नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, दिवस खराब आहेत, आयुष्य नाही. दुनिया विरोधात आहे पण आपले स्वामी नाही.. स्वामी भक्तांनो हे आयुष्य आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या काही ना काही इच्छा असतात. आपली इच्छा स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आपण कायम प्रयत्न करत असतो पण असे काही भक्त आहेत की ज्यांना दररोज स्वामींची नित्य सेवा करणे जमत नाही किंवा स्वामी चरित्र सारामृत, 108 जप माळ किंवा असं बरंच काही आहे
तर त्यांच्या मनात प्रश्न येतो की आम्ही स्वामींची सेवा करत नाही. स्वामी आपल्याला पावतील का नाही? रोजच्या रोज स्वामींची सेवा करणे जमत नाही तर काहींच्या घरी पूजा वगैरे करायला चालत नाही किंवा आपल्या आयुष्यातील दैनंदिन जीवनामुळे व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला देवाची आपल्या स्वामींचे नियम करणे जमत नाही तर काही भक्तांचा असा गैरसमज झालेला आहे
की आम्ही तर देवाची पूजा करत नाही किंवा नियमित सेवा देखील करत नाही तर आम्हाला स्वामी पावतील का? स्वामीभक्तांनो स्वामी आपल्याला स्वतः सांगतात की माझे सेवा नाही केली तरी चालेल पण या 4 गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत आणि या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्की मी तुमच्या आयुष्यात चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही.
आपले स्वामी महाराज तर आपली आई आहे. स्वामी महाराज नेहमी सांगतात की फुलं फक्त निमित्त आहेत मला सर्वाधिक प्रिय तो भक्ताच्या अंतःकरणातील भक्तीचा भाव, मग कोणताही असो त्याच मन साफ असणे अगदी गरजेचे आहे. स्वामींनी सांगितलेल्या ४ कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी आपण केल्यावर स्वामी नक्कीच आपल्या आयुष्यात चमत्कार करणार आहे.
त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपले आई-वडील, स्वामी भक्तांनो आपले आई-वडील हे साक्षात स्वामी समर्थांचे रूप आहे म्हणून आई-वडिलांची सेवा मनापासून करा. पूजा स्वामीं पर्यंत पोहोचते. मातृदेवो भाव पितृदेवो भव, माता पिता हे देवासमान आहेत असे आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे.
आई-वडिलांची सेवा करणे ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे. भक्त पुंडलिकाने आईवडिलांची केलेली सेवा म्हणजेच तपश्चर्या होती ,त्या तपश्चर्येमुळे विठोबा महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले होते. विठूमाऊलीच्या एका गाण्यांमध्ये देखील आहे तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट,
श्रावण बाळाचे आपल्या अंध आई-वडिलांची सेवा देखील मनोभावे केली होती. वृद्ध आई-वडिलांनी काशी यात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर याने लगेचच त्यांना कावड यात्रा दोन टोपल्या लावून त्यात बसवले होते आणि ते कावड खांद्यावर घेऊन तो काशीयात्रेला निघाला होता. भक्तांनो पुंडलिक आणि श्रावण बाळ यांचा आदर्श समोर आहे.
आई-वडिलांची सेवा अगदी मनापासून केले पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. आई-वडिलांची सेवा जर तुम्ही मनापासून केली तर ती सेवा देवांपर्यंत पोहोचते. तुम्ही जर आई-वडिलांना दुखवून देवाच्या पाया जाऊन पडत असेल तर त्या पाया पडणे याला काही अर्थ राहणार नाही. आई-वडिलांना दुःख देऊन तर तुम्ही रोज मंदिरातील देवाला फुले वाहत असाल तर या सगळ्या गोष्टींना काही अर्थ राहणार नाही.
मंदिरातील देव देखील तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही त्यामुळे आई वडिलांना कधीच दुख देऊ नका. रोज सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं आपल्या आई-वडिलांचा दर्शन घ्या. आपल्या आई-वडिलांच्या पायाला डोकं टेकवलं म्हणजे स्वामी समर्थांच्या पायाला डोकं टेकवन आहे ही शिकवण आहे. आपल्या आई-वडिलांची काळजी घेतो त्यांना कधीच काहीच कमी पडू देत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान, स्वामी भक्तांनो अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठदान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळे स्वर्ग लोकांची प्राप्ती झाली होती आणि जे करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते.
अन्नदान करणारा असतो तिन्ही लोकात अन्नदाना सारखे श्रेष्ठदान नाही. अन्नदान करणारा वास्तविक दान प्रदान करणारा असतो अन्नदान हे असे धन आहे जेथे दाता घेता असे दोघेही अक्षरशा संतुष्ट होतात.
इतर सर्व कामाचे फळ अप्रत्यक्ष असते पण दान देणारा व दान घेणारा यांचं प्रत्यक्ष असते. तहान भुकेचा भावनांचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदाना पेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही.
