे मिठ टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य दिल तर

त्यामुळे आपले मन प्रसन्न होत व आपल्या वरील खर्च कमी होणे तसेच पितृ दोष दूर होतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आत्मा शांत होतात.

अमावस्येच्या दिवशी सर्वात उत्तम कार्य म्हणजे नदीवर पाण्यात उभे राहून ओंजळी भरून पाणी घ्यावे व व अर्घ्य द्यावे. पिंपळाच्या झाडाला हे एक तांब्या पाण्यात काळे तीळ मिक्स करून ते पाणी अर्पण करावे.

यामुळेही आपले पितर शांत होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. या दिवशी कावळ्याला पोळीचा तुकडा खायला द्यावा. कुत्र्याला बिस्किट खाऊ घालावेत. मुंग्यांना साखर टाकावी व देवतांना आपण जो स्वयंपाक केलेला आहे त्याचा संपूर्ण नैवेद्य दाखवावा.

यामुळे आपले पितर शांत होतात. आपले पितृदोष ही नष्ट होतात. ज्योतिष शास्त्रानुसार सर्वपित्री अमावस्या दिवशी दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने दिवे जरूर लावावेत. पितृपक्ष अमावस्या च्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या झाडाखाली पितरांच्या नावाने मिठाई व पिण्यायोग्य शुद्ध पाण्याचा माठ भरून ठेवावा व धूप दीप लावावा.

पिठोरी अमावस्येच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन ब्राह्मणाला शिधा म्हणून तांदूळ दान करावेत. ते आपल्याला जर शक्य नसेल

तर आपण गरीब व गरजू व्यक्तींना ही आशीर्वाद देऊ शकतो. सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी तांदळाचे अकरा दाणे घ्यावेत व दुसऱ्या हातात दिवा घ्यावा आणि ते दोन्ही घेऊन छतावर जावे.

सूर्यास्तानंतर आपल्या घराच्या छतावर पितरांच्या नावाने 2,5,7 दिवे लावावेत व मुख दक्षिणेकडे असावे यात तांदळाचे दाणे टाकून द्यावे त्यानंतर आपल्या पितरांना नमस्कार करावा तसेच प्रार्थना करावी त्यांना निरोप द्यावा.

पितृपक्ष अमावस्या च्या दिवशी धर्म कार्य दान कार्य करणे खूप शुभ मानले जाते म्हणून जेवढे शक्य आहे तेवढे गरीब व गरजूना दान करावे. या दिवशी तांब्याच्या भांड्यात चंदन आणि शुद्ध पाणी मिसळून या मंत्राचा जप करता करता सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.

ओम पितृभ्यो नमः, यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होते. त्याबरोबरच या दिवशी गाय कुत्रा कावळा पक्षी यांना भोजन नक्की द्यावे.

पितृ कधीही कोणत्याही रूपात घरी येतात. तुम्ही नक्की उद्या रात्री 7 वा 4 लवंग 5 भीमसेन कापूर वडी घेऊन घरातून फिरवा. यामुळे काय होईल घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल असे शास्त्र सांगते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!