लक्ष्मी केंव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती सामर्थ्य दान देत रहावे. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कधीही कमी होत नाही ते वाढतच असते आणि अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो.
संसारात अन्नदान सारखे श्रेष्ठदान पूर्वी नव्हते यापुढेही नक्कीच शरीराचे बल वाढते. अन्नाचा आधारे आपले प्राण टिकून राहतात. म्हणून अन्नदान करणारा प्राण दाता मानला जातो. सर्व देणारा समजला जातो.
अनेक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते. अन्नदाता परमात्मा आहे त्याचे स्मरण ठेवून आणि बळी न पडता जरूर करा, जमेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार आहे.
शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो. हजारात एखादा पंडित असतो. लाखात एखादा वक्ता असतो. परंतु या सर्वात एखादा अन्नदाता असतो किंवा अन्नदानासाठी श्रेष्ठ दुसरे दान नाही. भुकेल्याला अन्न देणे आणि भगवान ईश्वराचे नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात.
जेव्हा एखाद्या भुकेल्याला अन्न देतो त्याचा आत्मा आपण शांत करतो तेव्हा नकळत त्याच्या मुखातून आपल्यासाठी चांगले चांगले आशीर्वाद मिळतात आणि ते आशीर्वाद कायम स्वरूपी आपल्या सोबत राहतात. अन्नदाना मुळे आपल्याला आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही त्यामुळे तुम्ही देखील थोडं का होईना अन्नदान करत रहा.
स्वामी भक्तांनो यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मधील दयाळूपणा. आपल्या मधील करुणा म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीला आपल्या घासातला घास काढून देणे किंबहुना आपण उपाशी राहून दुसऱ्याच्या पोटाची भूक भागवणे कोणाला संकटात पाहून पटकन मदतीचा हात देणे अथवा पोटच्या मुलांसारखे किवा पाठच या भावंड समजून एखाद्यावर जीवापाड प्रेम करणे.
आपला समजून त्या विषयी काळजी असणे, भुकेल्याला अन्न तहानलेल्याला पाणी आणि अनाथाला आश्रय दया द्यावी. सुखात तर सगळेच साथ देतात पण आपल्याला एक दुखाता व्हायला हवं असं स्वामी समर्थ महाराज स्वामी नेहमी म्हणतात की तुम्ही दुसऱ्यांवर दया दाखवा मी तुमच्यावर दया करेल.
त्यामुळे कायम आपल्याला समोरच्या व्यक्तीची दया यावी. मी असं बोलत नाहीये तुम्हाला सर्वांचे दया यायला हवी पण जो खरा आहे त्याची दया आपल्याला यायला हवी. त्यामुळे आपण इतरांवर दया करूया. स्वामी आपल्यावरती दया करतील.
स्वामी भक्तांनो यानंतरची चौथी आणि शेवटची तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे आणि तो हवाच. आपल्याला नेहमी श्रद्धेने आणि मनापासून स्वामींना प्रार्थना करायची आहे.
आपल्याला स्वामींवर विश्वास कायम ठेवायचा आहे. काही लोकांना नेहमी त्याची सवय असते की माणसं नेहमी वाईट विचार करतात, माझ्या मनासारखं कधीच काही होत नाही स्वामी माझे किती परीक्षा बघणार आहेत काय माहिती? मला कशातच यश नाही?
अशा गोष्टी असतात, खरंतर स्वामी आपल्याला सर्व काही देत असतात स्वामींचे आपल्यावर कायम कृपा होत असते. स्वामींचा आपल्यावर कायम लक्ष असतं आणि आपल्यावर स्वामी सर्व काही ठीक करणार असतात.
फक्त आपल्याला योग्य क्षणाची वाट पाहायचे असते. आपल्याला धीर धरायचा असतो. असा नकारात्मक विचार करतात आणि ती स्वताचे पाय स्वता मागे खेचत असतात तर इथून पुढे लक्षात ठेवा की कधीच असे नकारात्मक विचार करायचे नाही आणि जेव्हा केव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतील त्या विचारांना थांबवायचं आणि स्वामींचे नाव घ्यायचं.
रोज रात्री किंवा सकाळी उठल्यावर मनात दुसरे विचार सुरू होण्या आधी तुम्ही तुमचं स्वप्न बोलून दाखवा त्याचीच तयारी प्रयत्न करताय असे वाटून घ्या. म्हंजे तुमचं मन त्या दिशेने वाटचाल करेल जरी तुम्ही काही कारणास्तव दुसरीकडे भरकटला तर मन तुमचं तिकडे घेऊन जाईल. मग गाडी,बंगला, बिझनेस, यश , जॉब कायपण असुदेत रोज सकाळी किंवा रात्री झोपण्याचा आधी मनाला व स्वामींना ती इच्छा स्वप्न अर्पण करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.